गुरुवार, २ मार्च, २०१७

सदिच्छा की कमाई दूत



शब्दवेधी जाहिरात



हलके फुलके भांडण



मालिकांचे थांबणे


सिग्नेचर टयून


सि

अभिनेता विवेक यांच्या आठवणींना उजाळा


अभिनेता विवेक यांच्या आठवणींना उजाळा

मराठी चित्रपट सृष्टीतील देेखणे आणि प्रसन्न व्यक्तिमत्व म्हणून अभिनेते विवेक यांची ओळख आहे.मराठी चित्रपट सृष्टीत आपल्या व्यक्तिमत्वाने आणि सहजसुंदर अभिनयाने त्यांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. मराठीत त्यांनी सुमारे ८० चित्रपटातून काम केले होते. रंगभूमीवरही त्यांनी काही काळ काम केले.'दूधभात', 'देवबाप्पा', 'माझं घर माझी माणसं', 'गृहदेवता', 'धाकटी जाऊ', 'वहिनीच्या बांगड्या', 'पोष्टातली मुलगी' हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट.विस्मृतीत गेलेल्या या अभिनेत्याचा जीवनपट प्रेक्षकांसमोर उलगडण्यााचा प्रयत्न 'अभिनेता विवेक' या पुस्तकातून करण्यात आला आहे. सांगाती प्रकाशनाने (भारती मोरे-९८६७४१६०१८) हे पुस्तक प्रकाशित केले असून भारती मोरे, प्रभाकर भिडे, रविप्रकाश कुलकर्णी, प्रकाश चांदे यांनी ते संपादित केले आहे. डोबिवलीत झालेल्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात या पुस्तकाचे प्रकाशन झाले.

खरे तर विवेक यांना चित्रकार/ क्रिकेकपटू व्हायचे होते. पण नियती त्यांना चित्रपटांच्या दुनियेत घेऊन आली. चाळीस वर्षे ते मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीत वावरले. प्रसन्न आणि चेहऱयावर कायम हास्य असणारे विवेक आजही जुन्या पिढीतील रसिकांच्या स्मरणात आहेत.विवेक यांचे खरे नाव गणेश अभ्यंकर. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरील निर्माते बाळ कुडतरकर यांनी त्यांचे नामकरण 'विवेक'असे केले. 'अभिनेता विवेक'या पुस्तकात त्यांच्याबरोबर काम केलेले काही कलावंत, त्यांचे परिचित अशा मंडळींशी बोलून विवेक यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

गंगाधर महांबरे, विवेक यांच्या मुली रेशम आठवले, रेखा काळे यांनी तसेच ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर,वसंत इंगळे, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना, अभिनेत्री चित्रा, उमा व प्रकाश भेंडे, अभिनेत्री जीवनकला, रमेश देव आणि सीमा देव, बाळ कुडतरकर आणि विवेक यांचे काही मित्र यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. विवेक यांनी त्यांच्या डायरीत लिहून ठेवलेल्या आठवणी, विवेक यांचे गाजलेले चित्रपट व त्या विषयीची सविस्तर माहिती, विवेक यांंच्या चित्रपटांची यादी, विवेक यांनी काम केलेल्या चित्रपटातील त्यांची छायाचित्रेही पुस्तकात आहेत.

विस्मृतीत गेलेल्या जुन्या पिढीतील अभिनेत्याविषयी सर्व माहिती एखाद्या पुस्तकात संकलित करण्यााचा हा प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहे. नव्या पिढीतील कलाकारांना तसेच प्रेक्षकानाही या पुस्तकाच्या निमित्ताने अभिनेता विवेक कोण व कसे होते हे कळेल. त्यासाठी अशी पुस्तके महत्वाची आहेत. २३ फेब्रुवारी २०१७ पासून विवेक यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरु झाले आहे. त्या निमित्ताने पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.

अशी मी तशी मी


अशी मी अशी मी

आत्मचरित्र हा साहित्यप्रकार मराठीत आता चांगल्यापैकी रुळला आहे. आयुष्याच्या एका टप्प्यावर मागे वळून पाहताना जीवनाचा वीणलेला आणि उलगडलेला गोफ या आत्मकथनातून मांडण्याचा प्रयत्न केला जातो. विविध क्षेत्रातील 'सेलिब्रेटीं'च्या जीवनाबद्दल सर्वसामान्यांना एक कुतूहल असते. त्यांनी लिहिलेल्या आत्मचरित्रातून ते त्यांचे चाहते व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचते. अर्थात या आत्मकथनात जीवनात घडलेल्या सर्वच गोष्टी सांगितल्या जात नाही, काही हातचे ऱाखून ठेवले जाते.काही आत्मचरित्रातून मात्र वास्तव मांंडले जाते आणि ते वादग्रस्तही ठरते.

सर्वसामान्यांच्या आयुष्यातही संघर्षाचे असे अनेक प्रसंग येतात. त्याला तोंड देत आयुष्याला सामोरे जातांना त्यांचा हा जीवनप्रवास अन्य लोकांसाठी मागर्दर्शक ठरू शकतो. त्या व्यक्ती सेलेब्रेटी नसल्यामुळे त्यांच्याबाबत त्यांचे नातेवाईक, परिचित, मित्रपरिवार सोडला तर कोणाला माहिती असण्याचेही काही कारण नाही. पण तरीही अशी आत्मकथने सर्वसामान्यांना जगण्याचे व संघर्षाशी सामना करण्याचे बळ देतात हे नक्की. तारा रावत यांनी लिहिलेले आणि उद्वेली बुक्सने प्रकाशित केलेले 'अशी मी अशी मी' हे आत्मकथन नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.

गरीबी, जीवनातील अस्थिरता, अनाथपण तारा रावत यांच्या वाट्याला आले. पण या सगळ्यामुळे त्या खचून गेल्या नाहीततर धीराने त्यांनी आयुष्यातील प्रत्येक प्रसंगाला तोंड दिले. आपला हा जीवनप्रवास त्यांनी या पुस्तकात उलगडला आहे. या प्रवासातील विविध आठवणी, महत्वाचे प्रसंग, जीवनात आलेल्या व्यक्ती या सगळ्याबद्दल यात सांगितले आहे.

मंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या माजी विभागप्रमुख डॉ. उषा देशमुख यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. प्रस्तावनेत डॉ. देशमुख लिहितात, माझ्या स्नेही व ज्येष्ठ कथाकार गिरिजा कीर यांच्यामुळे हे आत्मकथन माझ्या वाचनात आले. वर्तमानकाळात राहून भूतकाळाचा शोध घेण्याचा तारा रावत यांचा हा प्रयत्न आहे. निर्मळ मन, पारदर्शक विचार आणि आशावादी दृष्टीकोन हा या चिंतनाचा गाभा आहे. 'स्व'पासून तटस्थ होत आणि 'स्व'मध्ये विरघळून जात त्यांनी आपलेच रुप आपल्याच आत्मदर्पणात शोधण्याचा प्रयत्न केला आहे. आत्मशोध व व्यक्तिशोध यातील ताणांमधून 'अशी मी अशी मी' उभी राहते.

उद्वेली बुक्स-०२२-२५८१०९६८