प्रकाशक व निरुपणकार दिलीप महाजन सांगणार
वाल्मिकी रामायणातील 'लोकाभिराम' कथा!
चैत्र महिन्यातील राम नवरात्राच्या निमित्ताने प्रकाशक व निरुपणकार दिलीप महाजन कल्याण आणि डोंबिवलीत वाल्मिकी रामायणातील 'लोकाभिराम' कथा उलगडणार आहेत.
येत्या ३१ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत पारनाका, कल्याण पश्चिम येथील त्रिविक्रम देवस्थान येथे संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत महाजन लोकाभिराम कथा सांगणार आहेत. श्री त्रिविक्रम देवस्थानने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
तर ३ ते ५ एप्रिल दरम्यान ज्ञानेश्वर मंगल कार्यालय, महात्मा फुले रस्ता, डोंबिवली पश्चिम येथे संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत महाजन यांच्या लोकाभिराम कथा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कल्याण आणि डोंबिवलीतील कार्यक्रम सर्वांसाठी खुले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा