विविध क्षेत्रात प्रसिद्धीस आलेल्या नामवंतांनी, विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी तसेच आपली नोकरी, व्यवसाय आणि संसार सांभाळून सर्वसामान्य कल्याणकर नागरिकांनी कल्याण शहराच्या विकासासाठी आपले योगदान दिले. ही माणसे प्रसिद्धीपासून दूर राहिली आणि विस्मृतीतही गेली. विस्मृतीत गेलेल्या अशा कल्याणकरांचा आणि त्यांच्या कार्याचा परिचय करून देणारी ही लेखमालिका महाराष्ट्र टाइम्सच्या ठाणे प्लस पुरवणीत सुरू झाली आहे.
कल्याणसह अंबरनाथ, बदलापूर या शहरातीलही विस्मरणातील व्यक्तींचा परिचय यात करून देण्यात येणार आहे. पंधरा दिवसांनी एक असे महिन्यातून दोन लेख असतील.
या लेखमालिकेतील पहिला लेख महाराष्ट्र टाइम्सच्या ठाणे प्लस पुरवणीत ७ जानेवारी २०२३ रोजी प्रसिद्ध झाला. कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाची स्थापना ज्यांनी केली त्या सदाशिव मोरेश्वर साठे यांच्यावर होता. त्या लेखाचे क्लिपिंग
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा