बुधवार, २३ जुलै, २०२५
लोकल प्रवासात फुलली प्रेमाची गोष्ट'! 'मुंबई लोकल' येत्या १ ऑगस्टला प्रदर्शित होणार
शनिवार, २१ जून, २०२५
जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या रेडिओचे महत्त्व अबाधित-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मंगळवार, १७ जून, २०२५
देशातील पहिला सांस्कृतिक रेडिओ महोत्सव मुंबईत - २१ जून रोजी 'आशा रेडिओ' पुरस्काराचे वितरण
बुधवार, ११ जून, २०२५
'उदकशांंत' दीर्घांकाचे शनिवारी कल्याणला सादरीकरण
शुक्रवार, ६ जून, २०२५
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर - अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
सोमवार, २६ मे, २०२५
कॅलिफोर्निया येथे तीन दिवसीय 'नाफा' मराठी चित्रपट महोत्सव
बुधवार, ७ मे, २०२५
संगीतकार अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांना जाहीर
सोमवार, ५ मे, २०२५
'मुक्काम पोस्ट देवाच घर' पाच भारतीय भाषांमध्ये डब
सोमवार, २८ एप्रिल, २०२५
सुलट प्रेमाची उलट गोष्ट 'मंगलाष्टक रिटर्न'!
सोमवार, २१ एप्रिल, २०२५
सोनी मराठी वाहिनीवर आज काय बनवू या...?
शनिवार, १२ एप्रिल, २०२५
'चित्रपताका' महोत्सवाची नावनोंदणी प्रक्रिया सुरू
गुरुवार, १० एप्रिल, २०२५
रहस्यमय'छबी'पुढील महिन्यात प्रदर्शित होणार
'मुक्काम पोस्ट देवाचं घर'आता ॲमेझॉन प्राइमवर
मंगळवार, ८ एप्रिल, २०२५
आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण
मंगळवार, २५ मार्च, २०२५
नवाजुद्दीन सिद्दीकी व ‘बिग कॅश’वर कारवाई होणार
नवाजुद्दीन सिद्दीकी व ‘बिग कॅश’वर कारवाई होणार
- पोलिसांच्या गणवेशाचा अवमान करणारी जाहिरात हटवली
मुंबई, दि. २५ मार्च
हिंदू जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या पाठपुराव्यानंतर पोलिसांच्या गणवेशात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकींना दाखवणारी आणि जनतेला जुगार खेळण्यास प्रवृत्त करणारी वादग्रस्त ‘बिग कॅश पोकर’ जाहिरात सोशल मीडियावरून अखेर हटविण्यात आली आहे. मात्र दोषींवर कारवाई अद्याप झालेली नाही.
जाहिरात हटवण्यात आली असली, तरी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि ‘बिग कॅश’चे मालक अंकुर सिंग यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. सुराज्य अभियानाने या प्रकरणात वेळोवेळी फेसबुक, यू-ट्यूब आणि ट्विटर (X) यांच्या तक्रार निवारण अधिकार्यांकडे तक्रारी केल्या होत्या; परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. अखेरीस तक्रार अपील समिती (GAC) कडे तक्रार केली आणि त्यानंतरच ही जाहिरात हटवण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या अधिवक्ता अमिता सचदेवा यांच्या कायदेशीर हस्तक्षेपामुळे हे यश मिळाले आहे.
सुराज्य अभियानाच्या वतीने सतीश सोनार, रवी नलावडे यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेतली आणि ही जाहिरात पोलीस दलाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविणारी असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. गृहराज्यमंत्री कदम यांनी बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांना तपास करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
जे पोलीस खाते जुगार खेळणार्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करते, त्याच पोलिसांच्या वेशात अशी जाहिरात केली जाते, हे पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणारे आणि व्यावसायिक फायद्यासाठी समाजाची दिशाभूल करणारे आहे. यात ‘बडे काम का खेल’ असे म्हणून ‘जुगार’ हा गुन्हे उकलण्यासाठी आवश्यक कौशल्य असल्याचे पोलीस वेशातील नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यांकडून प्रचारित करण्यात आले होते, तसेच यात भगवद्गीतेचाही अवमान करण्यात आला होता. त्यामुळे सुराज्य अभियानाने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि ‘बिग कॅश पोकर’ आस्थापनावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची, तसेच भविष्यात पोलीस दलाच्या प्रतिमेचा गैरवापर थांबवण्यासाठी कठोर धोरण आखण्याची मागणी सरकारकडे केली आहे.
रविवार, ७ एप्रिल, २०२४
महाभाग कसला? महाबोगस एपिसोड... प्रेक्षकहो, 'ठरलं तर' मालिकेला आपटवा
महाभाग कसला? महाबोगस एपिसोड...
प्रेक्षकहो, 'ठरलं तर' मालिकेला आपटवा
शेखर जोशी
अगं बाई तुला एखाद्या गरीब, गरजू माणसाला मदत करायची आहे तर एखाद्या चांगल्या संस्थेत जा आणि आर्थिक मदत कर. कोण, कुठला, ओळख ना पाळख असलेला रस्त्यावरचा माणूस भेटतो आणि सायली त्या माणसाला आपल्या योजनेत सामील करून घेते? प्रथितयश वकील असलेला अर्जुन या कामासाठी त्याच्या माहितीतील शिक्षा भोगून सुटलेल्या एकाची मदत घेणार असतो तर सायली आपली अक्कल पाजळते आणि त्याला विरोध करते.
रविराज किल्लेदार. हा ही हुषार, गाजलेला वकील. पण आपला भाऊ, आपली मुलगी प्रिया काय करतात? हे त्याला कळत नाही. दोघेही त्याला गुंडाळून ठेवतात. प्रिया कोणत्या कॉलेजमध्ये जाते? तिथे काय दिवे लावते? स्टडी टूरच्या नावाखाली काय करते? हे याला कळत नाही.
तो चैतन्य महामुर्ख. अण्णा व साक्षीच्या घरात राहतो. पण या दोघांचे बोलणे कधीच त्याच्या कानावर पडत नाही. सायलीला कीडनॅप करून घरात आणून ठेवलाय, तिला तिथून दुसरीकडे घेऊन जाताहेत आणि घरात इतकं काय काय घडताय पण चैतन्यला यातले काही कळत नाही.
अस्मिता गेल्या अनेक महिन्यांपासून माहेरीच येऊन राहिलेली आहे. सायली विरोधात कट कारस्थाने सुरू आहेत. स्वतः काही गुन्ह्यात पकडली गेली आहे. तरी ती अजूनही माहेरीच राहते आहे. मधुनच कधीतरी तिची आई व पूर्णा आजी तिला मी मारल्यासारखे करते आणि तू रडल्यासारखे कर असे बोलतात पण तिला येथून चालती हो म्हणत नाहीत.
![]() |
प्रतिमा कुठे गायब झाली? |
सगळ्यात महत्त्वाचे. प्रतिमा. काही भागात तिला दाखवून आता पूर्णपणे गायब केली आहे. त्या कुसुमच्या घरून ती कुठे गेली? अदृश्य झाली काही पत्ता नाही. मधुभाऊ बिचारे अजून विलासच्या खुनाच्या आरोपाखाली आतच आहेत. वात्सल्य आश्रम खटला, प्रतिमा हे मालिकेतील मुख्य घटक आहेत, पण तेच कुठे दिसत नाहीत. मधेच कधीतरी त्यांची आठवण होते आणि चटणी, कोशिंबीरीसारखे तोंडी लावायला त्यांचा उल्लेख केला जातो. हे मूळ कथानक पुढे जाण्याऐवजी फालतू आणि रटाळ उपकथानक जोडून एपिसोड वाढवत चालले आहेत. महाएपिसोडच्या नावाखाली तासभर प्रेक्षकांच्या माथी काहीही थोपवले जात आहे. सायली अर्जुनचा हनिमून, माथेरान भाग त्याचाच एक भाग होता.
शेजो उवाच
https://youtu.be/rGdvBpCttvo?feature=shared
प्रेक्षक मालिका पाहताहेत म्हणून तुम्ही टीआरपीत सध्या एक नंबरवर आहात. पण असा एपिसोडकाढूपणा केलात तर धाडकन खाली आपटायला वेळ लागणार नाही. नव्हे आता ती वेळ आली आहे. फक्त प्रेक्षकांनी 'ठरलं तर मग' असे म्हटले पाहिजे. इथे काही जण म्हणतील, रिमोट तुमच्या हातात आहे, बंद करा, पाहू नका. अनेक प्रेक्षक तसे करतातही. पण
आपण प्रेक्षकांच्या जे माथी मारू ते चांगलेच आहे, आम्ही आम्हाला पाहिजे ते करू असे करण्याचा ठेका वाहिनी, लेखक, दिग्दर्शक, निर्माता यांना कोणीही दिलेला नाही. निषेधाचा सूर उटटलाच पाहिजे. प्रेक्षकांनी मालिकेला आपटायचे ठरवले, समाज माध्यमातून टीका केली की मालिकांना कशा प्रकारे गाशा गुंडाळावा लागतो, वेळ बदलावी लागते त्याची उदाहरणे आहेत. 'ठरलं तर मग' असे प्रेक्षकांनी मनाशी ठरवून तुमची मालिका पाडायच्या आधी जागे व्हा, कथानक वेगाने पुढे न्या, महाएपिसोडच्या नावाखाली काहीही प्रेक्षकांच्या माथी मारू नका.
- शेखर जोशी
७ एप्रिल २०२४
शेजो उवाच
https://youtu.be/rGdvBpCttvo?feature=shared
शुक्रवार, २३ जून, २०२३
भूमिकांची उलटापालट आणि दुतोंडीपणा उघड
'आदिपुरुष'च्या निमित्ताने...
भूमिकांची उलटापालट आणि दुतोंडीपणा उघड
शेखर जोशी
ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' या वादग्रस्त, बिभत्स चित्रपटाच्या निमित्ताने तथाकथित ढोंगी पुरोगामी आणि प्रतिगामी यांच्या भूमिकांची उलटापालट झाली असल्याचे दिसून येत आहे. आणि या दोन्ही बाजूंचा दुतोंडीपणाही उघड झाला आहे.
सहा महिन्यांपूर्वी या चित्रपटाचा टिझर/ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्याचवेळी दिग्दर्शक ओम राऊत आणि चित्रपटाच्या सादरीकरणावर प्रचंड टीका झाली. खरे तर त्या टिझरवरूनच चित्रपट टुकार, बीभत्स आणि तमाम भारतीयांच्या मनातील रामायणाचे प्रतिमाभंजन करणारा आहे हे लक्षात आले होते. त्यावेळी भाजपचे आमदार राम कदम यांनी चित्रपटाला विरोध केला तर मनसेचे अमेय खोपकर यांनी राऊत यांना समर्थन दिले. चित्रपट पूर्ण पाहा आणि मग ठरवा, ओम राऊत हे हिंदुत्ववादी आहेत, अशी भलामण त्यांनी केली. चित्रपट प्रदर्शित झाला. आणि आता भाजपचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे सर्व नेते, लोकप्रतिनिधी यांची आणि मनसेची, राज ठाकरे यांचीही अळी मिळी गुप चिळी आहे.
आधुनिक काळातील क्रूरकर्मा मुस्लिम दहशतवादी किंवा इतिहासातील क्रूरकर्मा अफझलखानासारख्या दिसणा-या विध्वंसक मुसलमानाच्या वेषातील रावण, त्याच्याच जवळ जाणारा हनुमान, बीभत्स आणि वटवाघूळ सदृश्य पुष्पक विमान, काळोखी लंका, टॅट्यू काढलेला इंद्रजित, हनुमानाच्या तोंडी दिलेले 'जली' असले टपोरी प्रकारचे संवाद आणि बरेच काही. हे सर्वच न पटणारे आहे. काहीतरी नवीन, वेगळे करण्याच्या नावाखाली, दिग्दर्शकीय स्वातंत्र्याच्या नावाखाली ओम राऊत यांनी ज्या विकृत, बीभत्स पद्धतीने आदिपुरुष सादर केला आहे, ते पाहता कोणाही सुजाण, भारतीय संस्कृती, आपले वेद, पुराणे, पौराणिक देव देवता याविषयी आस्था, प्रेम, आदर असणा-यांना चीडच येईल. झापडे लावून याचे समर्थन करणेच चुकीचे आहे.
हिंदुत्व, भारतीय संस्कृती, परंपरा याचा अभिमान, गर्व असणारी लोकं उजवी म्हणून ओळखली जातात, त्यांना कुचेष्टेने प्रतिगामी म्हटले जाते. तर बहुसंख्यांकांची आस्था, त्यांची दैवते, हिंदुत्व, हिदू संस्कृतीची टिंगल टवाळी करणे, अल्पसंख्याकांचे विशेषतः मुस्लिमांचे लांगुलचालन करणे म्हणजे पुरोगामी असल्याचे समजले जाते. काश्मीर फाईल्स, केरळ स्टोरी या चित्रपटांना याच ढोंगी पुरोगामी मंडळींनी विरोध केला. खरे तर भारतात काश्मीर प्रश्नांबाबत जे काही घडले त्याचे आणि लव्ह जिहादच्या भयाणतेचे वास्तव चित्रण अनुक्रमे या दोन्ही चित्रपटातून सादर करण्यात आले. ते कटू असले तरी सत्य होते. इतर वेळी भावना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढणा-या ढोंगी पुरोगामी मंडळींनी दोन्ही चित्रपटाला विरोध केला. यात सर्व कॉंग्रेसी,डावे, समाजवादी, निधर्मवादी, सर्वधर्मसमभाववादी या पुरोगाम्यांचा समावेश होता. दोन्ही चित्रपटांवर बंदी घालण्यात यावी अशी मागणीही यांनी केली होती. तर हिंदुत्ववादी म्हणवून घेणारा भाजप, कट्टर हिंदुत्ववादी संघटना असलेल्या विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि इतर काही हिंदुत्ववादी संघटना, नेते यांनी या चित्रपटांचे समर्थन केले.
आता आदिपुरुष बाबतीत याच भूमिकांची उलटापालट झाली आहे. आदिपुरुष म्हणजे रामायणाचे आणि त्यातील व्यक्तिरेखांचे उघडपणे केलेले प्रतिमाभंजनच आहे हे दिसताय. पण तरीही महाराष्ट्रातील किंवा देशातील एकाही भाजप नेत्यांने, लोकप्रतिनिधीने, पदाधिकाऱ्यांने चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केलेली नाही. सादरीकरणावरून दिग्दर्शक ओम राऊत, संवाद लेखक मनोज मुंतशीर यांचा विरोध/ निषेध केलेला नाही. 'पठाण' चित्रपटात भगवी बिकिनी घातली म्हणून तो चित्रपट बंद पाडण्याची भाषा करणारे हिंदुत्ववादी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदिपुरुषबाबत मूग गिळून गप्प आहेत. आणि याच्या उलट डावे, कॉंग्रेसी, समाजवादी असे तथाकथित पुरोगामी चित्रपटाच्या विरोधात बोलत आहेत. बंदी घालण्याची मागणी करत आहेत. राज ठाकरे, मनसेही गप्प आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही भाजपसोबत आलो असे सांगणा-या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही चित्रपटाचा निषेध किंवा विरोध केलेला नाही. आता शिंदे गटातील खासदार श्रीरंग बारणे यांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
मुळात हा चित्रपट केंद्रीय सेन्सॉर बोर्डाने मंजूर कसा केला हे कोडे आहे. याच केंद्रीय सेन्सॉर बोर्डावर प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक वामन केंद्रे, हिंदुत्ववादी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक रमेश पतंगे सदस्य आहेत. चित्रपटासाठी तज्ज्ञ अभ्यासक म्हणून व्याख्याते, प्रवचनकार सच्चिदानंद शेवडे यांनी काम केले आहे. ज्या देवदत्त नागे यांनी 'खंडोबा' ची भूमिका केली ते या चित्रपटात हनुमानाच्या भुमिकेत आहेत. याशिवाय अजय अतुल, प्रसाद सुतार, तेजस्विनी पंडित, सोनाली खरे ही मंडळीही चित्रपटाशी संबंधित आहेत. या सर्वांनी झापडे लावून, डोळ्यांवर पट्टी बांधून काम केले का? चित्रपटाचा टिझर आणि आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, सर्व स्तरातून प्रचंड टीका होत असताना, समाज माध्यमांतूनही अत्यंत प्रक्षुब्ध भावना व्यक्त होत असताना ही सर्व मंडळी गप्प आहेत. ओम राऊत, मनोज मुंतशीर यांच्याकडून किंवा वरील अन्य काही जणांकडून केलेल्या कृतीचे समर्थन करण्यात येत आहे ते अजिबात न पटणारे व चीड आणणारे आहे. तुम्ही चुकलात, माती खाल्ली हे मान्य करायला, कबुली द्यायला हिंमत लागते, ती तुम्ही दाखवावी.
तुमच्याविषयी सर्वसामान्य मराठी माणसांच्या मनात जी प्रतिमा आहे, त्याला तुम्ही स्वतःच तडा देण्याचे कृती केली आहे. 'काम केले/झाले, सर्व काही मिळाले' आता होऊ दे काहीही. समाज माध्यमातून लोक चार दिवस बोलतील आणि विसरून जातील., अशी तुमची भूमिका आहे आणि असणार. म्हणूनच तुम्ही सर्व गप्प आहात. तुमचेही बरोबरच आहे म्हणा. खरेच आहे, लोकं चार, आठ दिवसांत सर्व काही विसरून जातात. अशा लिहिण्याने काही फरक पडणार नाही, हे माहीत असूनही मनातील खदखद व्यक्त केली आहे. मला वाटले ते लिहिले.
शेखर जोशी
२३ जून २०२३
रविवार, ५ मार्च, २०२३
'वसंत' ऋतूचे संगीत
![]() |
संगीतकार वसंत प्रभू |
‘कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला’, ‘गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का’, ‘कळा ज्या लागल्या जिवा’, ‘चाफा बोलेना’, ‘जेथे सागरा धरणी मिळते’, ‘जन पळभर म्हणतीतल हाय हाय’, ‘मानसीचा चित्रकार तो’, ‘राधा कृष्णावरी भाळली’ ही आणि अशी अनेक अवीट गोडीची गाणी संगीतबद्ध करणारे संगीतकार वसंत प्रभू यांचे जन्मशताब्दी वर्ष या वर्षीच्या जानेवारी (१९ जानेवारी) पासून सुरू झाले आहे. त्यानिमित्ताने...
पी. सावळाराम यांनी लिहिलेल्या ‘गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का’ या गाण्याने इतिहास निर्माण केला. पुणे रेल्वे स्थानकावर एका नवविवाहित मुलीची सासरी पाठवणी करताना आईच्या डोळ्यांत अश्रू होते. आईने मुलीची ‘सासरी सुखी राहा, डोळ्यात पाणी आणू नको’अशा शब्दांत समजूत काढली. पी. सावळराम हे त्या प्रसंगाचे एक साक्षीदार होते. प्रतिभावान सावळाराम यांनी त्या प्रसंगाला डोळ्यांसमोर ठेवून ‘गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा’ हे गाणे लिहिले. लता मंगेशकर यांच्या आर्त स्वरातील या गाण्याने लोकप्रियतेचा उच्चांक निर्माण केला. त्या काळात तर गाजलेच, पण आजही प्रत्येक मराठी लग्न या गाण्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. आचार्य अत्रे यांनी या गाण्याचे कौतुक करताना ‘गंगा जमुना हे गाणे एका पारडय़ात आणि इतर सगळी गाणी दुसऱ्या पारडय़ात टाकली तरीही ‘गंगा जमुना’चे पारडेच जड होईल’ असे म्हटले होते. संगीतकार वसंत प्रभू, कवी/गीतकार पी. सावळाराम आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या त्रयीने मराठी भाव व चित्रपट संगीताला अनेक अवीट गोडीच्या गाण्यांची अमूल्य भेट दिली.
साधी व सोपी आणि सहज गुणगुणता येईल अशी चाल हे प्रभू यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्याचे ठळक वैशिष्टय़. संगीतकार अशी ओळख असलेल्या प्रभू यांनी सुरुवातीला हिंदी चित्रपटात ‘बाल अभिनेता’ म्हणून काम केले. वसंत प्रभू यांचे मूळ नाव व्यंकटेश प्रभू. पण हिंदी चित्रपटासाठी हे नाव चालणार नाही म्हणून त्यांचे ‘वसंत’ असे नामकरण करण्यात आले. प्रभू यांनी बाल कलाकार म्हणून पाच हिंदी चित्रपटांत काम केले. १९३८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जमाना’ या हिंदी चित्रपटात प्रभू यांनी बाल कलाकार म्हणून काम केले होते. चित्रपटाचे दिग्दर्शन राम दर्यानी यांचे होते. ‘व्यंकटेश’ हे नाव चित्रपटासाठी योग्य ठरणार नाही म्हणून दर्यानी यांनी व्यंकटेशचे नामकरण ‘वसंत’ असे केले. चित्रपटाच्या श्रेयनामावलीत ‘बाल अभिनेता वसंत’ असे त्यांचे नावही देण्यात आले. ‘जमाना’ या चित्रपटाखेरीज प्रभू यांनी ‘मास्टर मॅन’, ‘राजकुमारी’, ‘देखा जाएगा’, ‘जीवनसाथी’ या हिंदी चित्रपटात काम केले होते.
भार्गवराव पांगे हे प्रभू यांचे गुरू. त्यांच्या मेळ्यामधून ते काम करायला लागले. मेळ्यात ते गाणीही म्हणत असत. ‘ब्रह्मचारी’ चित्रपटातील एक गाणे २४ वेळा म्हटल्यामुळे (वन्समोअर घेत) त्यांचा आवाज फुटला. त्यामुळे त्यांना गाता येईना. त्यामुळे पांगे यांनी त्यांना मोरे नावाच्या गृहस्थांकडे नृत्य शिकायला पाठविले. नृत्य शिकल्यानंतर काही काळ त्यांनी नृत्यशिक्षक म्हणूनही काम केले. त्या काळात वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेले ‘अरे पाटलाच्या पोरा जरा जपून’ हे गाणे लोकप्रिय झाले होते. प्रभू ज्या मोरे यांच्याकडे नृत्य शिकायला जात होते, त्यांचा मोठा भाऊ कविता करायचा. त्यांनी याच गाण्यासारखे ‘अगं पाटलाच्या पोरी जरा जपून’ हे गाणे लिहिले व त्याला चाल लावायला प्रभू यांना सांगितले. प्रभू यांनी त्याला चालही लावली. ‘एचएमव्ही’ने त्याची ध्वनिमुद्रिका काढली. प्रभू यांची ती पहिली ध्वनिमुद्रिका. ‘पाटलाचा पोर’ हा संगीतकार म्हणून त्यांचा पहिला चित्रपट होता,
प्रभू यांनी काही काळ ‘एचएमव्ही’मध्येही संगीत दिग्दर्शक म्हणून नोकरी केली. ‘एचएमव्ही’चे वसंतराव कामेरकर यांनी प्रभू यांच्यातील गुणवत्ता आणि प्रतिभा हेरली होती. ‘एचएमव्ही’मध्ये नोकरी करत असतानाच्या काळातही प्रभू यांच्याकडून अनेक उत्तमोत्तम गाणी तयार केली गेली. प्रभू यांनी सुमारे २५ चित्रपटांना संगीत दिले. भावगीतांप्रमाणेच त्यांनी संगीतबद्ध केलेली चित्रपटांतील गाणीही गाजली. ‘मानसीचा चित्रकार’ हे वसंत प्रभू यांचे चरित्र/आत्मचरित्र प्रसिद्ध असून ते मधू पोतदार यांनी लिहिले आहे.
भगवान श्रीकृष्णाने ‘ऋतुनाम कुसुमाकर:’ अशा शब्दात भगवद्गीतेमध्ये वसंत ऋतूचे कौतुक केले आहे. मराठी साहित्यातही अनेक लेखक आणि कवींनी वसंत ऋतूचे वेगवेगळ्या शब्दांत वर्णन केले आहे. हर्षांचा, उत्साहाचा आणि संपूर्ण सृष्टीला नवे रूप देणारा ऋतू म्हणून वसंत ऋतूचे विशेष महत्त्व आहे. मराठी संगीतातही संगीतकार वसंत देसाई, वसंत पवार आणि वसंत प्रभू या तीन ‘वसंत’ नावांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. वेगवेगळ्या प्रकारची अजरामर गाणी देऊन संगीतात ‘वसंत’ऋतू निर्माण केला. १९ जानेवारी १९२४ मध्ये जन्मलेल्या 'वसंत' ऋतूचा ( प्रभू) १३ ऑक्टोबर १९६८ या दिवशी अस्त झाला.
प्रभू यांनी संगीतबद्ध केलेली काही लोकप्रिय गाणी
आली हासत पहिली रात, कळा ज्या लागल्या जिवा, कोकिळ कुहूकुहू बोले, घट डोईवर घट कमरेवर, जो आवडतो सर्वाना, डोळे हे जुलमी गडे, मानसीचा चित्रकार तो, रघुपती राघव गजरी गजरी, राधा कृष्णावरी भाळली, राधा गौळण करिते, रिमझिम पाऊस पडे सारखा, पाहुनी रघुनंदन सावळा, लाजली सीता..सप्तपदी हे रोज चालते, हरवले ते गवसले का, प्रेमा काय देऊ तुला भाग्य दिले तू मला, मधु मागसी माझ्या सख्या परी, सखी शेजारिणी
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...