मंगळवार, १० जानेवारी, २०२३
सार्वजनिक वाचनालयाचे जनक- सदाशिव मोरेश्वर साठे
यंदा मकर संक्रांत १५ जानेवारीला
![]() |
ज्येष्ठ पंचांगकर्ते दा.कृ. सोमण |
यंदाच्या वर्षी शनिवार, १४ जानेवारी रोजी रात्री ८-४४ वाजता सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करणार असल्याने मकर संक्रांत रविवार १५ जानेवारी रोजी आली आहे अशी माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.
निरयन मकर संक्रांत दरवर्षी १४ जानेवारीलाच येते हे खरे नाही. सूर्याने एकदा मकर राशीत प्रवेश केल्यापासून पुन्हा मकर राशीत प्रवेश करेपर्यंत ३६५ दिवस ६ तास ९ मिनिटे १० सेकंद एवढा कालावधी लागतो. त्यामुळे निरयन मकर संक्रांतीचा दिवस हा पुढे पुढे जात असतो, असे सोमण यांनी सांगितले.
वर्ष २०० मध्ये निरयन मकर संक्रांत २२ डिसेंबरला तर १८९९ मध्ये १३ जानेवारीला आली होती. १९७२ पर्यंत मकर संक्रांत १४ जानेवारीलाच येत होती. २०८५ पर्यंत मकर संक्रांती कधी १४ ला तर कधी १५ जानेवारीला येत राहील. सन २१०० पासून निरयन मकर संक्रांती १६ जानेवारीला येणार आहे. सन ३२४६ मध्ये निरयन मकर संक्रांती चक्क १ फेब्रुवारीला तर २०२४, २०२७ मध्ये निरयन मकर संक्रांत १५ जानेवारीला तर २०२५, २०२६, २०२९, २०३० मध्ये १४ जानेवारीला येणार असल्याचे सोमण म्हणाले.
![]() |
छायाचित्र- गुगलच्या सौजन्याने |
आपली पंचांगे निरयन पद्धतीची असल्याने सूर्य निरयन राशीत प्रवेश करतो त्यावेळी आपण मकर संक्रांत साजरी करतो. सूर्याने जर रात्री मकर राशीत प्रवेश केला तर दुस-या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाते. कोणतीही वाईट घटना घडली की, 'संक्रांत आली' असे म्हटले जाते,पण ते योग्य नाही. धनू राशीतून मकर राशीत सूर्याने प्रवेश करणे वाईट कसे असेल ? या दिवसापासून दिनमान वाढत जाते ते वाईट कसे म्हणता येईल ? तिळगूळ देऊन गोड बोलायला शिकविणारा हा दिवस वाईट कसा असू शकेल ? संक्रांतीदेवीने जर या दिवशी दुष्ट राक्षसाला ठार मारले असेल तर ते वाईट असेल का ? मकर संक्रांतीचा सण अशुभ नाही. मकर संक्रांतीच्यावेळी अनेक खोट्या व चुकीच्या अफवा पसरविल्या जातात त्यावरही विश्वास ठेवू नका. मकर संक्रांतीच्या दिवशी दिनमान वाढत जाण्याच्या आनंदाप्रीत्यर्थ सूर्याचे स्वागत करण्यासाठी रंगीबेरंगी पतंग उडविण्याची प्रथा आहे. परंतू पतंग उडविण्यासाठी धारदार नॅायलॅानच्या मांजाचा वापर करू नका, असे आवाहनही सोमण यांनी केले.
![]() |
छायाचित्र गुगलच्या सौजन्याने |
मकर संक्रांती पुण्यकालात मातीच्या सुगडात ( सुघटात ) ऊस, बोरे, शेंगा , गाजर, ओले हरभरे वगैरे त्यावेळी शेतात पिकणारे पदार्थ आणि तिळगूळ दान देण्याची पद्धत आहे. मकर संक्रांतीला काळी वस्त्रे परिधान करण्याची पद्धत आहे. कारण हे दिवस थंडीचे असतात. काळ्या रंगाची वस्त्रे शरीर उबदार ठेवतात. थंडीच्या दिवसात तीळ आरोग्यास चांगले असतात. म्हणून तीळाचे पदार्थ करून खाण्यास सांगितलेले आहेत. ज्यांच्याशी वर्षभरात भांडण झाले असेल, अबोला धरला गेला असेल तर एकमेकांना तिळगूळ देवून मने एकत्र आणणारा, गोड बोला असा संदेश देणारा हा गोड सण आहे.मकर संक्रांतीच्या दिवशी वस्त्रदान , अन्नदान, तिळगूळ दान देण्याची प्रथा आहे. परंतू आधुनिक काळात विद्यादान, श्रमदान, ग्रंथदान , रक्तदान, सामाजिक- शैक्षणिक संस्थाना अर्थदान करणे हे ही तितकेच पुण्यदायक आहे असेही सोमण यांनी स्पष्ट केले.
©️ शेखर जोशी
-----
याच विषयावर ज्येष्ठ पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांच्याशी केलेली बातचीत
रविवार, २१ मार्च, २०२१
व्यक्तिवेध-विनायक चासकर
मंगळवार, ७ नोव्हेंबर, २०१७
उचलली जीभ आणि लावली टाळ्याला
सोमवार, १७ जुलै, २०१७
समर्थ रामदास स्वामींचे बोल
महाराष्ट्राची 'राज'धारा
लावणी सम्राज्ञी
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...