शुक्रवार, ६ जून, २०२५
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर - अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर
- अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
मुंबई, दि. ६ जून
नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे देण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर झाले आहेत ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी आणि सुरेश साखवळकर यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
परिषदेतर्फे व्यावसायिक नाट्य पुरस्कारही जाहीर करण्यात आले आहेत. गेली ५१ वर्षे प्रायोगिक रंगभूमीवर कार्यरत असणाऱ्या अनुराग कल्याण या संस्थेला विशेष पुरस्कार या सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यात गोविंदायन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात संगीत शारदा संगीत संशय कल्लोळ संगीत मृच्छकटिक नाटकातील प्रवेश सादर होणार आहेत.
पुरस्कार वितरण सोहळा येत्या १४ जून रोजी दुपारी चार वाजता यशवंत नाट्यमंदिर माटुंगा येथे होणार आहे. या सोहळ्यास सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.
साहित्य संमेलन स्थळ निवड समितीची रविवारी बैठक - संमेलन स्थळ औदुंबर, इचलकरंजी, कोल्हापूर की सातारा?
साहित्य संमेलन स्थळ निवड समितीची रविवारी बैठक
- संमेलन स्थळ औदुंबर, इचलकरंजी, कोल्हापूर की सातारा?
मुंबई, दि. ६ जून
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या साहित्य संमेलन स्थळ निवड समितीची बैठक येत्या रविवारी ८ जून रोजी पुण्यात होत आहे. या बैठकीत आगामी ९९ वेळ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे घ्यायचे? त्यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
अलीकडेच नवी दिल्ली येथे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय आता तीन वर्षांसाठी पुण्यात आले आहे. त्यामुळे स्थळ निवड समितीची बैठक पुण्यात होणार असून बैठकीनंतर ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ जाहीर केले जाणार आहे.
९९ वे साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी महामंडळाकडे सदानंद साहित्य मंडळ -औदुंबर, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा इचलकरंजी, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी- सातारा या संस्थांकडून निमंत्रणे आली आहेत.
आळंदीजवळ पशूवधगृहासाठी जागा आरक्षित होणे ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट
आळंदीजवळ पशूवधगृहासाठी जागा आरक्षित
होणे ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट
वारकरी आणि जागरूक हिंदु समाज आळंदी तीर्थक्षेत्राजवळ कोणत्याही परिस्थितीत पशूवधगृह होऊ देणार नाहीत; परंतु या क्षेत्रात पशूवधगृहासाठी जागा आरक्षित होणे, ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे, असे मत, दैनिक सनातन प्रभातचे विशेष प्रतिनिधी प्रितम नाचणकर यांनी व्यक्त केले आहे.
नाचणकर यांनी लिहिलेला 'पुणे जिल्ह्यातील आळंदी क्षेत्राजवळ पशूवधगृहाचे आरक्षण : महाराष्ट्राने आत्मचिंतन करण्याची आवश्यकता !'हा लेख ६ जून २०२५ च्या दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रकाशित झाला आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने १४ मे या दिवशी शहराचा सुधारित विकास आराखडा घोषित केला. प्रशासनाच्या संकेतस्थळावर हा आराखडा अधिकृतरित्या ठेवण्यात आला आहे. या आराखड्यानुसार आळंदी तीर्थक्षेत्राच्या जवळ मोशी-डुडुळगावी या मार्गावर ३.७८ एकर जागा पशूवधगृहासाठी आरक्षित करण्यात आली आहे. यापूर्वी वर्ष १९९५ मध्ये महानगरपालिका प्रशासनाने शहरात अन्य ठिकाणी पशूवधगृहासाठी जागा आरक्षित केली होती; मात्र नागरिकांच्या विरोधामुळे ते आरक्षण रहित करण्यात आले. सामाजिक समतोलासाठी समाजात पशूवधगृह आवश्यक असल्याची सूचना हरित लवादाकडून प्राप्त झाल्यावर यापूर्वीच्या आराखड्यात रहित केलेले पशूवधगृह महानगरपालिकेने आळंदी तीर्थक्षेत्राजवळ आरक्षित केले. ‘पशूवधगृह धार्मिक स्थळाजवळ असू नये’, हे तारतम्यही महानगरपालिकेच्या लक्षात न येणे आणि आळंदीसारख्या पवित्र तीर्थक्षेत्राजवळ त्यासाठी जागा आरक्षित करणे, ही प्रशासनाची अक्षम्य चूक असल्याचे नाचणकर यांनी या लेखात म्हटले आहे.
पिंपरी-चिंचवड शहराचा विकास आराखडा संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने हरकती मागवण्यासाठी ६० दिवसांची मुदत दिली. याविषयी समजताच वारकरी, धर्मप्रेमी हिंदु आणि सतर्क नागरिक महानगरपालिकेकडे निषेध नोंदवत आहेत. महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजात राज्य सरकारचा थेट हस्तक्षेप नसला, तरी आळंदी तीर्थक्षेत्राजवळ पशूवधगृह आरक्षित झाल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर राज्य सरकारने याकडे तातडीने लक्ष घालणे अपेक्षित आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांनी याविषयी स्पष्टीकरण देणे अपेक्षित होते; मात्र तसे आढळले नाही
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी श्रीक्षेत्र आळंदी येथे जाऊन संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीस्थानाचे दायित्व असलेल्या ‘श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी’ यांच्या विश्वस्तांची भेट घेतली. ‘आळंदी क्षेत्राजवळ पशूवधगृह होऊ नये, यासाठी त्यांनी प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे का ?’, याविषयी विचारणा केली; मात्र हे खेदाने सांगावे लागते, ‘या देवस्थानने साधे पत्रही पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाला पाठवण्याचा सोपस्कार केला नव्हता, अशी माहिती लेखात पुढे देण्यात आली आहे.
दरम्यान आळंदीक्षेत्राजवळ पशूवधगृहाच्या आरक्षणाचा निर्णय सरकारने रद्द केला नाही, तर सरकारला वारकर्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. वारकर्यांच्या भावनांचा उद्रेक होऊ देऊ नका, असा इशारा वारकरी युवक संघाचे संस्थापक ह.भ.प. अनंत महाराज पाटेकर यांनी प्रशासन आणि सरकारला दिला आहे.
या लेखाची लिंक पुढीलप्रमाणे
https://tinyurl.com/4avty6bf
कल्याण येथे हिंदू अस्मिता एकत्रीकरण – हिंदू मंचतर्फे आयोजन
कल्याण येथे हिंदू अस्मिता एकत्रीकरण
– हिंदू मंचतर्फे आयोजन
कल्याण, दि. ६ जून
हिंदू मंचतर्फे शनिवार, ७ जून रोजी कल्याण येथे दुर्गाडी किल्ला विषयासंदर्भात हिंदू अस्मिता एकत्रीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे.
७ जून रोजी सकाळी सहा वाजता सर्व हिंदुत्ववादी संस्थां, संघटना, नागरिकांनी टिळक चौक, कल्याण (पश्चिम) येथे उपस्थित राहावे, असे आवाहन हिंदू मंचाचे अध्यक्ष दिनेश देशमुख यांनी केले आहे.
किल्ले श्री दुर्गाडी आपल्या अस्मितेचा प्रश्न असून त्याबाबत आपण जागृत आहोत. गेली अनेक वर्षे एकत्र येऊन याबाबत संघर्ष करत असल्याचे हिंदू मंचचे म्हणणे आहे.
गुरुवार, ५ जून, २०२५
अयोध्येतील श्रीराम मंदिरात राम दरबारची प्रतिष्ठापना
अयोध्येतील श्रीराम मंदिरात
राम दरबारची प्रतिष्ठापना
अयोध्या, दि. ५ जून
अयोध्येतील श्रीराम मंदिरात गुरुवारी राम दरबाराची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तसेच मंदिर परिसरात अन्य साद देवळात विविध देवतांचीही प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. राम दरबारात श्रीराम, सीता, लक्ष्मण, शत्रुघ्न, हनुमान यांच्या मूर्ती आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.
राम मंदिराच्या गर्भगृहात राम लल्लाची मूर्ती असून पहिल्या मजल्यावर राम दरबारची स्थापना करण्यात आली आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती.
या सोहळ्यात राम मंदिर परिसरात शेषावतार, भगवान शंकर, गणपती, मारुती, सूर्य, भगवती देवी आणि अन्नपूर्णा देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण
इगतपुरी, दि. ५ जून
बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले.
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, ठाणे जिल्ह्यातील आमदार किसन कथोरे, निरंजन डावखरे, शांताराम भोईर तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिव मनिषा म्हैसकर, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष अनिल गायकवाड, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आदि मान्यवर उपस्थित होते.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारणार -कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारणार
-कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे
मुंबई, दि. ५ जून
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्याप्रमाणे कृषी मॉल उभारण्यात येतील, अशी घोषणा कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केली.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कृषी क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न, उपाययोजना व सांगली जिल्ह्यातील कृषी महाविद्यालयासंदर्भात मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख, आमदार सदाभाऊ खोत, कृषी आयुक्त सूरज मांढरे यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कृषी विभागाकडे उपलब्ध असलेल्या जमिनीवर प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारल्यास शेतक-यांना याचा फायदा होईल. त्यांचा वेळ वाचून त्यांना सर्व कृषी माल विक्री व कृषीसाठी लागणा-या सर्व सहसाहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध होईल.’एक पीक एक गाव’ ही संकल्पना देखील विकसित करण्यासाठी विचाराधीन असल्याचेही कोकाटे म्हणाले.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...