![]() |
विस्मरणातील कल्याणकर या लेखमालिकेतील पुढील लेख
कष्टकऱ्यांचे कैवारी- कृष्णराव धुळप
महाराष्ट्र टाइम्स- ठाणे प्लस, १४ ऑक्टोबर २०२३
माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरी करण्यात येते. यानिमित्ताने महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळातर्फे ‘वाचन जागर’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मराठी विश्वकोशाचे आद्य संपादक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर या जन्मगावी होणारा कार्यक्रम हे यंदाच्या वाचन प्रेरणा दिनाचे वैशिष्ठ्य असल्याचे मंडळाचे अध्यक्ष डॉ.राजा दीक्षित यांनी सांगितले.
१३ ऑक्टोबर रोजी कर्मवीर आ. मा. पाटील महाविद्यालय, पिंपळनेर व दीपरत्न माध्यमिक विद्यालय, पानखेडा, धुळे आणि भीमराव शिंदे महिला महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वाई; १४ ऑक्टोबर रोजी राजाराम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कोल्हापूर आणि १५ ऑक्टोबर रोजी ट्विटर वाचन प्रेरणा साहित्य संमेलन; मराठी विश्वकोश कार्यालयात ग्रंथ प्रदर्शन, असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती डॉ. दीक्षित यांनी दिली.
भाषा आणि भाषांतर, विदेशी मराठी साहित्य, वाचन संस्कृती आणि आव्हाने, मराठी विश्वकोश परिचय, कुमार विश्वकोशातील जीवसृष्टी आणि पर्यावरण, वाचन संवाद आदी विविध विषयांवर चर्चा होणार आहे.
वाई विश्वकोश कार्यालयातील संपादकीय विभाग व प्रशासकीय विभागाकडून या कार्यक्रमांचे संयोजन करण्यात आले आहे.
'महाकवी कालिदास संस्कृत साधना'
पुरस्कार ‘संस्कृतदिनी’च द्यावा
- सुराज्य अभियाना’ची मागणी
महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना’ पुरस्कारांचे वितरण संस्कृतदिनी अर्थातच ३० ऑगस्ट या दिवशी करण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’ कडून करण्यात आली आहे. या संदर्भात उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या ( २७ जुलै २०१२) शासन निर्णयानुसार ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार’ संस्कृतदिनाच्या दिवशी देण्यात यावा, असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे; मात्र २०१२ पासून आजपर्यंत हा पुरस्कार संस्कृतदिनी देण्यात आलेला नाही. पुरस्कार वर्षअखेरीस डिसेंबर महिन्यात दिले जातात. तसेच दरवर्षी पुरस्कार प्रदान न करता दोन/तीन वर्षांचे पुरस्कार एकत्रितपणे दिले जातात, असे सुराज्य अभियानाचे म्हणणे आहे.
प्राचीन संस्कृत पंडित, वेदमूर्ती, संस्कृत शिक्षक, संस्कृत प्राध्यापक, संस्कृत कार्यकर्ते या पात्रतेतील आठ जणांना हा पुरस्कार दिला जातो. ‘संस्कृतदिन’ आता काही दिवसांवर आला आहे. या दृष्टीने आवश्यक ते नियोजन करण्यास पुरेसा अवधी मिळावा, असे ‘सुराज्य अभियाना’चे समन्वयक अभिषेक मुरुकटे यांनी या निवेदनात म्हटले आहे.
२०२१ ते २०२३ या वर्षांतील पुरस्कार अद्याप घोषित करण्यात आलेले नाहीत. हा पुरस्कार सुरू केल्यापासून गेल्या दहा वर्षांत पुरस्काराच्या रकमेत एक रुपयाचीही वाढ करण्यात आलेली नाही. ही रक्कम वाढविण्याविषयी मंत्रिमहोदयांची भेट घेतली असता, त्यांनी खात्याचे प्रधान सचिव यांना अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्यास सांगितले होते. त्यालाही आता पाच महिने झाले, याकडेही निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.
माजी नाट्य व्यवस्थापक आणि ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून साकारलेला एक आगळा कार्यक्रम नुकताच दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात आयोजित करण्यात आला होता. कर्करोगावर मात करुन आनंदाने आयुष्य जगणाऱ्या लढवय्यांच्या आनंद मेळाव्याचे.
कर्करोगावर मात केलेले ४० जण आपल्या कुटुंबियांसह कार्यक्रमाला उपस्थित होते. कर्करोगावर मात करणारे ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कर्करोगमुक्त पत्रकार नेहा पुरव यांचा वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला.
राजश्री बोरकर, तृप्ती तोडणकर आणि पत्रकार नेहा पुरव यांनी यावेळी आजाराशी दोन हात करण्याचे अनुभव सांगितले आणि कायम सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा कानमंत्र दिला. कर्करोगमुक्त प्रदीप पाटोळे यांनी गाणी म्हटली.
केतकी भावे- जोशी, जयंत पिंगुळकर यांच्या गाण्यांचा कार्यक्रम यावेळी सादर झाला.
हे उद्यान कम्युनिटी पार्क, पोखरण रोड नं २, येथील सहा हजार चौरस मीटर जागेवर उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी अवयवदान संदर्भातील माहिती पुस्तिका उपलब्ध करून देण्यात येणार असून प्रस्तावित उद्यानात मूत्रपिंड (किडनी), यकृत ( लिव्हर), हृदय, फुफ्फुस, स्वादुपिंड, छोटे आतडे, डोळे, त्वचा, हाडे, हात या अवयवाच्या आणि पेशींच्या प्रतिकृती उभारण्यात येणार आहेत. तसेच या अवयवांसंदर्भातील माहिती त्याठिकणी मोठ्या फलकावर लावण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
अवयवदानासंदर्भातील शास्त्रीय स्वरूपाची माहिती या ठिकाणी देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या उद्यानात अवयव दान करण्याचा प्रतिज्ञा अर्ज नागरिकांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. ज्या नागरिकांना हा अर्ज भरायचा आहे त्यांच्याकडून तेथेच भरून घेण्यात येऊन तो अर्ज नोंदणीकरिता राज्य अवयव आणि उतीपेशी प्रत्यारोपण संस्थेच्या कार्यालयात सुपूर्द करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
एक मेंदूमृत व्यक्ती अवयवदान करून ८ व्यक्तींना जीवनदान देऊ शकते. गेल्या काही वर्षांत अवयव निकामी झालेल्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच वैद्यकीय विश्वातील प्रगतीमुळे अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहे. त्यामुळे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण पुढे येत आहे. मात्र मेंदूमृत व्यक्तीकडून अवयवदान होण्याची संख्या आणि अवयवाची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या यामध्ये मोठी तफावत आहे. ती दूर करण्यासाठी मेंदूमृत अवयवदान मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे.
सध्या राज्यात अवयव प्रत्यारोपणासाठी मोठ्या प्रमाणावर रुग्ण प्रतिक्षेत आहेत. ही आकडेवारी पुढीलप्रमाणे
मुत्रपिंड प्रत्यारोपण - ५,८३२, यकृत प्रत्यारोपण- १,२८४,
हृदय प्रत्यारोपण– १०८, फुफ्फुस प्रत्यारोपण – ४८, स्वादुपिंड प्रत्यारोपण – ३५, छोटे आतडे प्रत्यारोपण – ३
![]() |
शतकवीर रक्तदाते |
शंभरपेक्षा अधिकवेळा रक्तदान करुन अनेकांचे प्राण वाचविण्यात मोलाची भूमिका बजाविणाऱ्या आणि खऱ्या अर्थाने शतकवीर असणाऱ्या २० रक्तदात्यांचा विशेष सन्मान बृहन्मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील 'मुंबई जिल्हा एड्स कंट्रोल नियंत्रण सोसायटी'द्वारे नुकताच करण्यात आला.
अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. विजयकुमार करंजकर, सहाय्यक संचालिका (रक्त संक्रमण सेवा) श्रीमती. अपर्णा पवार, रक्त केंद्र अधिकारी, समुपदेशक आणि समाज विकास अधिकारी यावेळी उपस्थित होते.
रक्तदानाबरोबरच प्लेटलेट, नेत्रदान, अवयव-दान आणि देहदान यासाठी देखील सर्वांनीच पुढाकार घेणे आणि आपल्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींना यात सहभागी करून घेणे अत्यंत आवश्यक असल्याचेही बिरादार यांनी सांगितले.