धर्म/अध्यात्म लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
धर्म/अध्यात्म लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ८ जुलै, २०२५

देव, देश, धर्माच्या विरोधात षडयंत्र रचणाऱ्यांवर कारवाई करा

देव, देश, धर्माच्या विरोधात षडयंत्र रचणाऱ्यांवर कारवाई करा - समस्त वारकरी संप्रदाय, संस्था, संघटनांची मागणी पंढरपूर, दि. ८ जुलै आषाढीवारी चालू असतांना पुणे येथे वारकर्‍यांवर मांस फेकण्याचा प्रकार झाला. वारीत विविध संघटनांकडून घुसखोरी सुरू आहे. देव, देश, धर्म यांच्यावर सातत्याने आघात घडवून आणले जात असून देव, देश, धर्माच्या विरोधात षडयंत्र रचणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समस्त वारकरी संप्रदाय, संस्था, संघटनांकडून करण्यात आली. वारकरी संघटना आणि संप्रदाय, राष्ट्रीय वारकरी परिषद, सद्गुरु श्री गंगागिरी महाराज संस्थान, महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदू जनजागृती समितीतर्फे पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या वारकरी संमेलनात ही मागणी करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘व्हिडिओ कॉल’ करून वारकऱ्यांशी संवाद साधला आणि 'वारकरी व संतपरंपरा महाराष्ट्राचे वैभव असून सरकार नेहमीच वारकर्‍यांच्या पाठिशी असल्याचे सांगितले. अधिवेशनात महंत रामगिरी महाराज, श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थानचे विश्‍वस्त ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, विश्‍व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री आणि सत्संगप्रमुख दादा वेदक, हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगडचे राज्य संघटक सुनील घनवट, शिवव्यंकटेशानंद भारती स्वामी, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे ह.भ.प. नरेंद्र महाराज मस्के यांच्यासह अन्य मान्यवरांची भाषणे झाली. सूत्रसंचालन ह.भ.प. दत्तात्रय चोरगे महाराज यांनी केले. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात खोट्या खटल्यात अडकवून दोन वर्षे कारावास भोगावा लागलेले तसेच ‘दाभोलकर हत्या आणि मी’, आणि ‘मालेगाव स्फोटामागील अदृश्य हात’ हा पुस्तकाचे लेखक विक्रम भावे, वारकर्‍यांच्या विविध प्रश्‍नांवर सातत्याने आवाज उठवणारे दैनिक ‘सनातन प्रभात’चे वरिष्ठ वार्ताहर अजय केळकर, सुदर्शन वाहिनीचे वार्ताहर दीपक चव्हाण, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समितीचे गणेश लंके यांचा महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वारीत होणारी नक्षलवादी, साम्यवादी यांची घुसखोरी या संदर्भात विधान परिषेदत आवाज उठविल्याप्रकरणी शिवसेनेच्या सचिव, प्रवक्त्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांचेही विशेष अभिनंदन करण्यात आले. पंढरपूर, देहू, आळंदी, पैठण, मुक्ताईनगर यांसह सर्व तीर्थक्षेत्रे कायमस्वरूपी मद्य आणि मांस यांपासून मुक्त करावीत, या सर्व तीर्थक्षेत्री १० किलोमीटर परिसरात अहिंदूंच्या धर्मप्रसारावर बंदी आणावी, संत, संत-वांङ्मय, राष्ट्रपुरुष, धर्म, देवता आदींचा अवमान करणार्‍यांवर कठोर कारवाई होण्यासाठी ईशनिंदा प्रतिबंधक कायदा लागू करावा, संतांच्या श्‍लोकांचा चुकीचा अर्थ लावून वारीचे वातावरण कलुषित करणार्‍यांना शासनाने कायमचा प्रतिबंध करावा, गोहत्या आणि गोतस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्रातील गोहत्या प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, हिंदू युवतींचे रक्षण होण्यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा तात्काळ संमत करावा, इंद्रायणी आणि चंद्रभागा या नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी इत्यादी ठराव मंजूर करण्यात आले‌.

गुरुवार, ३ जुलै, २०२५

आषाढी एकादशीला पंढरपूरला वारकरी अधिवेशन

आषाढी एकादशीला पंढरपूरला वारकरी अधिवेशन पंढरपूर, दि. ३ जुलै वारकर्‍यांच्या श्रद्धास्थानांवर होणारे आघात, संघटन आणि अन्य संबंधित प्रश्नांसाठी येत्या ६ जुलै रोजी पंढरपूर येथे वारकरी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. वारकऱ्यांची श्रद्धास्थाने, देवता आणि संतांवरील आघात व उपाय यावर अधिवेशनात चर्चा होणार आहे. हिंदू जनजागृती समितीसह वारकरी संप्रदाय आणि संघटना, राष्ट्रीय वारकरी परिषद, श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट सरला, महाराष्ट्र मंदिर महासंघतर्फे आयोजित हे वारकरी अधिवेशन दुपारी एक ते साडेतीन या वेळेत श्री गंगागिरी महाराज मठ, भक्तीमार्ग, जनकल्याण रुग्णालयाच्या शेजारी येथे होणार आहे. महंत रामगिरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या अधिवेशनात ज्येष्ठ किर्तनकार ह.भ.प. बंडातात्या कराडकर, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. रामेश्‍वरशास्त्री महाराज, सचिव ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी, पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थानचे विश्‍वस्त ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ आणि हिंदुत्ववादी संस्था/ संघटनांचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र, छत्तीसगडचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी दिली. पंढरपूर, देहू, आळंदी, पैठण, मुक्ताईनगर यांसह सर्व तीर्थक्षेत्रे कायमस्वरूपी मद्य आणि मांस यांपासून मुक्त करावीत, तसेच या सर्व तीर्थक्षेत्री १० किलोमीटर परिसरात अहिंदूंच्या धर्मप्रसारावर बंदी आणावी, संत, संत-वांङ्मय, राष्ट्रपुरुष, धर्म, देवता आदींचा अवमान करणार्‍यांवर कठोर कारवाई होण्यासाठी ईशनिंदा प्रतिबंधक कायदा लागू करावा, संतांच्या श्‍लोकांचा चुकीचा अर्थ लावून वारीचे वातावरण कलुषित करणार्‍यांना शासनाने कायमचा प्रतिबंध केला जावा, गोहत्या आणि गो तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्रातील गोहत्या प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी केली जावी, हिंदू युवतींचे रक्षण होण्यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा तात्काळ संमत करण्यात यावा, इंद्रायणी आणि चंद्रभागा या नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना केली जावी इत्यादी मागण्यांवर अधिवेशनात चर्चा व मार्गदर्शन केले जाणार आहे. धर्मरक्षणार्थ कार्य करणाऱ्या धर्मरक्षकांचा अधिवेशनात गौरव करण्यात येणार आहे. अधिवेशनासाठी वारकरी-भाविक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - राजन बुणगे ९७६२७२१३०४

शनिवार, २१ जून, २०२५

तीर्थक्षेत्र, देवता, संत, अभंग आणि वारीचा अवमान सहन करणार नाही

तीर्थक्षेत्र, देवता, संत, अभंग आणि वारीचा अवमान सहन करणार नाही - समस्त वारकरी संप्रदाय व संघटनांचा इशारा पुणे, दि. २१ जून महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनात पंढरपूरच्या वारीला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र सध्या काही अपप्रवृत्ती वारीच्या पवित्र परंपरेत घुसखोरी करून संत साहित्य, अभंग, धर्मग्रंथ व वारकरी श्रद्धास्थानांविषयी अपप्रचार करत आहेत. वारकरी संप्रदाय व संघटना हा अवमान सहन करणार नाही, असा इशारा वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्यासह वारकरी संत आणि मान्यवरांनी दिला. समस्त वारकरी संप्रदाय, संस्थान, संघटना व हिंदु जनजागृती समिती वतीने पुणे येथील श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरी नक्षलवादाच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. समरसतेच्या नावाखाली काम करणारे तथाकथित तसेच नक्षवादी कारवायांमध्ये ज्यांचे कार्यकर्ते पकडले आहेत, अशी अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कबीर कला मंच यांसह ज्यांच्यावर शहरी नक्षलवादाच्या गुन्ह्यांची नोंद आहे, असे इतर पुरोगामी वारीत शिरले आहेत. ही बाब शासनाने गांभीर्याने घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही कराडकर यांनी केली. नक्षलवादाचा आरोप असणार्‍या संघटनांचे मुखवटे काढून त्यांचे खरे चेहरे उघड केले आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये नक्षलवादाच्या आरोपाखाली अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांवर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. हे वारीच्या माध्यमातून अंनिस, कबीर कला मंच, पुरोगामी छुपा अजेंडा राबवत आहेत. शहरी नक्षलवादाचा अजेंडा राबवणार्‍यांवर सरकारने कठोर कारवाई करावी, असे हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी सांगितले. देहूप्रमाणे वारकर्‍यांची सर्व तीर्थक्षेत्रे कायमस्वरूपी मद्य-मांस मुक्त करावीत, असे ह.भ.प. नितीन महाराज मोरे यांनी सांगितले.‌ वारकरी संप्रदायाच्या विचारधारेविरोधी कार्य करणार्‍यांना जशास-तसे उत्तर देण्यास वारकरी सक्षम असल्याचे ह.भ.प. नरहरि महाराज चौधरी म्हणाले.‌ संत, महापुरुष यांवर टिका करणार्‍यांच्या विरोधी त्वरित कायदा करावा, अशी मागणी ह.भ.प. राम महाराज कदम यांनी केली. स्वामी भारतानंद सरस्वती महाराज, ह.भ.प. भगवान महाराज कोकरे यांनीही मनोगत व्यक्त केले.

शुक्रवार, १३ जून, २०२५

हिंदू धर्म आणि देवतांवर श्रद्धा आहे त्यांनाच सेवेत घ्यावे-सनातन संस्थेची मागणी -शनिशिंगणापूर मंदिरातील ११४ मुस्लिम कर्मचारी हटविण्याच्या निर्णयाचे हिंदू जनजागृती समिती कडून स्वागत मुंबई, दि. १३ जून हिंदूंची मंदिरे ही श्रद्धास्थाने असून ज्यांची हिंदू धर्म आणि देवता यांच्यावर श्रद्धा आहे,अशांनाच मंदिरसेवेत घ्यावे,अशी मागणी, सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केली आहे. तर शनिशिंगणापूर मंदिरातील ११४ मुसलमान कर्मचाऱ्यांना हटविण्याच्या निर्णयाचे हिंदू जनजागृतीनेही स्वागत केले आहे. केवळ शनिशिंगणापूरच नव्हे, तर सर्वच देवस्थानांनी ही भूमिका घेऊन सेवकांची नियुक्ती करावी, अशी मागणीही वर्तक यांनी केली आहे. दरम्यान श्री शनिशिंगणापूर मंदिरातील ११४ मुसलमान कर्मचाऱ्यांना हटविण्याच्या निर्णयाचे हिंदू जनजागृती समिती, महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि इतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी स्वागत केले आहे. शासनाच्या नियंत्रणात असलेल्या अन्य देवस्थानांमध्येही अन्यधर्मीय कर्मचारी असतील तर त्यांची चौकशी करून त्यांनाही तत्काळ सेवामुक्त करण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी केली आहे.

शुक्रवार, ६ जून, २०२५

आळंदीजवळ पशूवधगृहासाठी जागा आरक्षित होणे ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट

आळंदीजवळ पशूवधगृहासाठी जागा आरक्षित होणे ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट वारकरी आणि जागरूक हिंदु समाज आळंदी तीर्थक्षेत्राजवळ कोणत्याही परिस्थितीत पशूवधगृह होऊ देणार नाहीत; परंतु या क्षेत्रात पशूवधगृहासाठी जागा आरक्षित होणे, ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे, असे मत, दैनिक सनातन प्रभातचे विशेष प्रतिनिधी प्रितम नाचणकर यांनी व्यक्त केले आहे. नाचणकर यांनी लिहिलेला 'पुणे जिल्ह्यातील आळंदी क्षेत्राजवळ पशूवधगृहाचे आरक्षण : महाराष्ट्राने आत्मचिंतन करण्याची आवश्यकता !'हा लेख ६ जून २०२५ च्या दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रकाशित झाला आहे.‌ पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने १४ मे या दिवशी शहराचा सुधारित विकास आराखडा घोषित केला. प्रशासनाच्या संकेतस्थळावर हा आराखडा अधिकृतरित्या ठेवण्यात आला आहे. या आराखड्यानुसार आळंदी तीर्थक्षेत्राच्या जवळ मोशी-डुडुळगावी या मार्गावर ३.७८ एकर जागा पशूवधगृहासाठी आरक्षित करण्यात आली आहे. यापूर्वी वर्ष १९९५ मध्ये महानगरपालिका प्रशासनाने शहरात अन्य ठिकाणी पशूवधगृहासाठी जागा आरक्षित केली होती; मात्र नागरिकांच्या विरोधामुळे ते आरक्षण रहित करण्यात आले. सामाजिक समतोलासाठी समाजात पशूवधगृह आवश्यक असल्याची सूचना हरित लवादाकडून प्राप्त झाल्यावर यापूर्वीच्या आराखड्यात रहित केलेले पशूवधगृह महानगरपालिकेने आळंदी तीर्थक्षेत्राजवळ आरक्षित केले. ‘पशूवधगृह धार्मिक स्थळाजवळ असू नये’, हे तारतम्यही महानगरपालिकेच्या लक्षात न येणे आणि आळंदीसारख्या पवित्र तीर्थक्षेत्राजवळ त्यासाठी जागा आरक्षित करणे, ही प्रशासनाची अक्षम्य चूक असल्याचे नाचणकर यांनी या लेखात म्हटले आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा विकास आराखडा संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने हरकती मागवण्यासाठी ६० दिवसांची मुदत दिली. याविषयी समजताच वारकरी, धर्मप्रेमी हिंदु आणि सतर्क नागरिक महानगरपालिकेकडे निषेध नोंदवत आहेत. महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजात राज्य सरकारचा थेट हस्तक्षेप नसला, तरी आळंदी तीर्थक्षेत्राजवळ पशूवधगृह आरक्षित झाल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर राज्य सरकारने याकडे तातडीने लक्ष घालणे अपेक्षित आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांनी याविषयी स्पष्टीकरण देणे अपेक्षित होते; मात्र तसे आढळले नाही दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी श्रीक्षेत्र आळंदी येथे जाऊन संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीस्थानाचे दायित्व असलेल्या ‘श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी’ यांच्या विश्वस्तांची भेट घेतली. ‘आळंदी क्षेत्राजवळ पशूवधगृह होऊ नये, यासाठी त्यांनी प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे का ?’, याविषयी विचारणा केली; मात्र हे खेदाने सांगावे लागते, ‘या देवस्थानने साधे पत्रही पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाला पाठवण्याचा सोपस्कार केला नव्हता, अशी माहिती लेखात पुढे देण्यात आली आहे. दरम्यान आळंदीक्षेत्राजवळ पशूवधगृहाच्या आरक्षणाचा निर्णय सरकारने रद्द केला नाही, तर सरकारला वारकर्‍यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. वारकर्‍यांच्या भावनांचा उद्रेक होऊ देऊ नका, असा इशारा वारकरी युवक संघाचे संस्थापक ह.भ.प. अनंत महाराज पाटेकर यांनी प्रशासन आणि सरकारला दिला आहे. या लेखाची लिंक पुढीलप्रमाणे https://tinyurl.com/4avty6bf

शनिवार, २४ मे, २०२५

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचा समारोप

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचा समारोप; भारतासह २३ देशांतील ३० हजार हिंदूंचा सहभाग फोंडा, गोवा, २४ मे येथे आयोजित करण्यात आलेल्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाची सांगता झाली.‌आगामी काळात भारताला हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी आपण सर्वांनी आवश्यक ते प्रत्येक पाऊल उचलून संघटित राहिले पाहिजे,असे आवाहन तेलंगणा येथील हिंदुत्वनिष्ठ आमदार श्री. टी. राजासिंह यांनी महोत्सवाच्या सांगताप्रसंगी केले. सनातन संस्थेचे रौप्यमहोत्सवी वर्ष आणि संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८३ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.भारतासह जगभरातील २३ देशांतून आलेले सुमारे ३० हजार हिंदू धर्मप्रेमी आणि साधक या महोत्सवात सहभागी झाले होते.
महोत्सवात विविध आध्यात्मिक,राष्ट्रहितकारी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय सैन्य, सनातन धर्मप्रेमी आणि राष्ट्ररक्षणासाठी महोत्सवात शतचंडी याग तसेच समस्त सनातन हिंदु धर्मियांना चांगले आरोग्य लाभावे यासाठी महाधन्वंतरी यज्ञही आयोजित करण्यात आला होता.देशभरात राष्ट्र अन् धर्म कार्य करणार्‍या २५ जणांना ‘हिंदु राष्ट्ररत्न’ आणि ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हे पुरस्कार आता दरवर्षी दिले जाणार आहेत. महोत्सवात कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले यांचा जीवनपट कीर्तनाच्या माध्यमातून उलगडला.श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरिजी, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रविंद्र पुरीजी महाराज, अयोध्या हनुमानगढी येथील महंत राजू दास, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपादजी नाईक, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, माजी केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर, तसेच काशी-मथुरा येथील मंदिरांचा खटला लढवणारे सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांच्यासह अनेक मान्यवर महोत्सवात सहभागी झाले होते.

गुरुवार, २२ मे, २०२५

शंखनाद महोत्सवात शिवकालीन शस्त्र प्रदर्शन

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात शिवकालीन दुर्मिळ शस्त्र प्रदर्शन फोंडा, गोवा, दि. २३ मे येथे आयोजित करण्यात आलेल्या‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त भरविण्यात आलेले शिवकालीन ऐतिहासिक आणि दुर्मिळ शस्त्रांचे भव्य प्रदर्शन विशेष आकर्षण ठरले. सुमारे सहा हजार चौरसफूट क्षेत्रात हे प्रदर्शन मांडण्यात आले होते.‌ प्रदर्शनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज,धर्मवीर संभाजी महाराजांच्या पराक्रमाचे स्मरण झाले.
प्रदर्शनात कोल्हापूरच्या सव्यासाची गुरुकुलम आणि पुण्याच्या शिवाई संस्थान यांचे शस्त्रप्रदर्शन, गोव्यातील सौंदेकर घराण्याची प्राचीन शस्त्रे, तसेच सरदार येसाजी कंक यांची तलवार आणि सरदार कान्होजी जेधे यांच्या चिलखताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने बंदिस्त करताना वापरलेले मूळ साखळदंड शिवले कुटुंबाने पिढ्यान्‌पिढ्या जतन केले आहेत.ते साखळदंडही प्रदर्शनात पाहायला मिळाले.
शिवले कुटुंबातील वंशज सर्वश्री सागर शिवले, कुमार शिवले, सोमनाथ शिवले, दीपक टाकळकर, वेदांत शिवले यांचा हिंदु जनजागृती समितीचे पूर्वाेत्तर भारताचे धर्मप्रचारक नीलेश सिंगबाळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
शिवकालीन युद्धकलेत वापरण्यात येाऱ्या विविध प्रकारच्या तलवारी, बंदुका, ढाली, जांबिया, तोफा, कट्यारी, चिलखत, शिरस्त्राण, भाले, कुर्‍हाडी, त्रिशूल, अंकुश, सिकल, पुरबा इत्यादीं प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या सैन्यातील विविध सरदारांच्या पराक्रमाची सचित्र माहितीही प्रदर्शनात सादर करण्यात आली.

मंगळवार, २० मे, २०२५

हिंदूंचे राजनितीकीकरण आणि राजनीतीचे सैनिकीकरण आवश्यक

फोंडा,गोवा, दि. २० मे हिंदूंचे राजनितीकीकरण आणि राजनीतीचे सैनिकीकरण होणे आवश्यक असून हिंदू बलशाली व्हायलाच हवा, असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी येथे केले. सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात‘सनातन राष्ट्र आणि डॉ. जयंत आठवले यांचे विविधांगी कार्य'या सत्रात ते ‘सनातन राष्ट्राची सुरक्षा’ या विषयावर बोलत होते. ‘चाणक्य फोरम’चे मुख्य संपादक तथा सेवानिवृत्त मेजर गौरव आर्य,पंजाब गोरक्षक दलाचे संस्थापक अध्यक्ष सतीश प्रधान, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक नंदकुमार जाधव,हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्याचे समन्वयक सुनील घनवट व्यासपीठावर उपस्थित होते. स्वातंत्र्यानंतर देशात सत्तेवर आलेल्या सरकारने याकडे लक्ष दिले नाही. हिंदू बलशाली होण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे देशाचे अवमूल्यन झाले, असेही सावरकर म्हणाले. राष्ट्राचे रक्षण शस्त्रानेच करावे लागते. साधूसंतांच्या रक्षणासाठी श्रीरामाचा जन्म झाला. मुघलांचे आक्रमण वाढल्यानंतर हिंदूंच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज, गुरुगोविंदसिंग यांचा जन्म झाला, असे गौरव आर्य यांनी सांगितले. हिंदूंना धर्मशिक्षण प्राप्त व्हावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीने धर्मशिक्षणवर्ग सुरू केले सद्यस्थितीत देशात समितीच्या वतीने ५०० ठिकाणी धर्मशिक्षणवर्ग चालू आहेत, अशी माहिती नंदकुमार जाधव यांनी दिली. पंजाब गोरक्षक दलाचे संस्थापक अध्यक्ष प्रधान म्हणाले, महाराष्ट्रात गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्यात आला, त्याप्रमाणे हिंदूंच्या आस्थेचा विचार करून सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या निमित्ताने गोवा सरकारनेही गोमातेला राज्यमातेचा दर्जा द्यावा.

प्रत्येक मंदिर मुक्तीसाठी हिंदूंचा सहभाग अत्यावश्यक - अधिवक्ता विष्णु जैन

काशी, मथुराच नव्हे, तर प्रत्येक मंदिर मुक्तीसाठी हिंदूंचा सहभाग अत्यावश्यक - अधिवक्ता विष्णु जैन फोंडा, गोवा, दि. २० मे अहिंदूंचे एकही प्रार्थस्थळ, श्रद्धास्थान सरकारच्या नियंत्रणात नाही, पण प्रत्येक राज्यातील हिंदूंची मंदिरे विविध कायद्यांद्वारे सरकारच्या नियंत्रणात आहेत. काशी-मुथरा येथील मंदिरांच्या मुक्तीचा कायदेशीर लढा आम्ही देत आहोत. मात्र हे पुरेसे नसून देशातील प्रत्येक मंदिर मुक्त करण्याच्या लढ्यात हिंदूंचा सहभाग अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी केले. सनातन संस्थेने आयोजित केलेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त ते बोलत होते. ‘सेव कल्चर सेव भारत फाऊंडेशन’चे उदय माहुरकर, लेखक आणि विचारवंत नीरज अत्री, तसेच हिंदु जनजागृती समितीचे रमेश शिंदे, सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक उपस्थित होते. ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’ या ‘ई’ बुकचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. बहुसंख्य हिंदूंना धर्माच्या आधारावर कोणत्याच सुविधा मिळत नाही; याउलट अल्पसंख्यांक म्हणून अन्य धर्मियांना मात्र ‘अल्पसंख्यांक आयोगा’कडून ३ हजार २०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपयांच्या सुविधा मिळतात. उत्तर प्रदेश येथील अल्पसंख्याकांच्या एक वैद्यकीय शिक्षण संस्थेत प्रवेश मिळण्यासाठी हिंदू धर्मांतर करून प्रवेश घेत आहेत, इतकी गंभीर स्थिती आहे. ‘वक्फ बोर्डा’त केवळ २ अहिंदू सदस्य घेतले, तर लगेच ‘सरकार असे करू शकत नाही’, असा न्यायालय निर्णय देते, याकडेही जैन यांनी लक्ष वेधले. सध्या सोशल मीडिया, ‘ओटीटी’, चित्रपट यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक आक्रमण होत आहे. सनातन संस्कृती, पुढील पिढी वाचण्यासाठी हे सांस्कृतिक आक्रमण रोखणे आवश्यक असल्याचे माहूरकर यांनी सांगितले. अत्री म्हणाले, सध्या समाजात पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करण्यात अनेक जण धन्यता मानत आहेत. सनातन संस्कृतीच्या रक्षणासाठी हिंदूंच्या डोक्यावर बसलेले पाश्चिमात्यांच्या अंधानुकरणाचे भूत उतरविणे आवश्यक आहे. बांगलादेशात सरकारविरोधी आंदोलनात हिंदूंनाच मारण्यात आले. काश्मीर, केरळ आणि बंगाल येथून हिंदूच संपत चालले आहेत. पहेलगाम येथेही धर्म विचारून हिंदूंची हत्या करण्यात आली. प्रत्येक ठिकाणी हिंदूंनाच लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे आता केवळ जागृती करत बसण्यापेक्षा त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे शिंदे म्हणाले.

सोमवार, १९ मे, २०२५

शंखनाद महोत्सवात सनातन धर्माचा ध्वज फडकला !

शंखनाद महोत्सवात सनातन धर्माचा ध्वज फडकला! फोंडा,गोवा, दि. १९ मे येथे सुरू असलेल्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या हस्ते सनातन धर्माच्या ध्वजाचे आरोहण करण्यात आले. यावेळी शंखनाद आणि वेदमंत्रांचा जयघोष करण्यात आला. हा ध्वज राजकीय किंवा संविधानिक नसून आध्यात्मिक स्वरूपाचा ‘धर्मध्वज’ आहे. ‘सनातन हिंदु राष्ट्राची स्थापना’या ध्येयाची जाणीव करून देईल.महाभारत युद्धात श्रीकृष्ण आणि अर्जुन ज्या रथावर आरुढ झाले होते, त्या रथावर बसून हनुमंताने जो ध्वज हातात धरला होता, तो सनातन धर्माचा ध्वज होता. हनुमंताचा रंग शेंदरी म्हणजे केशरी आहे, म्हणून सनातन राष्ट्राचा ध्वज केशरी रंगाचा आहे. या ध्वजावर ‘कल्पवृक्षाच्या खाली कामधेनु उभी आहे’, असे चित्र आहे. कल्पवृक्ष आणि कामधेनु ही दोन्ही ‘समृद्धी, पालन-पोषण, संरक्षण अन् श्रीविष्णूचा अभय वरदहस्त’ यांची प्रतिके आहेत. डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी बिंदा नीलेश सिंगबाळ आणि अंजली मुकुल गाडगीळ यांच्यासह सनातनचे संत, साधक, कार्यकर्ते उपस्थित होते.

हिंदू राष्ट्राची स्थापना ही समष्टी साधनाच-डॉ. जयंत आठवले

हिंदू राष्ट्राची स्थापना ही समष्टी साधनाच-डॉ. जयंत आठवले फोंडा, गोवा, दि. १८ मे स्वत: साधना करणे ही व्यष्टी साधना, तर समाजाला साधनेला लावणे, ही समष्टी साधना आहे. सनातन संस्था समष्टी साधना शिकवते, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी रविवारी येथे केले. गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त डॉ. आठवले बोलत होते. सर्वच समाज सात्त्विक झाला, तर हिंदु राष्ट्राची स्थापना लवकर होईल. हिंदु राष्ट्राची स्थापना, ही समष्टी साधना आहे, त्यासाठी सर्वांनी साधना करावी, हे सांगण्यासाठी समाजात जायला हवे, असेही डॉ. आठवले यांनी सांगितले. समाजातील डॉ. केवळ शारीरिक आणि मानसिक आजारावर औषध देतात; मात्र अनिष्ट शक्तींच्या त्रासासह अनेक रोग हे स्वभावदोष, प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास यांमुळे होतात. हे त्यांना माहितच नसते. त्यामुळे या त्रासावर त्यांच्याकडे कोणतीच उपाययोजना नसते. परिणामी अनिष्ट शक्तींचा त्रास दूर करण्यासाठी नामजप अर्थात् साधनाच करावी लागते, असेही डॉ. आठवले म्हणाले. विविध संप्रदाय, संत व मान्यवरांकडून डॉ. आठवले यांचा सन्मान करण्यात आला.

अधर्माचा प्रतिकारासाठी समाज घडविण्याची आवश्यकता- स्वामी गोविंद देवगिरीजी

अधर्माचा प्रतिकार करण्यासाठी समाजाला तयार करण्याची आवश्यकता- स्वामी गोविंद देवगिरीजी फोंडा, गोवा, दि. १८ मे अधर्माचा प्रतिकार करण्यासाठी समाजाला तयार करण्याची आवश्यकता आहे. सनातन धर्माच्या आड येणार्‍या कायद्यांमध्ये बदल करण्याची आवश्यकता असून सनातन धर्माच्या प्रसाराचे कार्य ही साधना, ईश्वराची उपासना आहे, असे प्रतिपादन श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरीजी यांनी रविवारी येथे केले. सनातन संस्थेचे रौप्यमहोत्सवी वर्ष आणि संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८३ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने फोंडा गोवा येथे तीन दिवसीय सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवातील ‘सनातन राष्ट्र संकल्प’ सभेत ते बोलत होते. सनातन संस्थेचे संपूर्ण कार्य आध्यात्मिकतेच्या पायावर उभे असून सनातन संस्था भारत राष्ट्राला एक समजून काम करत आहे. श्रीमद् भगवद्गीता युद्धाच्या भूमीवर सांगितलेला ग्रंथ असून सनातन संस्थेनेही या ग्रंथाप्रमाणेच अध्यात्मापासून युद्धापर्यंत जागृती केली असल्याचे स्वामी गोविंद देवगिरीजी म्हणाले. सनातन संस्कृतीच्या रक्षणासाठी शक्तीची उपासना करा, असे आवाहन उत्तरप्रदेश विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांनी केले. अल्पसंख्यांकांमुळेच लव्ह जिहाद, लँड जिहाद, धर्मांतर यांसह अनेक समस्यांना हिंदू बळी पडत आहेत. प्रतिदिन १० हजार लोकांचे धर्मांतर होत आहे. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रण कायदा हाच अनेक समस्यांवर उत्तर आहे, असे अधिवक्ता अश्विनी उपाध्याय यांनी सांगितले. ‘सनातन राष्ट्रा’साठी ‘धर्मदूत’ बनण्याचा संकल्प करू या, असे चारुदत्त पिंगळे म्हणाले. अयोध्या येथील महंत श्री राजूदासजी महाराज, स्वामी बालकानंद गिरीजी महाराज, सुदर्शन वाहिनीचे सुरेश चव्हाणके, स्वामी आनंद स्वरूप, धर्मयशजी महाराज यांनीही मनोगत व्यक्त केले.

शनिवार, १७ मे, २०२५

सनातन संस्थेचे कार्य समाजासाठी दीपस्तंभ - गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला सुरुवात; सनातन संस्थेचे कार्य समाजासाठी दीपस्तंभ - गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत फोंडा,गोवा- दि. १७ मे गेल्या २५ वर्षांपासून सनातन संस्था हिंदू धर्माचा प्रसार करण्याचे मोठे कार्य करत असून सनातन संस्थेचे कार्य समाजासाठी दीपस्तंभाप्रमाणे आहे, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी येथे केले. सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष आणि संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८३ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने १७ ते १९ मे या कालावधीत फार्मागुडी,फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या उदघाटन सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ.सावंत बोलत होते.
गोवा येथील कुंडई येथील दत्त पद्मनाभ पीठाचे पद्मश्री बह्मेशानंद स्वामीजी, ‘सनातन बोर्ड’चे प्रणेते देवकीनंदन ठाकूर,केंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक,भाजपचे गोवा राज्याचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक, कर्नाटक येथील म्हैसूर राजघराण्याचे युवराज तसेच म्हैसूरचे खासदार यदुवीर कृष्ण दत्त चामराज वाडीयार, ‘सुदर्शन न्यूज’चे प्रधान संपादक सुरेश चव्हाणके, सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस,अभय वर्तक उपस्थित यावेळी होते. पूर्वी गोव्यात लोक समुद्र तसेच अन्य गोष्टी पाहाण्यासाठी येत होते. गोव्यात सनातन संस्थेचे कार्य सुरू झाल्यानंतर आता नागरिक भारतीय संस्कृती आणि मंदिरे पहाण्यासाठी गोव्यात येतात. गोवा भोगभूमी नसून ही देवभूमी असल्याचे सांगून मुख्यमंत्री डॉ.सावंत म्हणाले, सनातन संस्कृती आणि शंखनाद महोत्सवामुळे येथील अर्थकारण आणि सांस्कृतिक पर्यटन वाढेल, असा विश्वासही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री डॉ.सावंत यांनी गोवा शासनाच्या वतीने डॉ. जयंत आठवले यांना शाल-श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन विशेष सन्मान केला, तर देशाच्या संरक्षण कार्यासाठी डॉ.आठवले यांच्या हस्ते मुख्ममंत्री डॉ. सावंत यांच्याकडे साहाय्यता निधी सुपूर्द करण्यात आला. सनातन राष्ट्राची मुहूर्तमेढ गोवा येथून होत असून हा ऐतिहासिक क्षण आहे, असे केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले.गोवा ही ‘बीच’वर बसण्याची नव्हे,तर परशुरामाची उपासना करण्याची भूमी असल्याचे देवकीनंदन ठाकूर यांनी सांगितले.राम-कृष्ण यांचा आदर्श ठेवून शक्तीची उपासना करा,असे आवाहन ब्रह्मेशानंद स्वामी यांनी केले. सनातन धर्माला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी ‘शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले असून हा महोत्सव धर्मभक्तांना आध्यात्मिक बळ,नवचैतन्य आणि ऊर्जा प्रदान करेल, असे चेतन राजहंस यांनी सांगितले.खासदार यदुवीर कृष्ण दत्त चामराज वाडीयार गोव्याचे वीजमंत्री श्री. सुदीन ढवळीकर, भाजपचे गोवा राज्याचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांनीही मनोगत व्यक्त केले सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाची अधिक माहिती SanatanRashtraShankhnad.in या संकेतस्थळावर मिळू शकेल.

शुक्रवार, १६ मे, २०२५

'शंखनाद महोत्सवा'च्या निमित्ताने गोव्यात वाहन फेरी

'शंखनाद महोत्सवा'च्या निमित्ताने गोव्यात भव्य वाहन फेरी फोंडा (गोवा), दि. १६ मे फोंडा, गोवा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर शनिवारपासून सुरू होणा-या 'सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च् निमित्ताने शुक्रवारी येथे भव्य वाहनफेरी काढण्यात आली.दुचाकी, चारचाकी आणि बस गाड्यांचा यात समावेश होता. भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी अधिकारी अरुण देसाई यांच्या हस्ते धर्मध्वज पूजन केल्यानंतर फोंडा येथील सनातन आश्रमापासून वाहनफेरीला सुरुवात झाली.पुढे कवळे -तिस्क फोंडा, शांतीनगर जंक्शन, गोवा बागायतदार, फोंडा पोस्ट ऑफीस कार्यलय-फोंडा येथील जुने बसस्थानक-श्री हनुमान मंदिर, कुर्टी-फर्मागुडी येथील किल्ल्याजवळ सांगता झाली. वाहनांवर फडकणारे भगवे ध्वज उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.‘हर हर महादेव’,‘सनातन धर्माचा विजय असो,‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम्’ अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक म्हणाले, ही वाहनफेरी म्हणजे भक्तीची दिव्य वारी आहे. महोत्सवाच्या अधिक माहितीसाठी तसेच थेट प्रक्षेपण पहाण्यासाठी SanatanRashtraShankhnad.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले.

गुरुवार, ८ मे, २०२५

शंखनाद महोत्सव १ हजार वर्षांपूर्वीच्या सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दुर्मिळ दर्शन

शंखनाद महोत्सव १ हजार वर्षांपूर्वीच्या सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दुर्मिळ दर्शन पणजी (गोवा), दि. ८ मे सनातन संस्थेने येत्या १७ ते १९ मे या कालावधीत फोंडा, गोवा येथे आयोजित केलेल्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात एक हजार वर्षांपूर्वीच्या सोरटी सोमनाथ जोतिर्लिंगाचे दर्शन घेण्याची दुर्मिळ संधी उपस्थितांना मिळणार आहे, अशी माहिती सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी गुरुवारी पणजी येथील पत्रकार परिषदेत दिली. फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर हा महोत्सव होणार आहे.हे शिवलिंग मूर्तीभंजक गझनी याने तोडले होते आणि नंतर पुढे अग्निहोत्र संप्रदायाच्या साधकांनी त्याचा सांभाळ केला. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्यामुळे हे शिवलिंग महोत्सवाच्या ठिकाणी दर्शनासाठी ठेवले जाणार आहे, असेही राजहंस यांनी सांगितले. काशी विश्वनाथ कॉरिडॉर आणि अयोध्येतील श्रीराम मंदिरामुळे उत्तर प्रदेशला दरवर्षी सुमारे २२ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्रात ७ व्या क्रमांकावर असलेले उत्तर प्रदेश राज्य आता अग्रस्थानावर पोहोचले आहे. पूर्वी ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या गोव्यालाही असा लाभ निश्चितच मिळू शकतो. मंदिरे म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचा आत्मा आणि कणा आहेत. असेही राजहंस म्हणाले.‌ या तीन दिवसीय महोत्सवासाठी देशविदेशातून २५ हजारांहून अधिक भाविक, साधक, प्रतिष्ठित लोक गोव्यात दाखल होणार आहेत. हे सर्वजण येथे ३ ते ५ दिवस निवास, प्रवास करणार आहेत. यामुळे सर्व स्थानिक व्यवसाय आणि रोजगार यांना चालना मिळणार आहे.‌ महोत्सवाविषयी अधिक माहिती SanatanRashtraShankhnad.in या संकेतस्थळावर मिळू शकेल.
छायाचित्र ओळी छायाचित्रात डावीकडून युवराज गावकर, जयेश थळी, राज शर्मा, सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस, संजय घाडगे, नितीन फळदेसाई,अनिल नाईक

बुधवार, ७ मे, २०२५

गोव्यातील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात ‘हिंदु राष्ट्ररत्न''सनातन धर्मश्री’पुरस्कार वितरण

गोव्यातील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात ‘हिंदु राष्ट्ररत्न''सनातन धर्मश्री’पुरस्कार वितरण मुंबई, दि. ७ मे सनातन धर्म,हिंदुत्वासाठी समर्पित वृत्तीने विशेष कार्य करणाऱ्यांना ‘हिंदु राष्ट्ररत्न’ आणि 'सनातन धर्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. येत्या १७ ते १९ मे या कालावधीत गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी बुधवारी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता घनश्याम उपाध्याय, विरार येथील श्री जीवदानी देवी संस्थानचे अध्यक्ष प्रदीप तेंडोलकर, हिंदू जनजागृती समितीचे प्रवा्ते सतीश कोचरेकर यावेळी उपस्थित होते. संस्थेचे रौप्यमहोत्सवी वर्ष आणि संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा शंखनाद महोत्सव आयोजित करण्यात आला असल्याचे सांगून वर्तक म्हणाले, मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतून २ हजार ५०० हून अधिक हिंदूप्रेमी नागरिक,कार्यकर्ते, हिंदुत्वनिष्ठ संघटना,आध्यात्मिक संस्थांचे प्रतिनिधीही तसेच पदेशातूनही अनेक मंडळी उपस्थित रहाणार आहेत. फार्मागुडी, फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर महोत्सव साजरा होणार आहे. देशांतर्गत आणि बाह्य आव्हानांचा सामना करण्यासाठी सनातन धर्म, त्याची मूल्ये आणि त्याचे रक्षण याची नितांत आवश्यक आहे. 'धर्मेण जयति राष्ट्रम्’ (धर्मामुळे राष्ट्राचा विजय होतो) हे महोत्सवाचे घोषवाक्य आहे.‘सनातन राष्ट्रा’साठी ‘रामराज्य संकल्प जपयज्ञा’द्वारे एक कोटी श्रीरामनामाचा जप करण्यात येणार असल्याचे वर्तक यांनी सांगितले. गोमंतकातील लोककलांचेही सादरीकरण होणार असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील प्राचीन शस्त्रास्त्रे, तसेच सनातन संस्कृती, राष्ट्र, कला, आयुर्वेद, आध्यात्मिक वस्तू यांचे भव्य प्रदर्शन महोत्सवाच्या ठिकाणी भरविण्यात येणार आहे.‌ महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील दहाहून अधिक संतांच्या पादुकांचे दर्शन येथे घेता येणार आहे, अशी माहितीही वर्तक यांनी दिली. अधिक माहिती SanatanRashtraShankhnad.in या संकेतस्थळावर मिळू शकेल.
छायाचित्रात डावीकडून सतीश कोचरेकर,घनश्याम उपाध्याय,अभय वर्तक, प्रदीप तेंडोलकर

मंगळवार, २९ एप्रिल, २०२५

जगद्गुरु आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त डोंबिवलीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

जगद्गुरु आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त डोंबिवलीत विविध कार्यक्रमांचे आयोजन जगद्गुरु आद्य शंकराचार्य सेवा समिती तर्फे शंकराचार्य जयंतीनिमित्त येत्या २ आणि ३ मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.‌ उपनिषद सेवा मंडळ आणि संस्कृत भारती यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक स्तोत्र पठण आणि पंधरावा गीता अध्याय पठण होणार आहे. २ मे रोजी रोजी सायंकाळी पाच ते सहा या वेळेत विद्यार्थी श्रीमद् भगवद् गीतेच्या १५ व्या अध्यायाचे सामुहिक पठण करणार आहेत. सामूहिक स्तोत्र पठण कार्यक्रमात डोंबिवलीतील उपनिषद सेवा मंडळ, संस्कृत भारत, दुर्वांकुर, डोंबिवली कीर्तन कुलसंस्था, श्री गोविंद विश्वस्त न्यास, समग्र श्री विष्णू सहस्त्रनाम समूह, स्वामींचे घर या संस्थांचे सुमारे पावणेदोनशे सदस्य सहभागी होणार आहेत. २ मे या दिवशी सकाळी साडेसहा ते रात्रीपर्यंत काकड आरती, रुद्राक्ष पूजा, सामूहिक उपनयन, कुंकुमार्चन, भजन, अष्टवंदन, तर ३ मे रोजी सकाळी साडेसहा ते दुपारी एकपर्यंत रुद्र स्वाहाकार होम, 'आद्य शंकराचार्य यांचे तत्वज्ञान' या विषयावर प्रवचन इत्यादी कार्यक्रम होणार आहेत. हे सर्व कार्यक्रम अगरवाल हॉल, मानपाडा रस्ता , डोंबिवली पूर्व येथे होणार आहेत‌, नागरिक, भाविकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन जगद्गुरु आद्य शंकराचार्य सेवा समितीचे लक्ष्मीकांत कुलकर्णी, उपनिषद सेवा मंडळाचे गंगाधर पुरंदरे यांनी केले आहे.

सोमवार, २१ एप्रिल, २०२५

योगी आदित्यनाथ यांना शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण लखनऊ, दि. २१ एप्रिल सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गोवा येथे येत्या १७ ते १९ मे या कालावधीत‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे निमंत्रण सोमवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देण्यात आले. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या ‘स्वागत समिती’तील (डॉ.) चारुदत्त पिंगळे, जौनपूर, मडियाहू विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्रकुमार पटेल,विश्वनाथ कुलकर्णी आदी उपस्थित होते. सनातन संस्था’निर्मित श्रीरामाचे सात्त्विक चित्र असलेली मोठी प्रतिमा हिंदु जनजागृती समितीने निर्मिलेली ‘हिंदू राष्ट्र आवश्यक क्यो ?’, ‘हिंदू राष्ट्र स्थापना की दिशा’, ‘हिंदू राष्ट्र खंडण एवं आक्षेप’ आणि ‘हलाल जिहाद’ ही हिंदी भाषेतील पुस्तके मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेट देण्यात आली. सध्या हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न चालू आहेत. अधिकाधिक हिंदूंना संघटित करणे आवश्यक आहे. अशा कार्यक्रमाच्या माध्यमांतून अधिकाधिक हिंदूंना संघटित करण्याचे काम सुरू ठेवावे, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सनातन संस्थेच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

गुरुवार, १७ एप्रिल, २०२५

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव'संकेतस्थळाचे उदघाटन

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव'संकेतस्थळाचे उदघाटन पणजी, दि. १७ एप्रिल सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त येत्या १७ ते १९ मे या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. SanatanRashtraShankhnad.in या इंग्रजी भाषेतील संकेतस्थळाचे उदघाटन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. संकेतस्थळावर सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव, सनातन राष्ट्राचा उद्देश; सनातन राष्ट्राचा शंखनाद करताचे भगवान श्रीकृष्णाचे बोधचिन्ह; सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा परिचय, सनातन संस्थेची माहिती; कार्यक्रमाला उपस्थित रहाणारे संत, महंत, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रतिष्ठित व्यक्ती यांची माहिती, सांस्कृतिक कार्यक्रम, लोककला याची माहिती देण्यात येणार आहे.‌

शनिवार, १२ एप्रिल, २०२५

हिंदू जनजागृती समितीतर्फे सामूहिक गदापूजन

हिंदूंमधील शौर्य जागृती आणि सामर्थ्य वाढविण्यासाठी सामूहिक गदापूजन कार्यक्रम- डॉ. उदय धुरी - देशभरात ५०० ठिकाणी आयोजन ठाणे,दि.१२ एप्रिल हिंदू समाजात शौर्य जागृती आणि सामर्थ्य वाढवण्यासाठी हिंदू जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटनांतर्फे हनुमान जन्मोत्साच्या निमित्ताने शनिवारी संपूर्ण देशात सामूहिक गदापूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते,असे प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांनी केले. मारुतीरायांची ‘गदा’केवळ युद्धातील अस्त्र नव्हे,तर ती धर्मरक्षणाचा संकल्प,अन्यायाविरुद्ध उभे राहणे आणि भगवंताच्या कार्यासाठी अहर्निश झटण्याचे प्रतिक आहे, असेही डॉ. धुरी यांनी सांगितले. देशभरात ५०० ठिकाणी तर ठाणे जिल्ह्यात ठाणे,डोंबिवली,भिवंडी, बदलापुर,अंबरनाथ इत्यादी ठिकाणी गदापूजन झाले. या सर्व कार्यक्रमात युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, असेही डॉ. धुरी म्हणाले. कार्यक्रमांची सुरुवात शंखनादाने झाली.सामूहिक प्रार्थना,‘गदापूजन, श्री हनुमानाची आरती,मारुति स्तोत्रपठण केल्यानंतर ‘श्री हनुमते नम:’ हा सामूहिक नामजपही करण्यात आला.‘रामराज्याच्या स्थापनेसाठी मारुतीरायांचे गुण कसे आत्मसात करावेत’ याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले. तसेच‘रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा’घेण्यात आली.हिंदू जनजागृती समितीकडून देशभरात गेली तीन वर्षे सामूहिक ‘गदापूजन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.