बुधवार, २ एप्रिल, २०२५
गायत्री परिवार ट्रस्टतर्फे डोंबिवलीत गायत्री महायज्ञ
मंगळवार, १ एप्रिल, २०२५
मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातर्फे गरजू रुग्णांना आर्थिक मदतीचा हात

महाबळेश्वर येथे महापर्यटन उत्सव
महाबळेश्वर येथे महापर्यटन उत्सव
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते
महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण
मुंबई,दि.१
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व स्थानिक जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २ ते ४ मे दरम्यान महाबळेश्वर येथे
तीन दिवसांच्या महापर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.
महोत्सवात स्थानिक लोकसंस्कृतीचा समावेश असलेले कार्यक्रम तसेच नामांकित कलाकारांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे स्ट्रॉबेरी व कृषी पर्यटन महोत्सवाचे आयोजन, महाबळेश्वर परिसरातील उदा. पाचगणी, कास पठार, कोयनानगर, तापोळा, गड-किल्ले दर्शन व इतर पर्यटन स्थळ, दर्शन सहलीचे आयोजन, पर्यटकांसाठी विविध श्रेणीच्या तंबू निवास उभारणी करण्यात येणार आहे. पॅराग्लाडींग, पॅरामोटरींग, जलक्रिडा, ट्रेकींग, रॉक क्लायबींग, घोडेस्वारी आदी विविध साहसी उपक्रम राबविणे, स्थानिक बचत गटांचे हस्त कला-कृतीचे प्रदर्शन व विक्रीचे दालन उभारणी, स्थानिक पाककलाकृती संस्कृती व खाद्य महोत्सव दालन उभारणी, महाबळेश्वर येथील विविध प्रेक्षणीय स्थळे व पुरातन मंदिरांचे दर्शन इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २ मे रोजी महोत्सवाचे उदघाटन होणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे या वेळी उपस्थितीत राहणार आहेत.
तीन दिवसांच्या या महोत्सवात महाबळेश्वर येथील प्रेक्षणीय स्थळे, स्थानिक कला – संस्कृती, खाद्यसंस्कृतीची ओळख पर्यटकांना करून देण्याबरोबरच पर्यटन वृद्धी व्हावी या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई उपस्थित होते.
सोमवार, ३१ मार्च, २०२५
मुंबईकरांसाठी उन्नत मार्गावरील निसर्ग भ्रमंती
मुंबईकरांसाठी मलबार हिल येथे
उन्नत मार्गावर निसर्ग भ्रमंती
मुंबई, दि. ३१ मार्च
निसर्गाच्या कुशीत भ्रमंती करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने निसर्ग उन्नत मार्ग उपलब्ध करून दिला आहे. कमला नेहरू उद्यान व फिरोजशहा मेहता उद्यान येथे घनदाट झाडांमधून मुंबईकरांना आता भ्रमंती करता येणार आहे.
दररोज पहाटे ५ ते रात्री ९ या वेळेत हा उन्नत मार्ग सुरू राहणार असून भारतीय व परदेशी नागरिकांना यासाठी अनुक्रमे २५ आणि १०० रुपये शुल्क मोजावे लागणार आहे.
बृहन्मुंबई महापालिका जल अभियंता विभागातर्फे हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. येथे भेट देण्यासाठी
https://naturetrail.mcgm.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन तिकीट काढता येणार आहे. या मार्गावर भ्रमंती करण्यासाठी एका वेळी फक्त २०० जणांना चार प्रवेश देण्यात येणार आहे.
या उन्नत मार्गावर भ्रमंती करताना १०० हून अधिक झाडांसह वेगवेगळे पक्षीही पाहता येणार आहेत.
उन्नत मार्गावरील निसर्ग भ्रमंती
रविवार, ३० मार्च, २०२५
सामूहिक हनुमान चालीसा पठण
हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी देशभरात
सामूहिक हनुमान चालीसा पठण
- मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात एक
हजारांहून अधिक हिंदूंचा सहभाग
ठाणे, दि. ३० मार्च
हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी सनातन संस्थेतर्फे शनिवारी संपूर्ण देशभरात सामूहिक श्री हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात होता. या निमित्ताने ठिकठिकाणच्या श्री हनुमान, श्रीराम मंदिरात झालेल्या कार्यक्रमात २० हजारांहून भाविक,साधक, हिंदुत्ववादी सहभागी झाले होते.
मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील कार्हयक्रमात एक हजारांहून अधिक हिंदू नागरिक सहभागी झाले.ठाणे येथील पितांबरी उद्योगसमूहातील कर्मचाऱ्यांनीईह सामूहिक हनुमानचालिसा पठण केले.
शनिवार, २९ मार्च, २०२५
स्वयंसेवक,प्रचारक,मुख्यमंत्री ते पंतप्रधान नरेंद्र मोदींची संघ मुख्यालयाला भेट!
स्वयंसेवक,प्रचारक,मुख्यमंत्री ते पंतप्रधान
नरेंद्र मोदींची संघ मुख्यालयाला भेट!
- 'तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना'
असेच संघ आणि भाजपचे नाते
शेखर जोशी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांचे नेते, पदाधिकारी यांनी वेळोवेळी एकमेकांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष टीका केली तरी रा.स्व. संघ आणि भाजप यांचे नाते अतूट आहे.
'तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना'अशी दोघांची अवस्था असून वेळप्रसंगी मी मारल्यासारखे करतो तू पडल्यासारखे कर, असे प्रसार माध्यमांना दाखविण्यासाठी केले जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची पितृसंघटना असून भाजपप्रमाणे अन्य अनेक संघटना रा.स्व.संघाच्या मुशीतूनच तयार झाल्या आहेत. त्यामुळे या सर्वांचेच एकमेकांशी आतून घट्ट ऋणानुबंध आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी नागपूर दौऱ्यावर येत असून ते
रा. स्व. संघ मुख्यालयाला, संघाचे संस्थापक, संस्थापक सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार, द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार आहेत. माधव नेत्रालय, संशोधन केंद्राच्या नवीन व अत्याधुनिक इमारतीचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष आणि मोदी यांची संघ मुख्यालय रेशीम बागेची भेट त्यासाठीही महत्त्वाची मानण्यात येत आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी २०१२ मध्ये संघाचे माजी सरसंघचालक सुदर्शन यांच्या अंत्यदर्शनासाठी संघ मुख्यालयात आले होते. त्याआधी संघाचे प्रचारक म्हणून मोदी यांचे संघ मुख्यालयात येणे झालेही असेल. मात्र पंतप्रधान या नात्याने मोदींची संघ मुख्यालयाला ही पहिलीच भेट आहे. याआधी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी संघ मुख्यालयाला भेट दिली होती पण तेव्हा ते पंतप्रधान पदावर नव्हते. संघ मुख्यालयाला भेट देणारे मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. २०१४ मध्ये मोदी पंतप्रधान झाले. मात्र इतक्या वर्षांनंतर ते नागपुरात संघ मुख्यालयाला भेट देण्यासाठी येत आहेत. राम मंदिर भुमिपूजन, राम मंदिर उदघाटन आणि अन्य एक दोन प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत व पंतप्रधान मोदी एका व्यासपीठावर एकत्र आले. पण संघ मुख्यालयाला मोदी यांची पंतप्रधान झाल्यानंतरची ही पहिलीच भेट आहे आणि म्हणूनच संघ, भाजपसह प्रसार व समाज माध्यमातूनही या भेटीबद्दल औत्सुक्य आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात काही मतभेद आहेत, मोदी आता संघाला डोईजड होऊ लागले आहेत, मोदी संघाच्या नेत्यांचे ऐकत नाहीत, स्वतःला पाहिजे तेच करतात याची आणि
सरसंघचालक भागवत यांनी केलेल्या काही वक्तव्यांची चर्चा होत असते. सरसंघचालक भागवत यांची ही वक्तव्ये म्हणजे अप्रत्यक्षपणे मोदी यांच्यावर केलेली टीका आहे, त्यांनी मोदींचे कान टोचले, असेही बोलले जाते. अर्थात संघ आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून वेळोवेळी अशी विधाने केली जातात ती अगदी ठरवून केली जातात. खरे तर आपल्या वक्तव्याचे समाज माध्यमातून, प्रसार माध्यमातून काय परिणाम होतात, विरोधकांसह संघ स्वयंसेवक, भाजप कार्यकर्ते, पाठिराखे, हितचिंतक ही मंडळी त्यावर काय प्रतिक्रिया देतात? याची ती चाचपणी असते.
२०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आता भाजपला रा. स्व. संघाची गरज नाही, भाजप सक्षम झाला असल्याचे विधान एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केले होते. २०१४ आणि २०१९ च्या तुलनेत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसला. स्वबळावर सत्ता स्थापन करता आली नाही. नाराज झालेल्या संघाने मनापासून निवडणुकीत भाजपसाठी काम केले नाही, पण हातातून सत्ता जाणार नाही, इतपत संघाने भूमिका बजावत भाजपसाठी काम केले, अशी चर्चा तेव्हा केली गेली. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातही भाजपने मार खाल्ला. खरे तर संघाने न बोलता भाजपला दिलेला हा जोरदार झटका होता. पण विधानसभा निवडणुकीत संघाने भूमिका बदलली. आपली संपूर्ण ताकद वेगवेगळ्या माध्यमातून विशेषकरून भाजप आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीच्या पाठीशी उभी केली.संघप्रणित संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात सजग रहो अभियान राबविण्यात आले. नुकत्याच झालेल्या नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीतही पडद्याआड संघ भाजपसाठी सक्रियच राहिला. त्याचे परिणाम दिसून आले. खरे तर नगरसेवक ते खासदार पर्यंतच्या निवडणुकीत संघ, संघाचे कार्यकर्ते आणि संघप्रणित संस्थां, संघटना निस्वार्थीपणे काम, प्रचार करतात म्हणूनच भाजपचे उमेदवार निवडून येतात, हे सत्य नाकारून चालणार नाही.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची काही विधाने अप्रत्यक्षपणे मोदींची कानउघाडणी करण्यासाठीच होती. काही जण स्वतःला देवाचा अवतार समजायला लागले आहेत, प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधण्याची आणि नवीन वाद उकरून काढण्याची गरज नाही, देशात शांतता आवश्यक असून देशातील मणिपूर राज्य गेल्या एक वर्षापासून अशांत आहे, तिथे हिंसाचार थांबविण्याला सरकारने प्राधान्य दिले पाहिजे, जो मर्यादेचे पालन करतो त्याच्यात अहंकार नसतो आणि अहंकार नसलेल्या व्यक्तिलाच सेवक म्हणवून घेण्याचा अधिकार आहे, अशा आशयाची वक्तव्ये संघाचे विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केली होती. यामुळे भाजप व मोदी आणि रा.स्व. संघ यांच्यातील संबंध ताणले गेल्याचे बोलले जात होते. मात्र एका घरात राहणाऱ्यांचे भांड्याला भांडे लागते असाच तो प्रकार होता. अलिकडेच नवी दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जाहीर कौतुक केले होते. महाराष्ट्रात मराठी भाषिकाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. संघ आता वटवृक्ष झाला असून तो शब्तादी साजरी करतो आहे. माझ्यासह लाखो लोकांना संघाने देशासाठी जगण्याची प्रेरणा दिली, असे मोदी म्हणाले होते.
विरोधात असलेले किंवा एकाच विचारसरणीचे दोन महत्त्वाचे राजकीय नेते जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा कोणी कितीही व काहीही सांगितले तरी त्या भेटीत हवा पाण्याच्या गप्पा नक्कीच होत नाहीत. त्यामुळे मोदींची संघ मुख्यालय, डॉ. हेडगेवार स्मृतीस्थळाला भेट हे वरवरचे आणि दाखवण्यासाठीचे निमित्त असू शकते. या धावत्या भेटीप्रसंगी किंवा नंतरच्या गुप्त बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते आणि मोदी यांच्यात भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड हा महत्त्वाचा मुद्दा असू शकतो. मोदींच्या पंचाहत्तरीनंतर त्यांचा पर्याय कोण? की २०२९ मध्येही अपवाद म्हणून पुन्हा मोदीच, वक्फ बोर्ड, भाजपने थेट हिंदुत्व स्विकारावे का, भाजपची मुस्लिमांबाबतची भूमिका अशा काही विषयांवररही चर्चा होणारच नाही, असे म्हणता येणार नाही.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना बाजूला करून नरेंद्र मोदी यांचे नाव रा.स्व. संघाने पुढे केले होते. आता भविष्यात मोदींचा पर्याय म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अन्य कोणाचे नाव पुढे करणार का? आपला पितृ संघटनेचा अधिकार बजावून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोदी व भाजपला काही गोष्टी सुनावणार का? की संघाचे वर्चस्व न मानता मोदी माझेच काय ते खरे करणार? या प्रश्नांची उत्तरे येणारा काळ देईलच. पण तोपर्यंत मोदींच्या संघ मुख्यालय भेटीचे कवित्व मात्र कायम राहील हे नक्की.
शेखर जोशी
२९ मार्च २०२५
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
















