गुरुवार, १८ डिसेंबर, २०२५
रिक्षा मीटर सक्ती झालीच पाहिजे... मीटर सक्ती नाही तर मत नाही
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक २०२६
शेजो उवाच- ३
रिक्षा मीटर सक्ती झालीच पाहिजे...
मीटर सक्ती नाही तर मत नाही
डोंबिवली, कल्याणमध्ये रिक्षा मीटर सक्ती नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून काही मुजोर रिक्षाचालक मनमानी करत अव्वाच्या सव्वा पैसे मागत आहेत. स्थानिक आमदार व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंसह कोणताही राजकीय पक्ष, नेते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक पोलीस या मनमानीला आजपर्यंत आळा घालू शकलेले नाहीत. त्यामुळे प्रवाशांची लुटमार सुरू आहे.
बाजीप्रभू चौक, डोंबिवली पूर्व ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस. टी. स्टॅण्ड, एमआयडीसी, डोंबिवली पूर्व हे अंतर दोन किलोमीटर आहे. त्यामुळे नियमानुसार रिक्षा चालकांनी या अंतरासाठी ३५ रुपये आकारणे अपेक्षित आहे. पण या अंतरासाठी ६०/ ७० रुपये घेतात. याच अंतरासाठी रात्री बारा वाजल्यानंतरचे भाडे ४४ रुपये आहे.
भागशाळा मैदान डोंबिवली पश्चिम ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस. टी. स्टॅण्ड, एमआयडीसी, डोंबिवली पूर्व हे अंतर २.०९ किलोमीटर आहे. नियमानुसार रिक्षा चालकांनी या अंतरासाठी दिवसा आणि रात्री बारा वाजल्यानंतर अनुक्रमे ५० आणि ६३ रुपये भाडे आकारले पाहिजे. मात्र रिक्षा चालकांकडून दिवसाच १२० रुपये आकारले जातात. रात्री बारा वाजल्यानंतर कोणी प्रवासी तिथून येणार असेल तर अर्थात १५० पेक्षाही जास्त (किती ते त्या रिक्षाचालकावर अवलंबून) पैसे मागितले जातात. अशी ही मनमानी गेल्या अनेक वर्षांपासून बिनधास्त सुरू आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस. टी. स्टॅण्ड, एमआयडीसी, डोंबिवली पूर्व येथून बाजीप्रभू चौक, डोंबिवली पूर्व येथे येण्यासाठी रिक्षा पकडली. आणि शेअर पद्धतीने प्रवासी आला तरी रिक्षा चालकांकडून प्रत्येक प्रवासी ३० रुपये घेतले जातात. रिक्षात मागे ३ आणि पुढे एक/ दोन प्रवासी बसवले जातात. खरे तर हे ही बेकायदा आहे. हे अंतर दोन किलोमीटर आहे. मीटर टाकले तर या अंतरासाठी ३५ रुपये होतात. म्हणजे रिक्षात वेगवेगळे प्रवासी बसले तरी प्रत्येकी तीन प्रवासी बसवले तर प्रत्येकी १२ रुपये आणि चार प्रवासी बसवले तर १० रुपयेच घेतले पाहिजेत.
कल्याण डोंबिवली महापालिका आगामी सार्वत्रिक निवडणुकीत डोंबिवलीकर/ कल्याणकर नागरिकांनी हा मुद्दा ऐरणीवर आणला पाहिजे. मतं मागायला येणारे सर्वपक्षीय उमेदवार आणि राज्य व स्थानिक पातळीवरील सत्ताधारी लोकप्रतिनिधी, विरोधी पक्षातील नेते, स्थानिक पदाधिकारी, नेते यांना रिक्षा मीटर सक्तीची अंमलबजावणी न झाल्याप्रकरणी जाब विचारला पाहिजे. रिक्षा मीटर सक्ती नाही तर मतदार नाही किंवा 'नोटा' चा वापर अशी भूमिका घेतली पाहिजे. हीच संधी आहे. आत्ता नाही तर कधीच नाही.
शेखर जोशी
१७ डिसेंबर २०२५
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा