रविवार, १७ डिसेंबर, २०२३

राम मंदिर अयोध्येचे केंद्र विश्वचैतन्याचे'

पुस्तक परिचय '

राम मंदिर अयोध्येचे केंद्र विश्वचैतन्याचे'

राम जन्मभूमी मुक्ती आंदोलन आणि कारसेवेचा थरार

शेखर जोशी 

मोरया प्रकाशनने प्रकाशित केलेल्या 'राम मंदिर अयोध्येचे केंद्र विश्वचैतन्याचे' या पुस्तकात राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनाचा संक्षिप्त इतिहास, १९९० आणि १९९२ मध्ये झालेल्या कारसेवेचा थरार आणि आता अयोध्येत उभ्या राहणाऱ्या राम मंदिराच्या कामाची अनुभूती या पुस्तकात सादर करण्यात आली आहे.

डोंबिवलीतील प्रकाश बापट, प्रदीप पराडकर आणि अन्य काही कार्यकर्ते १९९० व १९९२ च्या कारसेवेत प्रत्यक्ष सहभागी झाले होते. कारसेवेचा थरार या सर्वांनी प्रत्यक्ष अनुभवला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य भय्याजी जोशी यांची प्रस्तावना पुस्तकास लाभली आहे. प्रकाश बापट आणि त्यांच्या काही मित्रांनी काही महिन्यांपूर्वी वाराणसी, अयोध्येला भेट दिली होती. बापट यांच्याबरोबर प्रदीप पराडकर, शैलेश दिवेकर, शिरीष गोगटे ही मंडळी होती. बापट यांनी हे अनुभव 'फेसबुक' या लोकप्रिय समाज माध्यमावर 'पर्यटन नव्हे तीर्थाटन' या लेखमालिकेत लिहिले होते. त्या लेखांवर आधारित हे पुस्तक आहे. 

पुस्तकांच्या पहिल्या प्रकरणात श्रीराम जन्मभूमी मुक्ती लढ्याचा पूर्वइतिहास लेखक प्रकाश बापट यांनी सांगितला आहे. सन पंधराशे १५२८ ते २९ या काळात मुघल आक्रमक बाबरचा सेनापती मीर बाकी याने श्रीराम मंदिराचा विध्वंस करून तिथे मशिदीची उभारणी केली आणि तेव्हापासूनच मंदिराच्या पुनर्नमानाचा धडा सुरू झाला वेळोवेळी असंख्य लढाया आंदोलने आणि चळवळ उभारून स्वाभिमानी आणि राष्ट्रप्रेमी हिंदूंनी प्राण्यांची आहुती तिथे आणि हा लढा धगधगत ठेवला त्यानंतर सुमारे ३३२ वर्षांनी सन १८५० मध्ये हिंदूंनी या जागेचा ताबा मिळवण्याची मागणी केली मात्र तत्कालीक शासकाने मागणी फेटाळली. तेव्हापासून ते ५ ऑगस्ट २०२० या दिवशी राममंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडला, इथपर्यंतचा इतिहास थोडक्यात मांडला आहे.

१९९० आणि १९९२ च्या अयोध्येतील कारसेवेसाठी डोंबिवलीतून शंभरहून अधिक कारसेवक गेले होते. लेखकाने पुस्तकात जे अनुभव सांगितले आहेत ते चित्तथरारक आणि अंगावर काटा आणणारे आहेत. वेगवेगळ्या नोकरी, व्यवसायातील या कार्यकर्त्यांनी राममंदिर आणि कारसेवेसाठी प्राण पणाला लावले होते, या सर्वांना मनापासून नमस्कार. ३० ऑक्टोबर १९९० या दिवशी रामजन्मभूमीवरील उध्वस्त केलेल्या मंदिराच्या जागेवरील विवादास्पद वास्तूवर भगवा कसा फडकला, त्याचा दिनक्रम सांगितला आहे.

 राममंदिर प्रकल्प समन्वयक जगदीश आफळे यांचा परिचय तसेच राममंदिर कसे असेल? संपूर्ण परिसरात काय असणार आहे, याची माहितीही देण्यात आली आहे. अयोध्येतील या राममंदिरच्या प्रदक्षिणा मार्गावर रामायणातील निवडक शंभर प्रसंग शिल्पस्वरुपात साकारले जाणार आहेत. महाराष्ट्रातील शिल्पकार प्रमोद कांबळे यांचा महत्त्वाचा सहभाग यात आहे. पुस्तकात कांबळे यांची मुलाखत आहे. 

अयोध्येतील इतर महत्त्वाची ठिकाणे, रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाचा ज्ञानकोश चंपतराय यांची तसेच रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनात ज्यांचे महत्त्वाचे योगदान आहे त्या व्यक्तींची थोडक्यात ओळख पुस्तकात करून देण्यात आली आहे. रामजन्मभूमी मुक्ती आंदोलन, अयोध्येतील नियोजित राममंदिर, अयोध्येतील इतर महत्त्वाची ठिकाणे यांचीही छायाचित्रे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे, श्रीरामजन्मभूमी न्यासचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांचे शुभेच्छा संदेश पुस्तकात आहेत. 

राममंदिर अयोध्येचे केंद्र विश्वचैतन्याचे

मोरया प्रकाशन

पृष्ठे- १२६, मूल्य- १५० रुपये

संपर्क क्रमांक

७०२१९१३६४५/८६००१६६२९७

ई मेल

info@morayaprakashan.com

संकेतस्थळ

www.morayaprakashan.com

शनिवार, १६ डिसेंबर, २०२३

मंदिर आणि पुजारी यांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक

मंदिर आणि पुजारी यांच्या समस्या 

सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक

महाराष्ट्र मंदिर महासंघाने मंदिरांसंदर्भात मांडलेल्या सर्व मागण्यांविषयी सरकार सकारात्मक आहे, तसेच मंदिर आणि पुजारी यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाकडून बैठकांचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी येथे दिली.

येथील विधान भवनात ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या पदाधिकार्‍यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देतांना
 ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे पदाधिकारी

महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि राज्यशासन यांच्यातील समन्वयाचे काम ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले पाहतील, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. 

राज्यातील प्राचीन आणि पुरातन मंदिरांचे संवर्धन अन् जीर्णाेद्धार करावा; मंदिरांच्या भूमीवर झालेली सर्व अतिक्रमणे हटवावीत; अनेक मंदिरे अन् तीर्थक्षेत्रांच्या परिसरात बिअर बार, दारूची दुकाने, मांस विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे मंदिरांचे पावित्र्य राखण्यासाठी मंदिरापासून ५०० मीटरपर्यंत मद्य-मांस यांवर बंदी घालण्यात यावी; तीर्थक्षेत्रे पूर्णपणे ‘मद्य-मांस मुक्त’ करावीत; मंदिरातील पुजार्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था कायद्यात’ सुधारणा करण्यात यावी, तसेच महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या अंतर्गत राज्यातील अनेक प्रमुख मंदिरे येऊन कार्य करत असल्यामुळे महासंघाला ‘अधिकृत संघटना’ म्हणून शासनाने घोषित करावे आदी मागण्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत मांडण्यात आल्या, अशी माहिती ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे राज्य समन्वयक सुनील घनवट, ‘देवस्थान समन्वय समिती विदर्भ’चे अनुप जयस्वाल यांनी दिली.

तुळजापूर देवस्थानातील दागिन्यांच्या घोटाळ्यासंदर्भातील चौकशीसाठी पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍याऐवजी वरिष्ठ अधिकार्‍यांकडून चौकशी करावी, तसेच पंढरपूर, शिर्डी, श्री महालक्ष्मी देवस्थान, श्री सिद्धिविनायक आदी सरकारीकरण झालेल्या मंदिरातील घोटाळे आणि आर्थिक गैरव्यवहार पाहाता सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करून ती भक्तांच्या स्वाधीन करण्यात यावीत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

१६ डिसेंबर २०२३


गुरुवार, १४ डिसेंबर, २०२३

डोंबिवलीत साकारणार ५० हजारांहून अधिक पुस्तकांपासून राममंदिर प्रतिकृती


पै फ्रेंड्स लायब्ररीच्या पुस्तक आदानप्रदान सोहळ्यात

५० हजारांहून अधिक पुस्तकांपासून राममंदिर प्रतिकृती

- १९ ते २८ जानेवारी २०२४ या  दरम्यान डोंबिवलीत आयोजन 

शेखर जोशी

येथील पै फ्रेंड्स लायब्ररी आयोजित पुस्तक आदानप्रदान सोहळ्यात पन्नास हजारांहून अधिक पुस्तकांपासून अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे.‌ येत्या १९ ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीत डोंबिवलीत बहुभाषिक पुस्तक आदानप्रदान सोहळा आयोजित करण्यात आला असून सोहळ्याचे हे सहावे वर्ष आहे.

राममंदिर प्रतिकृती उभारण्याचा शुभारंभ गुरुवारी (१४ डिसेंबर) संध्याकाळी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील प्रा. सुरेंद्र बाजपेयी सभागृहात पार पडला. पै फ्रेंड्स लायब्ररीचे संस्थापक- संचालक पुंडलिक पै यांनी श्रीफळ वाढवून शुभारंभ केला. त्याआधी गणपती, भूमी वराह आणि विष्णुकर्मा पूजा करण्यात आली.‌

कल्याण डोंबिवली महापालिका, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, डोंबिवलीकर सांस्कृतिक परिवार यांचे विशेष सहकार्य या सोहळ्यासाठी लाभले आहे. 'विज्ञान आणि वैज्ञानिक' अशी यावेळच्या पुस्तक आदानप्रदान सोहळ्याची संकल्पना असून त्याअनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, असे पुंडलिक पै यांनी यावेळी सांगितले.

पुस्तकांची ही राममंदिर प्रतिकृती ८० फूट रुंद आणि ४० फूट उंच असून अशा प्रकारे तयार होणारी ही प्रतिकृती भारतातील नव्हे तर जगातील पहिली प्रतिकृती असणार आहे. येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत राममंदिराचे उदघाटन होणार आहे. या दिवशी पुस्तक आदानप्रदान सोहळ्यात सामुहिक रामरक्षा पठण होणार असून यात एक हजार शालेय विद्यार्थी आणि डोंबिवलीकर नागरिक सहभागी होणार आहेत, अशी माहितीही पै यांनी यावेळी दिली.

यावेळी सिद्धेश बागवे (डिझायनर), रवी घाडीगांवकर ( सुतार), नरेश ( वेल्डर), नवनाथ मोरे ( रंगारी) यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. ही मंडळी आणि त्यांचे सहकारी पुस्तकांची राममंदिर प्रतिकृती उभारणार आहेत. कडोंमपाच्या सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील प्रा. सुरेंद्र बाजपेयी सभागृहात हा पुस्तक आदानप्रदान सोहळा होणार आहे.

१४ डिसेंबर २०२३

-----

बुधवार, १३ डिसेंबर, २०२३

शतक महोत्सवी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने राज्यात २२ ठिकाणी 'नाट्यकलेचा जागर'- प्रशांत दामले

 

शतक महोत्सवी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने

राज्यात २२ ठिकाणी 'नाट्यकलेचा जागर'- प्रशांत दामले

- अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून पार पडला

रंगमंचामागील तंत्रज्ञ, कर्मचा-यांचा 'केळवण' सोहळा 

शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने नव्या वर्षात २२ ठिकाणी 'नाट्यकलेचा जागर' आयोजित करण्यात आला असून यादरम्यान विविध सहा स्पर्धा घेण्यात येणार आहेत, अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी मंगळवारी (१२ डिसेंबर) दादर येथे दिली.

ज्येष्ठ निवृत्त नाट्य व्यवस्थापक, रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यावेळी उपस्थित होते.

शतक महोत्सवी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने नेपथ्य व कपडेपट कर्मचारी, बस, टेम्पोचे चालक, क्लिनर आणि नाटकाच्या पडद्यामागील कामगार, कर्मचारी यांच्यासाठी 'केळवण' सोहळा उत्साहात पार पडला‌.

अभिनेत्री प्राजक्ता माळी पंगतीत आग्रह करताना

येत्या ५ जानेवारी रोजी पुणे येथे शतक महोत्सवी नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा होणार असून त्यानंतर महाराष्ट्रात सहा ठिकाणी विभागीय संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. याची सांगता रत्नागिरी येथे शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाने होणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे काम महाराष्ट्रात सर्वदूर पोहचविण्यासाठी 'नाट्यकलेचा जागर' महत्त्वाची भूमिका पार पाडेल, असा विश्वासही दामले यांनी व्यक्त केला.
छायाचित्रात डावीकडून अभिनेत्री भार्गवी चिरमुले, मंजिरी मराठे, श्रद्धा जाधव, प्रशांत दामले, विजय केंकरे, अशोक मुळ्ये 

आजचा केळवण सोहळा म्हणजे शतकमहोत्सवी नाट्य संमेलनाची सुरुवात असून जे काम अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने करायला हवे होते ते मुळ्ये काकांनी केले आहे. नाटकाच्या प्रयोगासाठी आपण सर्व मेहनत घेतो. नाटक म्हणजे एकत्रित, परस्पर सहकार्याचा खेळ असून उत्तम प्रयोग करत राहणे हे आपले काम आहे आणि आपण ते करतच राहू, असेही दामले यांनी सांगितले.

विजय केंकरे म्हणाले, मुळ्ये काकांच्या पहिल्या उपक्रमापासून त्यांच्या सोबत असून शतक महोत्सवी नाट्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आजचा हा कार्यक्रम महत्त्वाचा,कौतुकास्पद आणि आपल्या सर्वांच्या सन्मानाचा आहे. असा आगळा उपक्रम याआधी कोणी केला असेल असे आठवणीत नाही. मुळ्ये काका यापुढेही असेच वेगवेगळे उपक्रम करत राहतील आणि त्या सर्व उपक्रमात आमचाही सहभाग असेल.


स्वाती मिटकरीचा सत्कार करताना प्रशांत दामले, शेजारी विजय केंकरे, अशोक मुळ्ये 

डावीकडून संध्या खरात, प्रज्ञा खरात, प्रशांत दामले, विजय केंकरे, अशोक मुळ्ये 

कार्यक्रमात केशभुषाकार संध्या खरात यांच्या कन्या प्रज्ञा तसेच शिवाजी मंदिर नाट्य गृहातील रंगमंच कर्मचारी पांडुरंग मिटकरी यांच्या कन्या स्वाती यांचा दामले, केंकरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रज्ञा यांनी पदवी परीक्षेत ८४. ५५ टक्के गुण मिळविले असून सध्या त्या जपानी भाषा तसेच 'व्हीएफएक्स' चा अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहेत तर स्वाती या मुंबईत मेट्रो रेल्वेच्या पायलट म्हणून काम करत आहेत.‌

रंगमंचाच्या पाठीमागे राहून नाट्य प्रयोगासाठी महत्त्वाचे योगदान देणाऱ्या नेपथ्य, रंगमंच, प्रकाश योजना, रंगारी, सुतार, कपडेपट इत्यादी तांत्रिक कामे करणारे कामगार, कर्मचारी, नाटकाच्या प्रयोगाच्या बसचे चालक, क्लिनर यांच्यासाठी आणि त्यांच्या मुला, मुलींच्या सत्कारासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचे मुळ्ये काका यांनी प्रास्ताविकात सांगितले.

माजी महापौर श्रद्धा जाधव, अभिनेत्री भार्गवी चिरमुले, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या मंजिरी मराठे यांच्या हस्ते दामले व केंकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता सुग्रास भोजन पंक्तीने झाली. अभिनेत्री प्राजक्ता माळी, श्रद्धा हांडे पंगतीत बसलेल्यांना आग्रह करून वाढत होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन 'एबीपी माझा' चे वृत्त निवेदक अश्विन बापट यांनी केले.

शेखर जोशी



शनिवार, १४ ऑक्टोबर, २०२३

कष्टकऱ्यांचे कैवारी- कृष्णराव धुळप

 

विस्मरणातील कल्याणकर या लेखमालिकेतील पुढील लेख

कष्टकऱ्यांचे कैवारी- कृष्णराव धुळप

महाराष्ट्र टाइम्स-  ठाणे प्लस, १४ ऑक्टोबर २०२३

शुक्रवार, १३ ऑक्टोबर, २०२३

मराठी विश्वकोश निर्मिती मंडळातर्फे ‘वाचन जागर’!

 


माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरी करण्यात येते. यानिमित्ताने महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळातर्फे ‘वाचन जागर’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मराठी विश्वकोशाचे आद्य संपादक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर या जन्मगावी होणारा कार्यक्रम हे यंदाच्या वाचन प्रेरणा दिनाचे वैशिष्ठ्य असल्याचे मंडळाचे अध्यक्ष डॉ.राजा दीक्षित यांनी सांगितले.

१३ ऑक्टोबर रोजी कर्मवीर आ. मा. पाटील महाविद्यालय, पिंपळनेर व दीपरत्न माध्यमिक विद्यालय, पानखेडा, धुळे आणि भीमराव शिंदे महिला महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वाई; १४ ऑक्टोबर रोजी राजाराम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कोल्हापूर आणि १५ ऑक्टोबर रोजी ट्विटर वाचन प्रेरणा साहित्य संमेलन; मराठी विश्वकोश कार्यालयात ग्रंथ प्रदर्शन, असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती डॉ. दीक्षित यांनी दिली.‌

भाषा आणि भाषांतर, विदेशी मराठी साहित्य, वाचन संस्कृती आणि आव्हाने, मराठी विश्वकोश परिचय, कुमार विश्वकोशातील जीवसृष्टी आणि पर्यावरण, वाचन संवाद आदी विविध विषयांवर चर्चा होणार आहे.

 वाई विश्वकोश कार्यालयातील संपादकीय विभाग व प्रशासकीय विभागाकडून या कार्यक्रमांचे संयोजन करण्यात आले आहे.

बुधवार, १६ ऑगस्ट, २०२३

महाकवी कालिदास संस्कृत साधना' पुरस्कार ‘संस्कृतदिनी’च द्यावा

 'महाकवी कालिदास संस्कृत साधना'

 पुरस्कार ‘संस्कृतदिनी’च द्यावा

- सुराज्य अभियाना’ची मागणी

महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना’ पुरस्कारांचे वितरण संस्कृतदिनी अर्थातच ३० ऑगस्ट या दिवशी करण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’ कडून करण्यात आली आहे. या संदर्भात उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. 

राज्य शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या ( २७ जुलै २०१२) शासन निर्णयानुसार ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार’ संस्कृतदिनाच्या दिवशी देण्यात यावा, असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे; मात्र २०१२ पासून आजपर्यंत हा पुरस्कार संस्कृतदिनी देण्यात आलेला नाही. पुरस्कार वर्षअखेरीस डिसेंबर महिन्यात दिले जातात. तसेच दरवर्षी पुरस्कार प्रदान न करता दोन/तीन वर्षांचे पुरस्कार एकत्रितपणे दिले जातात, असे सुराज्य अभियानाचे म्हणणे आहे.

प्राचीन संस्कृत पंडित, वेदमूर्ती, संस्कृत शिक्षक, संस्कृत प्राध्यापक, संस्कृत कार्यकर्ते या पात्रतेतील आठ जणांना हा पुरस्कार दिला जातो. ‘संस्कृतदिन’ आता काही दिवसांवर आला आहे. या दृष्टीने आवश्यक ते नियोजन करण्यास पुरेसा अवधी मिळावा, असे ‘सुराज्य अभियाना’चे समन्वयक अभिषेक मुरुकटे यांनी या निवेदनात म्हटले आहे. 

२०२१ ते २०२३ या वर्षांतील पुरस्कार अद्याप घोषित करण्यात आलेले नाहीत. हा पुरस्कार सुरू केल्यापासून गेल्या दहा वर्षांत पुरस्काराच्या रकमेत एक रुपयाचीही वाढ करण्यात आलेली नाही. ही रक्कम वाढविण्याविषयी मंत्रिमहोदयांची भेट घेतली असता, त्यांनी खात्याचे प्रधान सचिव यांना अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्यास सांगितले होते. त्यालाही आता पाच महिने झाले, याकडेही निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.

शनिवार, ५ ऑगस्ट, २०२३

कर्करोगावर मात केलेल्या लढवय्यांचा आनंद मेळावा!

माजी नाट्य व्यवस्थापक आणि ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून साकारलेला एक आगळा कार्यक्रम नुकताच दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात आयोजित करण्यात आला होता. कर्करोगावर मात करुन आनंदाने आयुष्य जगणाऱ्या लढवय्यांच्या आनंद मेळाव्याचे.

कर्करोगावर मात केलेले ४० जण आपल्या कुटुंबियांसह कार्यक्रमाला उपस्थित होते. कर्करोगावर मात करणारे ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कर्करोगमुक्त पत्रकार नेहा पुरव यांचा वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला.

राजश्री बोरकर, तृप्ती तोडणकर आणि पत्रकार नेहा पुरव यांनी यावेळी आजाराशी दोन हात करण्याचे अनुभव सांगितले आणि कायम सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा कानमंत्र दिला. कर्करोगमुक्त प्रदीप पाटोळे यांनी गाणी म्हटली. 

केतकी भावे- जोशी, जयंत पिंगुळकर यांच्या गाण्यांचा कार्यक्रम यावेळी सादर झाला.



विस्मरणातील कल्याणकर- तत्वनिष्ठ सेवाव्रती


विस्मरणातील कल्याणकर या लेखमालिकेतील पुढील लेख
तत्वनिष्ठ सेवाव्रती- श्रीवल्लभ बापट
महाराष्ट्र टाइम्स- ठाणे प्लस/ ५ ऑगस्ट २०२३


शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०२३

अवयवदान जनजागृती उद्यान



अवयव दान ही काळाची गरज असून याविषयी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण झाली तर अनेक जीव वाचविण्यास मदत होणार आहे. अवयवदानाबाबत जनजागृतीसाठी  राज्यातील पहिले ‘अवयवदान जनजागृती उद्यानʼ ठाण्यात उभारण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच भविष्यात अशा स्वरूपाचे उद्यान राज्यातील इतर शहरात महापालिका आणि नगरपरिषदेतर्फे सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

हे उद्यान कम्युनिटी पार्क, पोखरण रोड नं २, येथील सहा हजार चौरस मीटर जागेवर उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी अवयवदान संदर्भातील माहिती पुस्तिका उपलब्‍ध करून देण्यात येणार असून  प्रस्तावित उद्यानात मूत्रपिंड (किडनी), यकृत ( लिव्हर), हृदय, फुफ्फुस, स्वादुपिंड, छोटे आतडे, डोळे, त्वचा, हाडे, हात या अवयवाच्या आणि पेशींच्या प्रतिकृती उभारण्यात येणार आहेत. तसेच या अवयवांसंदर्भातील माहिती त्याठिकणी मोठ्या फलकावर लावण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. 

अवयवदानासंदर्भातील शास्त्रीय स्वरूपाची माहिती या ठिकाणी देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या उद्यानात अवयव दान करण्याचा प्रतिज्ञा अर्ज नागरिकांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. ज्या नागरिकांना हा अर्ज भरायचा आहे त्यांच्याकडून तेथेच भरून घेण्यात येऊन तो अर्ज नोंदणीकरिता राज्य अवयव आणि उतीपेशी प्रत्यारोपण संस्थेच्या  कार्यालयात सुपूर्द करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.‌

एक मेंदूमृत व्यक्ती अवयवदान करून ८ व्यक्तींना जीवनदान देऊ शकते. गेल्या काही वर्षांत अवयव निकामी झालेल्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच वैद्यकीय विश्वातील प्रगतीमुळे अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहे. त्यामुळे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण पुढे येत आहे. मात्र मेंदूमृत व्यक्तीकडून अवयवदान होण्याची संख्या आणि अवयवाची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या यामध्ये मोठी तफावत आहे. ती दूर करण्यासाठी मेंदूमृत अवयवदान मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे. 

सध्या राज्यात अवयव प्रत्यारोपणासाठी मोठ्या प्रमाणावर रुग्ण प्रतिक्षेत आहेत. ही आकडेवारी पुढीलप्रमाणे 

मुत्रपिंड प्रत्यारोपण - ५,८३२,  यकृत प्रत्यारोपण- १,२८४, 

हृदय प्रत्यारोपण– १०८, फुफ्फुस प्रत्यारोपण – ४८,  स्वादुपिंड प्रत्यारोपण – ३५, छोटे आतडे प्रत्यारोपण – ३

शनिवार, २९ जुलै, २०२३

शतकवीर रक्तदात्यांचा गौरव

शतकवीर रक्तदाते

शंभरपेक्षा अधिकवेळा रक्तदान करुन अनेकांचे प्राण वाचविण्यात मोलाची भूमिका बजाविणाऱ्या आणि खऱ्या अर्थाने शतकवीर असणाऱ्या २० रक्तदात्यांचा विशेष सन्मान बृहन्मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील 'मुंबई जिल्हा एड्स कंट्रोल नियंत्रण सोसायटी'द्वारे नुकताच करण्यात आला.


रक्तदान केल्यामुळे एखाद्या गरजू व्यक्तीचे प्राण वाचू शकतात. पर्यायने त्या व्यक्तीच्या कुटुंबालाही मदत होऊ शकते. ही बाब लक्षात घेता रक्तदान हे एक सामाजिक कार्य असून सर्व निरोगी व्यक्तींनी नियमितपणे रक्तदान करावे, असे आवाहन मुंबई जिल्हा एड्स कंट्रोल सोसायटी अर्थात एम-डॅक्सचे संचालक आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त  रमाकांत बिरादार यांनी यावेळी केले.  

अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. विजयकुमार करंजकर, सहाय्यक संचालिका (रक्त संक्रमण सेवा) श्रीमती. अपर्णा पवार, रक्त केंद्र अधिकारी, समुपदेशक आणि समाज विकास अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

रक्तदानाबरोबरच प्लेटलेट, नेत्रदान, अवयव-दान आणि देहदान यासाठी देखील सर्वांनीच पुढाकार घेणे आणि आपल्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींना यात सहभागी करून घेणे अत्यंत आवश्यक असल्याचेही बिरादार यांनी सांगितले. 

शतकवीर रक्तदात्यांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉक्टर अविनाश सुपे, ज्येष्ठ पत्रकार  प्रसाद मोकाशी यांच्यासह किरण राजूरकर, विश्वेश लेले,  संजय डोबके, हिरोस खंबाटा, विठ्ठल शितोळे, संतोष मिश्रा, तरुण भगत, सतीश सावंत, राजेंद्र कुलकर्णी, संजय लवांडे, गणेश आमडोसकर, मनीष सावंत, मंतोष केळकर, विलास घाडीगावकर, गजानन नार्वेकर, डॉ. प्रगती वाझा, प्रशांत म्हात्रे दिव्या चंडोक यांचा समावेश आहे.

शनिवार, २२ जुलै, २०२३

रुग्णसेवाव्रती- डॉ. गणेश गंगाधर रायकर

विस्मरणातील कल्याणकर या लेखमालिकेतील पुढील लेख रुग्णसेवाव्रती- डॉ. गणेश गंगाधर रायकर

महाराष्ट्र टाइम्स- ठाणे प्लस/ २२ जुलै २०२३

 

सोमवार, १० जुलै, २०२३

तर भारताचा 'फ्रान्स' होईल

 

भारतातील घुसखोरांविषयी कठोर पावले

 उचलली नाहीत तर भारताचा 'फ्रान्स' होईल 

- अनिल धीर यांचा इशारा 

फ्रान्समध्ये लादलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या अपयशाचे गंभीर परिणाम फ्रान्समधील नागरिक भोगत आहेत. भारतात अवैध पद्धतीने रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांना अनेक ठिकाणी वसविले जात असून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. या घुसखोरांविषयी केंद्र सरकराने कठोर पावले उचलली नाहीत तर भारताचाही 'फ्रान्स' होईल, असा इशारा ओडिशा, भुवनेश्वर येथील ‘इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज’चे संयोजक, अभ्यासक अनिल धीर यांनी दिला.‌

हिंदू जनजागृती समितीने आयोजित केलेल्या 'फ्रान्सची आग भारतापर्यंत येईल का ?’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.

एक सेक्युलर देश म्हणून युरोपमध्ये फ्रान्सचे उदाहरण दिले जाते. दुसर्‍या महायुद्धानंतर फ्रान्सने आपल्या सीमा शरणार्थींसाठी खुल्या केल्या. आता फ्रान्समध्ये ज्या दंगली होत आहेत, त्या अचानक होत नसून गेल्या ३० ते ४० वर्षांपासूनची तयारी आहे, असेही धीर यांनी सांगितले. 

पोलंड आणि जपान या देशांनी सुरुवातीपासूनच अवैध घुसखोरी होऊ दिली नाही. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसुद्धा याच धर्तीवर प्रयत्नरत आहेत. हिंसाचारानंतर आता फ्रान्समध्ये कठोर कायदे लागू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या स्थितीवरून भारताने धडा घेऊन अवैध घुसखोरी आणि वास्तव्याविषयी देशात कठोर कायदे लागू करायला हवेत, असेही धीर म्हणाले.

सध्या फ्रान्समध्ये दंगली घडवून आणल्या जात असून तो पूर्वीपासूनच अल्पसंख्यांकांचा ‘ग्लोबल पॅटर्न’ राहिला आहे. प्रथम शरणार्थी म्हणून जायचे, नंतर तेथील संस्कृती, वारसा, ऐतिहासिक वास्तू नष्ट करून तेथील लोकांनाच शरणार्थी बनवून तिथे ‘दार-उल-इस्लाम’चे राज्य आणायचे. काही वर्षापूर्वी भारतामध्येही अवैध पद्धतीने आलेले रोहिंग्या मुसलमान यांचाही असाच धोका असून आज भारतात अनेक ‘मिनी पाकिस्तान’ निर्माण झाले आहेत., असे विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी सांगितले.

जर्मनी येथील लेखिका मारिया वर्थ म्हणाल्या, सध्या फ्रान्समध्ये झालेल्या दंगली पूर्वनियोजित होत्या. फ्रान्स आणि विविध देशांतील राजकीय नेते शरणार्थीं मुसलमानांचा दंगली अन् हिंसाचार करण्यासाठी वापर करत आहेत; मात्र फ्रान्समध्ये शरणार्थी मुसलमानांनी घडवून आणलेल्या दंगलीचे समर्थन करण्याची आवश्यकता नाही. एकंदरीत फ्रान्समधील स्थिती पाहता भारताने खूप सतर्क रहायला हवे.

शनिवार, ८ जुलै, २०२३

अजातशत्रू- गणेश कृष्ण ऊर्फ गणपतराव फडके

विस्मरणातील कल्याणकर या लेखमालिकेतील पुढील लेख.

अजातशत्रू- गणेश कृष्ण ऊर्फ गणपतराव फडके

महाराष्ट्र टाइम्स- ठाणे प्लस/ ८ जुलै २०२३

सोमवार, ३ जुलै, २०२३

या लोकांना सोबत घेणे चुकीचेच

अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ,धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप, चौकशी बासनात गुंडाळणार 

- या लोकांना सोबत घेणे चुकीचेच, समर्थन होऊच शकत नाही 

शेखर जोशी

या सर्व लोकांच्या विरोधात तेव्हाचे मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या इतरही नेत्यांनी जोरदार रान उठविले होते. भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या तर या लोकांच्या मागे हात धुवून लागले होते. अनेक कागदपत्रे त्यांनी जमा केली होती. ते सर्व पुरावे संबंधित यंत्रणांना दिले होते. ते सगळे आता चुलीत घालावे लागतील.

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसने ७० हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा जाहीर आरोप केला होता. दोन दिवसांत अशी काय जादू झाली की आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली की या लोकांना थेट मंत्रिमंडळात घेतले? हा निर्णय नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी घेतला आणि देवेंद्र फडणवीस यांच्या गळी उतरवला की देवेंद्र फडणवीस यांनी मोदी, शहांच्या गळी उतरवला?

अजित पवार यांच्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून देण्यात आलेल्या कर्जामध्ये अनियमितता झाल्याचा आरोप आहे. आर्थिक गुन्हे शाखा जनहित याचिकेच्या आधारे चौकशी करत आहे. या प्रकरणी ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हाही दाखल केला आहे. सप्टेंबर २०२० मध्ये, आर्थिक गुन्हे शाखेने विशेष न्यायालयाला सांगितले, अजित पवार यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत आणि या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केला. मात्र याला ईडीने विरोध केला, पण न्यायालयाने हा आक्षेप फेटाळून लावला. सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, आर्थिक गुन्हे शाखेने हे प्रकरण बंद केले असेल तर ईडी देखील अधिक तपास करू शकत नाही.

अजित पवार हे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये जलसंपदा मंत्री आणि विदर्भ पाटबंधारे महामंडळाचे अध्यक्ष असताना सिंचन प्रकल्पांमध्ये घोटाळ्याचे आरोप झाले होते. जनहित याचिकांच्या आधारे, महाराष्ट्र एसीबीने या प्रकरणांमध्ये न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास सुरू केला. २०१९ मध्ये, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तीन दिवसांचे सरकार स्थापन केल्याच्या एका दिवसानंतर, एसीबीने त्यांना क्लीन चिट देत मुंबई उच्च न्यायालयात अहवाल सादर केला. मात्र न्यायालयाने हा अहवाल अद्याप स्वीकारलेला नाही. 

२००६ मध्ये तीन प्रकल्पांसाठी १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या कंत्राटांमधील कथित अनियमिततेची चौकशी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छगन भुजबळ यांच्यासह १६ जणांविरुद्ध २०१५ मध्ये गुन्हा दाखल केला. तेव्हा भुजबळ राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते.

दिल्लीतील महाराष्ट्र सदन, अंधेरीतील नवीन आरटीओ कार्यालय आणि मलबार हिल येथे गेस्ट हाऊस बांधण्यासाठी चमणकर डेव्हलपर्सला कंत्राटे देण्यात आली होती. ईडीने मनी लाँड्रिंगचा आरोप करत वेगळा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी भुजबळ यांना अटक झाली. दोन वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर २०१७ मध्ये त्यांना जामीन मिळाला. महाविकास आघाडी सत्तेवर असताना सप्टेंबर २०२१ मध्ये विशेष न्यायालयाने भुजबळ आणि इतरांना दोषमुक्त केले. मात्र न्यायालयाच्या या आदेशाविरोधात जानेवारी २०२३ मध्ये एका कार्यकर्त्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल दाखल केली, ती अद्याप प्रलंबित आहे. 


प्रफुल पटेल हे ही ईडी चौकशीच्या फेऱ्यात आहेत. पटेल यांनी अंमली पदार्थाचा तस्कर इकबाल मिर्चीकडून जमीन हस्तांतरण आणि आर्थिक व्यवहार केल्या प्रकरणी ईडी चौकशी करत आहे. 

सरसेनापती  संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी लिमिटेड आणि त्याच्या कुटुंबाशी संबंधित कंपन्यांच्या कामकाजात कथित अनियमितता प्रकरणी मुंबईत ईडीकडून हसनची चौकशी सुरू आहे. मुंबईतील विशेष न्यायालयात आणि मुंबई उच्च न्यायालयात केलेल्या युक्तिवादात मुश्रीफ यांनी आपल्यावरील खटला हा कट असल्याचे म्हटले होते. मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायालयाने एप्रिलमध्ये फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्यांना अंतरिम दिलासा दिला. गेल्या आठवड्यात ती ११जुलैपर्यंत वाढवण्यात आली. या प्रकरणी त्यांच्या तीन मुलांविरुद्धही ईडी चौकशी करत आहे. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायालयात प्रलंबित आहेत.

बीडमधील १७ एकराचा वादग्रस्त भूखंड अवैधपणे खरेदी केल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ईडीनं केस दाखल केली आहे.

संकलन- शेखर जोशी

(राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवरील आरोपाचे संकलन माहितीच्या महाजालावरून केले आहे)

शनिवार, १ जुलै, २०२३

सर्व मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे ‘मद्य-मांस मुक्त’ करावीत

पंढरपूर, देहू, आळंदी, पैठणसह सर्व मंदिरे

आणि तीर्थक्षेत्रे ‘मद्य-मांस मुक्त’ करावीत 

- वारकरी अधिवेशनात एकमुखी मागणी 

‘हरिद्वार’ आणि ‘ऋषिकेश’ या तीर्थक्षेत्रांच्या धर्तीवर श्रीक्षेत्र पंढरपूर, देहू, आळंदी अन् पैठण ही तीर्थक्षेत्रे, तसेच राज्यातील सर्व मंदिरे अन् तीर्थक्षेत्रे यांचा परिसर शंभर टक्के ‘मद्य-मांस मुक्त’ करण्यात यावा; पंढरपूर येथील चंद्रभागा आणि आळंदी येथील इंद्रायणी नदीत सांडपाणी सोडण्यास बंदी घालावी; सर्व तीर्थक्षेत्रे, मंदिरांमध्ये ‘वस्त्रसंहिता’ लागू करावी, अशा मागण्या पंढरपूर येथील वारकरी अधिवेशना’त करण्यात आल्या.

वारकर्‍यांच्या विविध प्रश्नांसाठी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथील श्री बालयोगी महाराज मठ, दत्तघाट येथे ‘वारकरी संप्रदाय’, ‘हिंदु जनजागृती समिती’ आणि ‘परमहंस परिव्राजकाचार्य श्री स्वामी नारायणानंद सरस्वती’ यांच्या संयुक्त विद्यमाने वारकरी अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.

या प्रसंगी सर्वांनी कोणत्याही परिस्थितीत ‘हलाल उत्पादने’ विकत घेणार नाही, असा निर्धार व्यक्त केला. अधिवेशनासाठी वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

वारकरी संप्रदायात हिंदुत्वाचे कार्य करण्याची शक्ती रक्ताच्या थेंबाथेंबात आहे हे वैकुंठवासी पूजनीय वक्ते महाराज यांनी दाखवून दिले आहे. सर्व प्रकरच्या ‘जिहाद’ला प्रत्युत्तर देण्यासाठी वारकरी संप्रदायाने प्रत्येक ठिकाणी हिंदूंचे प्रबोधन केले पाहिजे.  जे ‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणतात त्यांना त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्याची आवश्यकता आहे, असे हभप प्रकाश महाराज जवंजाळ यांनी सांगितले.

पंढरपूर हे पवित्र तीर्थक्षेत्र असूनही येथे सर्रास मद्य-मांस विक्री केली जाते हे दुदैवी आहे. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मद्य-मांस विक्रीवर बंदी असावी. त्यासाठी कठोर कायदा व्हावा, यासाठी समस्त वारकरी आणि हिंदू यांनी सरकारवर दबाव आणायला हवा, असे ह.भ.प. रामेश्वर शास्त्री महाराज म्हणाले. 

सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी.एम्. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती शिवराज पाटील यांच्या खंडपीठाने ‘हरिद्वार’ आणि ‘ऋषिकेश’ या तीर्थक्षेत्रांत नगरपालिका प्रशासनाने आणलेली ‘मांस-मद्य’ यांवरील बंदी कायम ठेवली होती. त्याचधर्तीवर महाराष्ट्र शासनाने हा निर्णय राज्यात तात्काळ लागू करावा, असे हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक आणि ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे राज्य समन्वयक सुनील घनवट यांनी सांगितले.

ह.भ.प. मारुती महाराज तुणतुणे, ह.भ.प. नरहरि महाराज चौधरी, हिंदू जनजागृती समिती’चे धो सोलापूर, बीड आणि लातूर जिल्हा समन्वयक  राजन बुणगे, हिंदू जनजागृती समितीचे युवा संघटक हर्षद खानविलकर यांनीही विचार मांडले. सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे डॉ. श्रीपाद पेठकर यांनी केले. 

सर्व मंदिरे सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करावीत; हलाल प्रमाणपत्र असलेल्या उत्पादनांवर बहिष्कार घालावा; गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी; लव्ह जिहाद, धर्मांतरबंदी कायदे लागू करण्यात यावेत; हिंदू देवी-देवता, संत, श्रद्धास्थानांचे विडंबन रोखण्यासाठी कठोर कायदा करावा आदी ठराव अधिवेशनात संमत करण्यात आले.



शुक्रवार, ३० जून, २०२३

विलेपार्ले आणि डोंबिवलीत 'घन बरसे'!

 विलेपार्ले आणि डोंबिवलीत 'घन बरसे'!

गोपीनाथ सावकार स्मृती विश्वस्त निधी आणि दि गोवा हिंदू असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ८ आणि ९ जुलै रोजी अनुक्रमे विलेपार्ले व डोंबिवलीत 'घन बरसे' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात 'मल्हार' रागाचे विविध प्रकार सादर केले जाणार आहेत

 ८ जुलैला विलेपार्ले  येथील साठ्ये महाविद्यालय सभागृहात  तर ९ जुलैला टिळकनगर विद्या मंदिराचे पेंढरकर सभागृह, डोंबिवली पूर्व येथे हे कार्यक्रम होणार आहेत. दोन्ही कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी साडेपाच अशी आहे.

योगेश हुंसवाडकर, महेश कुलकर्णी, विनायक नाईक, संजय देशपांडे, सारंग कुलकर्णी हे कलाकार हा कार्यक्रम सादर करणार आहेत. 

'मल्हार' रागाची ओळख, पावसाचे आणि महाराष्ट्र व सीमेपल्याड  संगीत संपन्न अशा बेळगाव धारवाड भागातील मल्हार आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा रसिक श्रोत्यांसमोर सादर केला जाणार आहे, अशी माहिती  कार्यक्रमाचे संकल्पनाकार आणि सुसंवादक  सुभाष सराफ यांनी दिली. दोन्ही कार्यक्रमांना विनामूल्य प्रवेश आहे


गुरुवार, २९ जून, २०२३

सांडपाण्यावर प्रक्रिया करुन पुनर्वापर करणार

दक्षिण मुंबईतील झोपडपट्टी परिसरातील 

सांडपाण्यावर प्रक्रिया करुन पुनर्वापर करणार 

- प्रकल्पांतर्गत ४ प्रक्रिया केंद्रे उभारण्याचे काम प्रगतीपथावर

सागरी किनारा मार्ग प्रकल्प परिसर व समुद्रालगत असणा-या झोपडपट्ट्यांमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्या पाण्याचा पुनर्वापर करण्याचा पथदर्शी प्रकल्प बृहन्मुंबई महापालिकेने हाती घेतला आहे. प्रकल्पांतर्गत ४ ठिकाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात येत असून याद्वारे दररोज तब्बल ४ लाख ८५ हजार लीटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. 

पथदर्शी प्रकल्पातील ४ प्रक्रिया केंद्रांद्वारे प्रक्रिया केलेले पाणी परिसरातील शौचालयांमध्ये आणि उद्यानांमध्ये वापरण्यात येणार आहे. शिवाजी नगर येथील प्रक्रिया केंद्राचे काम आता अंतिम टप्प्यात असून उर्वरित ३ प्रक्रिया केंद्रांचे काम देखील वेगात सुरु आहे. शिवाजी नगर येथील प्रक्रिया केंद्राची क्षमता ही दररेज ५० हजार लीटर (KLD) सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची असून दर्या सागर प्रक्रिया केंद्राची क्षमता ही ३५ हजार लीटर इतकी आहे. तर दर्या नगर व मार्कंडेश्वर मंदिराच्या मागील परिसर येथील प्रक्रिया केंद्रांची क्षमता ही अनुक्रमे दररोज १ लाख लीटर व ३ लाख लीटर इतक्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची असणार आहे, अशी माहिती व्यवसाय विकास विभागाच्या प्रमुख आणि स्माईल कौन्सिलच्या संचालक शशी बाला यांनी दिली.

परिसरातील सांडपाण्यावर जागीच प्रक्रिया व्हावी आणि ते पुन्हा वापरता यावे, यासाठी स्माईल कौन्सिलच्या माध्यमातून आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी इंद्र कांत झा यांच्या ‘एमर्जी एन्वायरो’ या स्टार्टअपने विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर आधारित ‘इंटिग्रेटेड वेटलँड टेक्नॉलॉजी’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला असल्याचे शशी बाला यांनी सांगितले. 

शुक्रवार, २३ जून, २०२३

भूमिकांची उलटापालट आणि दुतोंडीपणा उघड

'आदिपुरुष'च्या निमित्ताने...

भूमिकांची उलटापालट आणि दुतोंडीपणा उघड 

शेखर जोशी

ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' या वादग्रस्त, बिभत्स चित्रपटाच्या निमित्ताने तथाकथित ढोंगी पुरोगामी आणि प्रतिगामी यांच्या भूमिकांची उलटापालट झाली असल्याचे दिसून येत आहे. आणि या दोन्ही बाजूंचा दुतोंडीपणाही उघड झाला आहे.

सहा महिन्यांपूर्वी या चित्रपटाचा टिझर/ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्याचवेळी दिग्दर्शक ओम राऊत आणि चित्रपटाच्या सादरीकरणावर प्रचंड टीका झाली. खरे तर त्या टिझरवरूनच चित्रपट टुकार, बीभत्स आणि तमाम भारतीयांच्या मनातील रामायणाचे प्रतिमाभंजन करणारा आहे हे लक्षात आले होते. त्यावेळी भाजपचे आमदार राम कदम यांनी चित्रपटाला विरोध केला तर मनसेचे अमेय खोपकर यांनी राऊत यांना समर्थन दिले. चित्रपट पूर्ण पाहा आणि मग ठरवा, ओम राऊत हे हिंदुत्ववादी आहेत, अशी भलामण त्यांनी केली. चित्रपट प्रदर्शित झाला. आणि आता भाजपचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे सर्व नेते, लोकप्रतिनिधी यांची आणि मनसेची, राज ठाकरे यांचीही अळी मिळी गुप चिळी आहे.

आधुनिक काळातील क्रूरकर्मा मुस्लिम दहशतवादी किंवा इतिहासातील क्रूरकर्मा अफझलखानासारख्या दिसणा-या विध्वंसक मुसलमानाच्या वेषातील रावण, त्याच्याच जवळ जाणारा हनुमान, बीभत्स आणि वटवाघूळ सदृश्य पुष्पक विमान, काळोखी लंका, टॅट्यू काढलेला इंद्रजित, हनुमानाच्या तोंडी दिलेले 'जली' असले टपोरी प्रकारचे संवाद आणि बरेच काही. हे सर्वच न पटणारे आहे. काहीतरी नवीन, वेगळे करण्याच्या नावाखाली, दिग्दर्शकीय स्वातंत्र्याच्या नावाखाली ओम राऊत यांनी ज्या विकृत, बीभत्स पद्धतीने आदिपुरुष सादर केला आहे, ते पाहता कोणाही सुजाण, भारतीय संस्कृती, आपले वेद, पुराणे, पौराणिक देव देवता याविषयी आस्था, प्रेम, आदर असणा-यांना चीडच येईल. झापडे लावून याचे समर्थन करणेच चुकीचे आहे. 

हिंदुत्व, भारतीय संस्कृती, परंपरा याचा अभिमान, गर्व असणारी लोकं उजवी म्हणून ओळखली जातात, त्यांना कुचेष्टेने प्रतिगामी म्हटले जाते. तर बहुसंख्यांकांची आस्था, त्यांची दैवते, हिंदुत्व, हिदू संस्कृतीची टिंगल टवाळी करणे, अल्पसंख्याकांचे विशेषतः मुस्लिमांचे लांगुलचालन करणे म्हणजे पुरोगामी असल्याचे समजले जाते. काश्मीर फाईल्स, केरळ स्टोरी या चित्रपटांना याच ढोंगी पुरोगामी मंडळींनी विरोध केला. खरे तर भारतात काश्मीर प्रश्नांबाबत जे काही घडले त्याचे आणि लव्ह जिहादच्या भयाणतेचे वास्तव चित्रण अनुक्रमे या दोन्ही चित्रपटातून सादर करण्यात आले. ते कटू असले तरी सत्य होते. इतर वेळी भावना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढणा-या ढोंगी पुरोगामी मंडळींनी दोन्ही चित्रपटाला विरोध केला. यात सर्व कॉंग्रेसी,डावे, समाजवादी, निधर्मवादी, सर्वधर्मसमभाववादी या पुरोगाम्यांचा समावेश होता. दोन्ही चित्रपटांवर बंदी घालण्यात यावी अशी मागणीही यांनी केली होती. तर हिंदुत्ववादी म्हणवून घेणारा भाजप, कट्टर हिंदुत्ववादी संघटना असलेल्या विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि इतर काही हिंदुत्ववादी संघटना, नेते यांनी या चित्रपटांचे समर्थन केले. 

आता आदिपुरुष बाबतीत याच भूमिकांची उलटापालट झाली आहे. आदिपुरुष म्हणजे रामायणाचे आणि त्यातील व्यक्तिरेखांचे उघडपणे केलेले प्रतिमाभंजनच आहे हे दिसताय. पण तरीही महाराष्ट्रातील किंवा देशातील एकाही भाजप नेत्यांने, लोकप्रतिनिधीने, पदाधिकाऱ्यांने चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केलेली नाही. सादरीकरणावरून दिग्दर्शक ओम राऊत, संवाद लेखक मनोज मुंतशीर यांचा विरोध/ निषेध केलेला नाही. 'पठाण' चित्रपटात भगवी बिकिनी घातली म्हणून तो चित्रपट बंद पाडण्याची भाषा करणारे हिंदुत्ववादी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदिपुरुषबाबत मूग गिळून गप्प आहेत. आणि याच्या उलट डावे, कॉंग्रेसी, समाजवादी असे तथाकथित पुरोगामी चित्रपटाच्या विरोधात बोलत आहेत. बंदी घालण्याची मागणी करत आहेत. राज ठाकरे, मनसेही गप्प आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही भाजपसोबत आलो असे सांगणा-या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही चित्रपटाचा निषेध किंवा विरोध केलेला नाही. आता शिंदे गटातील खासदार श्रीरंग बारणे यांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. 


मुळात हा चित्रपट केंद्रीय सेन्सॉर बोर्डाने मंजूर कसा केला हे कोडे आहे. याच केंद्रीय सेन्सॉर बोर्डावर प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक वामन केंद्रे, हिंदुत्ववादी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक रमेश पतंगे सदस्य आहेत. चित्रपटासाठी तज्ज्ञ अभ्यासक म्हणून व्याख्याते, प्रवचनकार सच्चिदानंद शेवडे यांनी काम केले आहे. ज्या देवदत्त नागे यांनी 'खंडोबा' ची भूमिका केली ते या चित्रपटात हनुमानाच्या भुमिकेत आहेत. याशिवाय अजय अतुल, प्रसाद सुतार, तेजस्विनी पंडित, सोनाली खरे ही मंडळीही चित्रपटाशी संबंधित आहेत. या सर्वांनी झापडे लावून, डोळ्यांवर पट्टी बांधून काम केले का? चित्रपटाचा टिझर आणि आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, सर्व स्तरातून प्रचंड टीका होत असताना, समाज माध्यमांतूनही अत्यंत प्रक्षुब्ध भावना व्यक्त होत असताना ही सर्व मंडळी गप्प आहेत. ओम राऊत, मनोज मुंतशीर यांच्याकडून किंवा वरील अन्य काही जणांकडून केलेल्या कृतीचे समर्थन करण्यात येत आहे ते अजिबात न पटणारे व चीड आणणारे आहे. तुम्ही चुकलात, माती खाल्ली हे मान्य करायला, कबुली द्यायला हिंमत लागते, ती तुम्ही दाखवावी.

तुमच्याविषयी सर्वसामान्य मराठी माणसांच्या मनात जी प्रतिमा आहे, त्याला तुम्ही स्वतःच तडा देण्याचे कृती केली आहे. 'काम केले/झाले, सर्व काही मिळाले' आता होऊ दे काहीही. समाज माध्यमातून लोक चार दिवस बोलतील आणि विसरून जातील., अशी तुमची भूमिका आहे आणि असणार. म्हणूनच तुम्ही सर्व गप्प आहात. तुमचेही बरोबरच आहे म्हणा. खरेच आहे, लोकं चार, आठ दिवसांत सर्व काही विसरून जातात. अशा लिहिण्याने काही फरक पडणार नाही, हे माहीत असूनही मनातील खदखद व्यक्त केली आहे. मला वाटले ते लिहिले.

शेखर जोशी

२३ जून २०२३

गुरुवार, २२ जून, २०२३

देशभरात 'लव्ह जिहाद'च्या विरोधात मोहीम

 

डावीकडून  रमेश शिंदे, डॉ. चारुदत्त पिंगळे, चित्तरंजन स्वामी महाराज, नीरज अत्री, जयेश थळी

 ‘दी केरल स्टोरी’ या चित्रपटानंतर देशभरात लव्ह जिहादची भीषणता दर्शवणारी अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत. अशा वेळी हिंदू मुली आणि पालक यांच्यात अधिक जनजागृती करणे आवश्यक असल्याने 'लव्ह जिहाद'च्या विरोधात वर्षभर मोहीम राबवली जाणार आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ.चारुदत्त पिंगळे यांनी येथे दिली.

फोंडा, गोवा येथे हिंदू जनजागृती समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या समारोप पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने महाराष्ट्रात १३१ मंदिरांत वस्त्रसंहिता लागू झाल्यावर कर्नाटक, छत्तीसगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आदी अनेक राज्यांतूनही ‘मंदिर महासंघ’ स्थापन करण्याची मागणी आली आहे. त्यानुसार त्या त्या राज्यांत महासंघ स्थापन करण्यात येणार आहेत. तसेच त्याद्वारे एक हजारांहून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले असल्याचेही डॉ. पिंगळे यांनी सांगितले.

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने हिंदुहिताच्या उपक्रमांना गती देण्यासाठी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर हिंदु संघटनांचे एकत्रीकरण करून देशभरात ‘हिंदु राष्ट्र समन्वय समित्या’ स्थापन करण्यात येणार आहेत. हिंदू राष्ट्र आणि हिंदुहिताच्या सूत्रांवर कार्य करण्याचे वचन देणारे राजकीय पक्ष आणि प्रामाणिक लोकप्रतिनिधींनाच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हिंदूंचा पाठिंबा मिळेल, असेही ते म्हणाले.

 अधिवेशनात भारत आणि नेपाळ यांना हिंदु राष्ट्र घोषित करणे; लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गोवंश हत्या विरोधी कठोर कायदा करणे; हलाल सर्टिफिकेशनवर बंदी आणणे; मंदिरांचे सरकारीकरण रहित करणे; ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’ अन् ‘वक्फ’ कायदे रहित करणे; जनसंख्या नियंत्रण कायदा करणे; काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन आदी विषयांवर ‘हर हर महादेव’च्या जयघोषात एकमताने ठराव संमत करण्यात आले असल्याची माहिती हिंदू जनजागृती समिती’चे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी दिली.‌

गोमंतक मंदिर महासंघा’चे सचिव जयेश थळी म्हणाले, या अधिवेशनात देशभरातून मंदिर विश्वस्त सहभागी झाले होते. त्यात ‘मंदिरे सरकारीकरण आणि अतिक्रमण यांतून मुक्त करणे’ या मुख्य मागणीसह देशभरात ‘मंदिर संस्कृती रक्षण आणि संवर्धन’ यांसाठी कर्नाटक, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली या राज्यांमध्ये राज्यस्तरीय मंदिर परिषदांचे आयोजन करण्याचे ठरले आहे. 

देशभरात विशेषत: ईशान्येकडील राज्यांत होत असलेले हिंदूंचे धर्मांतर ही मोठी समस्या आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘धर्मांतर हे राष्ट्रांतर’ असल्याचे जे सांगितले होते ते आपण मणिपूर येथील हिंसाचारावरून अनुभवत आहोत. असे प्रकार अन्य राज्यांत घडू नयेत यासाठी कठोर धर्मांतरविरोधी कायदा तातडीने करण्याची आवश्यकता आहे, असे त्रिपुरा येथील ‘शांती काली आश्रमा’चे चित्तरंजन स्वामी यांनी सांगितले.‌

हरियाणा येथील ‘विवेकानंद कार्य समिती’चे अध्यक्ष नीरज अत्री म्हणाले, देशाच्या रक्षणासाठी आणि हिंदूंना जागृत करण्यासाठी करण्यात येणार्‍या वक्तव्यांना ‘हेट-स्पीच’ ठरवून हिंदूंवर एकतर्फी कारवाई चालू आहे. यासंदर्भात कायदेशीर लढा कसा देता येईल, यावरही देशभरातून आलेल्या अधिवक्त्यांनी चर्चा केली.

अधिवेशनात भारतातील बहुसंख्य हिंदूंना न्याय देण्यासाठी संविधानातील ‘सेक्युलर’ आणि ‘सोशालिस्ट’ शब्द वगळून तेथे ‘स्पिरिच्युअल’ शब्द घालावा आणि भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करावे, देशभरात श्रद्धा वालकर, साक्षी, अनुपमा अश्या अनेक हिंदू मुलींची लव्ह जिहादींनी निर्घृणपणे हत्या केली आहे. या समस्येवर उपाय म्हणून देशपातळीवर कठोर असा ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करण्यात यावा, हिंदूंच्या मूलभूत अधिकारांचे हनन करणारा ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट 1991’ आणि ‘वक्फ’ कायदा त्वरित रहित करून काशी, मथुरा, ताजमहल, भोजशाळा आदी मोगल आक्रमकांनी बळकावलेली हजारो मंदिरे आणि भूमी हिंदूंच्या ताब्यात द्यावी, देशभरातील शासनाच्या नियंत्रणातील सर्व मंदिरांचे सरकारीकरण रहित करून मंदिरे भक्तांच्या हाती सोपवावीत, तसेच मंदिरांसाठी ‘हिंदु बोर्ड’ स्थापन करून त्यात शंकराचार्य, धर्माचार्य, भक्त, पुजारी, धर्मनिष्ठ न्यायाधीश आणि अधिवक्ते यांचा समावेश करण्यात यावा, केंद्रशासनाने संपूर्ण देशात ‘गोवंश हत्या बंदी’ आणि ‘धर्मांतरबंदी’ करणारे कायदे संमत करावेत, ‘समांतर अर्थव्यवस्था’ निर्माण करणार्‍या ‘हलाल सर्टिफिकेशन’ वर त्वरित बंद घालावी आणि अन्य ठराव मंजूर करण्यात आले.


मुख्यमंत्रीपदी बसण्यासाठी मिंधे कोण झाले?


मुख्यमंत्रीपदी बसण्यासाठी मिंधे कोण झाले? 

 उबाठा गटाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, उबाठा गटाचे 'उत' आलेले खासदार, प्रवक्ते सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख मिंधे म्हणून करत असतात. पण खरे मिंधे उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहेत. सत्तेसाठी, मुख्यमंत्रीपदावर बसण्यासाठी त्यांनीच मिंधेगिरी केली.

महाविकास आघाडी आणि गद्दारी या शब्दाचे जनक, मूळपुरुष शरद पवार यांनी काही वर्षांपूर्वी शिवसेना फोडली. त्याआधी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून, त्यांचे सरकार पाडून, आमदार फोडून म्हणजे गद्दारांना बरोबर घेऊन ते मुख्यमंत्री झाले होते. असो. 

तर याच शरद पवार यांनी काही वर्षांपूर्वी शिवसेनेचे छगन भुजबळ आणि अन्य काही आमदार फोडले. पवार तेव्हा कॉंग्रेस आय पक्षात असल्याने त्यांनी या सर्वांना कॉंग्रेस आय पक्षात प्रवेश दिला. याच गद्दार भुजबळ यांना शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, पुढे उपमुख्यमंत्रीपद दिले.


भुजबळ यांचे शिवसेनेतून अशा प्रकारे बाहेर पडणे बाळासाहेब ठाकरे यांच्या जिव्हारी लागले.‌ ठाकरे आणि शिवसेनेकडून भुजबळ यांचा उल्लेख कायम 'लखोबा लोखंडे' या शेलक्या शब्दात केला जायचा. भुजबळ यांच्या शासकीय निवासस्थानी संतप्त शिवसैनिकांनी हल्ला केला होता. पुढे याच भुजबळांनी बाळासाहेब ठाकरे यांना अटक केली.‌

हा सर्व इतिहास माहित असताना, ज्या शरद पवार यांनी शिवसेना फोडली, ज्या गद्दार भुजबळ यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक केली, ज्या भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरे यांची 'टी बाळू' अशी टिंगल टवाळी केली त्या पवार, भुजबळ यांच्याशी, त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करून मुख्यमंत्रीपद मिळवले, गद्दार भुजबळ यांच्यासोबत अडीच वर्षे काम केले. मुख्यमंत्रीपदावर बसण्यासाठी ही मिंधेगिरी नाही तर काय होते? 

मला मुख्यमंत्री करणार असाल तर गद्दार भुजबळ मंत्रीमंडळात नको, अशी भूमिका का घेतली नाही? ( शरद पवार यांनी तुमचे म्हणणे मान्य केले असते किंवा नसते हा नंतरचा प्रश्न) किमान तसे जाहीरपणे एकदाही का बोलला नाहीत? भुजबळांना मंत्रीमंडळात घेणार असाल तर मला मुख्यमंत्रीपद नको, अशी भूमिका का घेतली नाही? आपण असे बोललो आणि शरद पवार यांनी ते मान्य केले तर हातातोंडाशी आलेले मुख्यमंत्रीपद गमवावे लागेल, अशी भीती वाटली आणि मिंधेपणा पत्करून एकदाचे मुख्यमंत्रीपदावर बसलात. 

शेखर जोशी

२२ जून २०२३