शुक्रवार, ६ जून, २०२५
ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि व्याख्याते दाजी पणशीकर यांचे निधन
ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि व्याख्याते
दाजी पणशीकर यांचे निधन
ठाणे, ६ जून
ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि व्याख्याते दाजी पणशीकर यांचे अल्प आजाराने शुक्रवारी ठाण्यात राहत्या घरी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन कन्या, जावई, मुलगा आणि सून असा परिवार आहे.
पणशीकर यांनी लिहिलेली महाभारत एक सुडाचा प्रवास, कर्ण खरा कोण होता?, कथामृतम, कणिकनिती, शंकराचार्यांच्या स्तोत्रांवर आधारित स्तोत्र गंगा (दोन भाग), अपरिचित रामायण (पाच भाग), गानसरस्वती किशोरी आमोणकर - आदिशक्तीचा धन्योद्गार आणि इतर पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
पणशीकर यांनी देशविदेशात सुमारे अडीच हजार व्याख्याने दिली असून काही वृत्तपत्रातूनही त्यांनी लिहिलेल्या विविध लेखमाला प्रसिद्ध झाल्या आहेत.
पणशीकर यांच्या पार्थिवावर शनिवार ७ जून रोजी सकाळी साडेनऊ वाजता जवाहर बाग स्मशानभूमी, ठाणे पश्चिम येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
हिंदुद्वेषी एम्.एफ्. हुसेन यांच्या मुंबईतील चित्रांच्या लिलावावर बंदी घाला - हिंदू जनजागृती समितीची मागणी
हिंदुद्वेषी एम्.एफ्. हुसेन यांच्या
मुंबईतील चित्रांच्या लिलावावर बंदी घाला
- हिंदू जनजागृती समितीची मागणी
मुंबई, ६ जून
भारतमातेचे ‘रेप ऑफ इंडिया’नावाने अत्यंत विकृत, बिभत्स, नग्न व अश्लील चित्र रेखाटणारे वादग्रस्त चित्रकार एम.एफ. हुसेन यांच्या २५ चित्रांचा लिलाव मुंबईत येत्या १२ जूनला होणार आहे. या लिलावावर तात्काळ बंदी घालण्यात यावी आणि हुसेन यांच्या गुन्हेगारी कृत्याचे उदात्तीकरण बंद केले जावे, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.
या प्रकरणी समितीने शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बृहन्मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती याच्यासह मुंबईचे जिल्हाधिकारी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सादर केलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे.
एम.एफ. हुसेन यांनी '२६/११' हल्ल्च्यायाच्या वेळी ‘रेप ऑफ इंडिया’ नावाच्या चित्रात भारतमातेचे नग्न व अपमानास्पद चित्र साकारून त्यांनी देशद्रोहाची परिसीमा गाठली. दुसऱ्या एका चित्रात भारतमातचे नग्न चित्रण काढून त्यावर विविध शहरांची नाव लिहिलेली दाखविली होती. माता सरस्वती, माता पार्वती, माता गंगा, माता यमुना आदी देवीदेवतांचे जाणीवपूर्वक विकृत, नग्न व अश्लील चित्रण करून कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचा त्यांनी अपमान केला असल्याचे समितीचे म्हणणे आहे.
अशा अपमानास्पद चित्रांच्या विरोधात हुसेनविरोधात देशभरात
१ हजार २५० हून अधिक पोलीस तक्रारी दाखल झाल्या आहेत. देशभरातही त्यांच्या प्रदर्शनांना विरोध झाला आणि अखेर हुसेन यांनी भारतातून पलायन करून कतारचे नागरिकत्व स्वीकारले होते. हुसेन यांच्या २५ चित्रांचा लिलाव म्हणजे त्यांच्या आधीच्या राष्ट्रविरोधी व समाजविघातक कृत्यांना अप्रत्यक्षपणे समर्थन देणे होय. ‘कलात्मक स्वातंत्र्य’ या नावाखाली धार्मिक भावना दुखावणाऱ्या आणि देशविघातक व्यक्तींचे गौरव करणे हे कोणत्याही प्रकारे समर्थनीय नाही, असे समितीने या निवेदनात म्हटले आहे.
दिल्लीतील पटीयाला हाऊस न्यायालयाने हुसेन यांच्या प्रदर्शनातील चित्रे जप्त करण्याचे आदेश दिले असून त्याची चौकशी चालू आहे. यापूर्वी देशभरात हुसेन यांच्या अनेक चित्रप्रदर्शनांना विरोध झालेला आहे. ती प्रदर्शने रद्द झालेली आहे. हुसेनच्या नावाने दिले जाणारे पुरस्कारही रद्द करण्यात आले आहेत. आणि त्यामुळे
हुसेन यांच्या चित्रांचा प्रस्तावित लिलाव व विक्री त्वरित थांबवावी
आणि त्यावर कायदेशीर बंदी घालावी. तसेच या चित्रांचे प्रदर्शन किंवा विक्री करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा कला दालनांवरही कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणीही हिंदू जनजागृती समितीने केली आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर - अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर
- अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
मुंबई, दि. ६ जून
नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे देण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर झाले आहेत ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी आणि सुरेश साखवळकर यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
परिषदेतर्फे व्यावसायिक नाट्य पुरस्कारही जाहीर करण्यात आले आहेत. गेली ५१ वर्षे प्रायोगिक रंगभूमीवर कार्यरत असणाऱ्या अनुराग कल्याण या संस्थेला विशेष पुरस्कार या सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यात गोविंदायन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात संगीत शारदा संगीत संशय कल्लोळ संगीत मृच्छकटिक नाटकातील प्रवेश सादर होणार आहेत.
पुरस्कार वितरण सोहळा येत्या १४ जून रोजी दुपारी चार वाजता यशवंत नाट्यमंदिर माटुंगा येथे होणार आहे. या सोहळ्यास सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.
साहित्य संमेलन स्थळ निवड समितीची रविवारी बैठक - संमेलन स्थळ औदुंबर, इचलकरंजी, कोल्हापूर की सातारा?
साहित्य संमेलन स्थळ निवड समितीची रविवारी बैठक
- संमेलन स्थळ औदुंबर, इचलकरंजी, कोल्हापूर की सातारा?
मुंबई, दि. ६ जून
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या साहित्य संमेलन स्थळ निवड समितीची बैठक येत्या रविवारी ८ जून रोजी पुण्यात होत आहे. या बैठकीत आगामी ९९ वेळ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे घ्यायचे? त्यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
अलीकडेच नवी दिल्ली येथे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय आता तीन वर्षांसाठी पुण्यात आले आहे. त्यामुळे स्थळ निवड समितीची बैठक पुण्यात होणार असून बैठकीनंतर ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ जाहीर केले जाणार आहे.
९९ वे साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी महामंडळाकडे सदानंद साहित्य मंडळ -औदुंबर, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा इचलकरंजी, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी- सातारा या संस्थांकडून निमंत्रणे आली आहेत.
आळंदीजवळ पशूवधगृहासाठी जागा आरक्षित होणे ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट
आळंदीजवळ पशूवधगृहासाठी जागा आरक्षित
होणे ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट
वारकरी आणि जागरूक हिंदु समाज आळंदी तीर्थक्षेत्राजवळ कोणत्याही परिस्थितीत पशूवधगृह होऊ देणार नाहीत; परंतु या क्षेत्रात पशूवधगृहासाठी जागा आरक्षित होणे, ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे, असे मत, दैनिक सनातन प्रभातचे विशेष प्रतिनिधी प्रितम नाचणकर यांनी व्यक्त केले आहे.
नाचणकर यांनी लिहिलेला 'पुणे जिल्ह्यातील आळंदी क्षेत्राजवळ पशूवधगृहाचे आरक्षण : महाराष्ट्राने आत्मचिंतन करण्याची आवश्यकता !'हा लेख ६ जून २०२५ च्या दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रकाशित झाला आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने १४ मे या दिवशी शहराचा सुधारित विकास आराखडा घोषित केला. प्रशासनाच्या संकेतस्थळावर हा आराखडा अधिकृतरित्या ठेवण्यात आला आहे. या आराखड्यानुसार आळंदी तीर्थक्षेत्राच्या जवळ मोशी-डुडुळगावी या मार्गावर ३.७८ एकर जागा पशूवधगृहासाठी आरक्षित करण्यात आली आहे. यापूर्वी वर्ष १९९५ मध्ये महानगरपालिका प्रशासनाने शहरात अन्य ठिकाणी पशूवधगृहासाठी जागा आरक्षित केली होती; मात्र नागरिकांच्या विरोधामुळे ते आरक्षण रहित करण्यात आले. सामाजिक समतोलासाठी समाजात पशूवधगृह आवश्यक असल्याची सूचना हरित लवादाकडून प्राप्त झाल्यावर यापूर्वीच्या आराखड्यात रहित केलेले पशूवधगृह महानगरपालिकेने आळंदी तीर्थक्षेत्राजवळ आरक्षित केले. ‘पशूवधगृह धार्मिक स्थळाजवळ असू नये’, हे तारतम्यही महानगरपालिकेच्या लक्षात न येणे आणि आळंदीसारख्या पवित्र तीर्थक्षेत्राजवळ त्यासाठी जागा आरक्षित करणे, ही प्रशासनाची अक्षम्य चूक असल्याचे नाचणकर यांनी या लेखात म्हटले आहे.
पिंपरी-चिंचवड शहराचा विकास आराखडा संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने हरकती मागवण्यासाठी ६० दिवसांची मुदत दिली. याविषयी समजताच वारकरी, धर्मप्रेमी हिंदु आणि सतर्क नागरिक महानगरपालिकेकडे निषेध नोंदवत आहेत. महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजात राज्य सरकारचा थेट हस्तक्षेप नसला, तरी आळंदी तीर्थक्षेत्राजवळ पशूवधगृह आरक्षित झाल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर राज्य सरकारने याकडे तातडीने लक्ष घालणे अपेक्षित आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांनी याविषयी स्पष्टीकरण देणे अपेक्षित होते; मात्र तसे आढळले नाही
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी श्रीक्षेत्र आळंदी येथे जाऊन संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीस्थानाचे दायित्व असलेल्या ‘श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी’ यांच्या विश्वस्तांची भेट घेतली. ‘आळंदी क्षेत्राजवळ पशूवधगृह होऊ नये, यासाठी त्यांनी प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे का ?’, याविषयी विचारणा केली; मात्र हे खेदाने सांगावे लागते, ‘या देवस्थानने साधे पत्रही पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाला पाठवण्याचा सोपस्कार केला नव्हता, अशी माहिती लेखात पुढे देण्यात आली आहे.
दरम्यान आळंदीक्षेत्राजवळ पशूवधगृहाच्या आरक्षणाचा निर्णय सरकारने रद्द केला नाही, तर सरकारला वारकर्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. वारकर्यांच्या भावनांचा उद्रेक होऊ देऊ नका, असा इशारा वारकरी युवक संघाचे संस्थापक ह.भ.प. अनंत महाराज पाटेकर यांनी प्रशासन आणि सरकारला दिला आहे.
या लेखाची लिंक पुढीलप्रमाणे
https://tinyurl.com/4avty6bf
कल्याण येथे हिंदू अस्मिता एकत्रीकरण – हिंदू मंचतर्फे आयोजन
कल्याण येथे हिंदू अस्मिता एकत्रीकरण
– हिंदू मंचतर्फे आयोजन
कल्याण, दि. ६ जून
हिंदू मंचतर्फे शनिवार, ७ जून रोजी कल्याण येथे दुर्गाडी किल्ला विषयासंदर्भात हिंदू अस्मिता एकत्रीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे.
७ जून रोजी सकाळी सहा वाजता सर्व हिंदुत्ववादी संस्थां, संघटना, नागरिकांनी टिळक चौक, कल्याण (पश्चिम) येथे उपस्थित राहावे, असे आवाहन हिंदू मंचाचे अध्यक्ष दिनेश देशमुख यांनी केले आहे.
किल्ले श्री दुर्गाडी आपल्या अस्मितेचा प्रश्न असून त्याबाबत आपण जागृत आहोत. गेली अनेक वर्षे एकत्र येऊन याबाबत संघर्ष करत असल्याचे हिंदू मंचचे म्हणणे आहे.
गुरुवार, ५ जून, २०२५
अयोध्येतील श्रीराम मंदिरात राम दरबारची प्रतिष्ठापना
अयोध्येतील श्रीराम मंदिरात
राम दरबारची प्रतिष्ठापना
अयोध्या, दि. ५ जून
अयोध्येतील श्रीराम मंदिरात गुरुवारी राम दरबाराची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तसेच मंदिर परिसरात अन्य साद देवळात विविध देवतांचीही प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. राम दरबारात श्रीराम, सीता, लक्ष्मण, शत्रुघ्न, हनुमान यांच्या मूर्ती आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.
राम मंदिराच्या गर्भगृहात राम लल्लाची मूर्ती असून पहिल्या मजल्यावर राम दरबारची स्थापना करण्यात आली आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती.
या सोहळ्यात राम मंदिर परिसरात शेषावतार, भगवान शंकर, गणपती, मारुती, सूर्य, भगवती देवी आणि अन्नपूर्णा देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...








