आज अमरनाथ यात्रा नरसंहाराच्या पार्श्वभूवीवरती ,,,, रामदास स्वामी आठवतात
अध्यात्माच्या पोकळ आणि वांझोट्या गप्पा न मारता ज्यांनी हिन्दु समाजास बलोपासनेची शिकवण दिली आणि क्षात्रतेज जागृत ठेवले त्या समर्थ रामदास स्वामींना साष्टांग प्रणाम.
जयासी वाटे जीवाचे भय।
तेणे क्षात्रधर्म करो नये।
काहीतरी करोनी उपाये।
पोट भरावे।।
मराठा तितुका मेळवावा।
महाराष्ट्र धर्म वाढवावा।
सगट स्वकीयांचा जिव्हाळा।
सोडु नये।।
धर्मासाठी झुंजावे।
झुंजोनी अवघ्यासी मारावें।
मारितां मारितां घ्यावें।
राज्य आपुलें।।
आधी गाजवावे तडाखे।
तरिच भूमंडळ धाके।
हे न करिता धक्के।
राज्यास होती।।
धटासी आणावा धट।
उद्धटासी उद्धट।
खटनटासी खटनट।
सामर्थ्य करीं।।
देशद्रोही तितुके कुत्ते।
मारोनि घालावे परते।
देवदास पावती फत्ते।
यदर्थी संशयो नाही।।
आहे तितुके जतन करावें।
पुढे आणिक मेळवावें।
महाराष्ट्र राज्य करावें।
जिकडे तिकडे।।
~समर्थ रामदास स्वामी
असा रांगडा आणि क्षात्रवृत्ती उत्तेजित करणारा उपदेश करणारा संत क्वचितच कोणत्याही प्रांतात जन्मला असेल. राष्ट्रभक्ती आणि धर्मभक्ती हेच खरे अध्यात्म असा उपदेश करणारे समर्थ रामदास लवकरात लवकर उभ्या हिन्दुस्थानास समजणे अत्यंत आवश्यक आहे. रामदास स्वामींच्या उपदेशाप्रमाणे स्वत्व आणि स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा, हिंमत आणि ताकत सर्व भारतीयांना लाभो हीच प्रार्थना.
।।जय जय रघुवीर समर्थ।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा