शुक्रवार, ४ एप्रिल, २०२५

वक्फ सुधारणा विधेयक अपूर्ण

वक्फ सुधारणा विधेयक अपूर्ण; हिंदू समाजावर झालेला अन्याय सरकारने दूर करण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी मुंबई, दि. ४ एप्रिल केंद्र सरकारने सादर केलेल्या वक्फ संबंधीच्या विधेयकात वक्फ मंडळाला मिळालेले अमर्याद अधिकार काही प्रमाणात कमी करण्यात आले असले, तरी हिंदू समाजाच्या भूमीच्या रक्षणाची संपूर्ण हमी या विधेयकात आलेली नाही. हिंदूंच्या न्याय्य भूमींवरील अन्याय दूर करण्यासाठी सरकारने संयुक्त संसदीय समितीनेसमोर हिंदू पक्षाने मांडलेल्या सूत्रांचा गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि हिंदू समाजाच्या हक्कांवर होणारा अन्याय दूर केला पाहिजे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे सध्याचे वक्फ संबंधिचे विधेयक अपूर्ण असून हिंदू समाजाच्या हक्कांचे संपूर्ण संरक्षण करण्यास असमर्थ आहे. .विधेयकातील कलम ४०, १०४, १०७ आणि १०८ यांसारखी काही भयंकरे कलमे रद्द करण्यात आली आहेत, याचे हिंदु जनजागृती समिती पूर्ण समर्थन करते. कलम ३(c) नुसार केवळ सरकारी जमिनींची चौकशी केली जाणार असून पूर्वी जे वक्फ संपत्ती म्हणून घोषित झाल्या आहेत त्यांची माहिती मागवण्यात आली आहे; मात्र हिंदू समाजाच्या मंदिरांच्या जमिनी, ट्रस्टच्या जमिनी, इतर समुदायांच्या मालकीच्या जमिनी आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या अखत्यारीतील जमिनी जर वक्फ संपत्ती म्हणून घोषित झाल्या असतील, तर त्यावर पूर्वलक्षी प्रभाव राहणार नाही. त्यामुळे या जमिनी हिंदू समाजाला परत मिळतील याची कोणतीही हमी या विधेयकात दिली नसल्याचे समितीचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर हिंदू समाजाच्या हक्कांचे संपूर्ण संरक्षण व्हावे यासाठी या विधेयकात आणखी सुधारणा करणे आवश्यक आहे. पूर्वी वक्फ संपत्ती म्हणून घोषित करण्यात आलेल्या सर्व जमिनींची चौकशी व्हावी, हिंदू मंदिर, ट्रस्ट, इतर समाज आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या जमिनींवर झालेल्या अन्यायकारक वक्फ दाव्यांना तत्काळ रद्द करण्यात यावे आणि वक्फ मंडळाला मिळालेले विशेष अधिकार पूर्णपणे हटविण्यात यावे, असेही समितीने म्हटले आहे. हिंदू समाजाच्या हक्कांसाठी हा लढा सुरूच राहील. हिंदू समाजाने आपल्या भूमीच्या संरक्षणासाठी एकत्र येऊन आवाज उठवण्याची गरज असल्याचे हिंदू जनजागृती समितीचे म्हणणे आहे.

गुरुवार, ३ एप्रिल, २०२५

येत्या १ मे पासून ‘एक राज्य एक नोंदणी’

येत्या १ मे पासून ‘एक राज्य एक नोंदणी’- चंद्रशेखर बावनकुळे
- राज्यात कुठेही,कुठल्याही जिल्ह्यात घरांची नोंदणी करता येणार मुंबई, दि. ३ एप्रिल महाराष्ट्रात येत्या १ मे पासून ‘एक राज्य एक नोंदणी’ ही पद्धत सुरू करण्यात येणार आहे. यामुळे राज्यात कुठेही, कुठल्याही जिल्ह्यातील घरांची नोंदणी करता येणार असून ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन असणार आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी दिली. घर खरेदी-विक्री नोंदणीसाठी सरकारी कार्यालयात जावे लागते, अनेक हेलपाटे मारावे लागतात. नोंदणी करताना मध्ये दलालांचा अडथळा असतो. यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारदर्शी व गतीमान सरकारच्या १०० दिवसांच कार्यक्रम दिला होता, त्याअंतर्गत महसूल खात्याच्या मुद्रांक निरिक्षकांनी व महानिरिक्षकांनी ‘एक राज्य एक नोंदणी’ अशी पद्धत आणली असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. आधार कार्ड आणि आयकर दस्तऐवजांच्या मदतीने ऑनलाईन फेसलेस नोंदणी करता येणार आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर मुंबई आणि उपनगरांत ही नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती, आता येत्या १ मेपासून संपूर्ण राज्यभरात सुरू करण्यात येणार आहे.

बुधवार, २ एप्रिल, २०२५

गायत्री परिवार ट्रस्टतर्फे डोंबिवलीत गायत्री महायज्ञ

गायत्री परिवार ट्रस्टतर्फे डोंबिवलीत गायत्री महायज्ञ
गायत्री परिवार ट्रस्टच्या डोंबिवली शाखेतर्फे येत्या ४ ते ७ एप्रिल या कालावधीत डोंबिवली पश्चिम येथील भागशाळा मैदानात १०८ कुंडी गायत्री महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती गायत्री परिवार अयोध्याचे अरविंदकुमार यांनी दिली.राष्ट्र जागरण आणि महिला सशक्तीकरण या उद्देशाने हा महायज्ञ होणार असल्याचेही ते म्हणाले.
शांतीकुंज, हरिद्वार येथील पं. श्रीराम शर्मा व भगवतीदेवी शर्मा यांच्या प्रेरणेतून गायत्री परिवार ट्रस्ट सुरू करण्यात आला आहे. याआधी डोंबिवलीत भागशाळा मैदानावरच ५१ कुंडी गायत्री यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. ४ एप्रिल या दिवशी दुपारी तीन वाजता शिवमंदिर, रामनगर, डोंबिवली पूर्व येथून कलशयात्रा निघणार असून पाच वाजता ही कलशयात्रा भागशाळा मैदानावर येणार आहे. त्यानंतर पुस्तक प्रदर्शन उदघाटन आणि रात्री आठपर्यंत गरबा, गोंधळ, जागरण कार्यक्रम होणार असल्याचे अरविंदकुमार यांनी सांगितले.
शनिवार ५ एप्रिल रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत देवपूजन, गायत्री महायज्ञ संस्कार व अन्य कार्यक्रम तर सहा वाजता प्रवचन होणार आहे. रविवार ६ एप्रिल या दिवशी गायत्री महायज्ञ संस्कार तर संध्याकाळी सहा वाजता ११ हजार १११ दीप महायज्ञ, कन्या पूजन होणार आहे. सोमवार, ७ एप्रिल या दिवशी सकाळी आठ वाजता गायत्री महायज्ञाची पूर्णाहुती होणार असल्याचे अरविंदकुमार म्हणाले.
या संपूर्ण कार्यक्रमात उपस्थितांनी भारतीय वेष परिधान केलेला असावा. दीप महायज्ञासाठी सहभागी होणाऱ्यांनी एका तबकात कमीत कमी पाच दिवे घेऊन यावे, असे आवाहनही त्यांनी केले. हे सर्व कार्यक्रम निःशुल्क असून ऐच्छिक देणगी स्विकारण्यात येणार आहे.
गायत्री परिवार डोंबिवलीच्या संध्या पाटील या कार्यक्रमाच्या प्रमुख संयोजक आहेत. संपर्क 9082364845 शेखर जोशी २ एप्रिल २०२५

मंगळवार, १ एप्रिल, २०२५

मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातर्फे गरजू रुग्णांना आर्थिक मदतीचा हात

मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातर्फे गरजू रुग्णांना मदतीचा हात!
मार्च महिन्यात २२ कोटींहून अधिक रकमेची मदत
-मेंदू विकारांवरील उपचारांसाठींचे रुग्ण सर्वाधिक
मुंबई, दि.१ मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्यादुर्बल घटकातील गरजू रुग्णांना आर्थिक मदत केली जाते. मार्च २०२५ मध्ये मुख्यमंत्री सहाा्यता निधी कक्षामार्फत २ हजार ५१७ रुग्णांना २२ कोटींहून अधिक रकमेची मदत करतात आली. या आर्थिक मदतीतील सर्वाधिक मदत मेंदू विकारांवरील उपचारांसाठी करण्यात आली आहे. मार्च महिन्यात मेंदू विकारांवरील उपचारांसाठी ४७१,कर्करोगावरील उपचारांसाठी ४२१,हिप रिप्लेसमेंटसाठी ३०६ रुग्णांना, अपघातामधील शस्त्रक्रियेसाठी २४७, हृदयविकारांवरील उपचारांसाठी २३९,अपघातासंबंधित १८४, , गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी १५०, बाल रोगांवरील उपचारांसाठी १४५ जणांना आर्थिक मदत देण्यात आली, अशी माहिती कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून अधिकाधिक गरजू रुग्णांपर्यंत आर्थिक मदत पोहोचविली जात आहे. समाजातील दानशुर व्यक्ती, संस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षास सढळ हस्ते आर्थिक मदत करावी, असे आवाहनही नाईक यांनी केले आहे.

महाबळेश्वर येथे महापर्यटन उत्सव

महाबळेश्वर येथे महापर्यटन उत्सव -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण मुंबई,दि.१ महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व स्थानिक जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २ ते ४ मे दरम्यान महाबळेश्वर येथे तीन दिवसांच्या महापर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.‌मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. महोत्सवात स्थानिक लोकसंस्कृतीचा समावेश असलेले कार्यक्रम तसेच नामांकित कलाकारांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे स्ट्रॉबेरी व कृषी पर्यटन महोत्सवाचे आयोजन, महाबळेश्वर परिसरातील उदा. पाचगणी, कास पठार, कोयनानगर, तापोळा, गड-किल्ले दर्शन व इतर पर्यटन स्थळ, दर्शन सहलीचे आयोजन, पर्यटकांसाठी विविध श्रेणीच्या तंबू निवास उभारणी करण्यात येणार आहे. पॅराग्लाडींग, पॅरामोटरींग, जलक्रिडा, ट्रेकींग, रॉक क्लायबींग, घोडेस्वारी आदी विविध साहसी उपक्रम राबविणे, स्थानिक बचत गटांचे हस्त कला-कृतीचे प्रदर्शन व विक्रीचे दालन उभारणी, स्थानिक पाककलाकृती संस्कृती व खाद्य महोत्सव दालन उभारणी, महाबळेश्वर येथील विविध प्रेक्षणीय स्थळे व पुरातन मंदिरांचे दर्शन इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २ मे रोजी महोत्सवाचे उदघाटन होणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे या वेळी उपस्थितीत राहणार आहेत.‌ तीन दिवसांच्या या महोत्सवात महाबळेश्वर येथील प्रेक्षणीय स्थळे, स्थानिक कला – संस्कृती, खाद्यसंस्कृतीची ओळख पर्यटकांना करून देण्याबरोबरच पर्यटन वृद्धी व्हावी या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई उपस्थित होते.

सोमवार, ३१ मार्च, २०२५

मुंबईकरांसाठी उन्नत मार्गावरील निसर्ग भ्रमंती

मुंबईकरांसाठी मलबार हिल येथे उन्नत मार्गावर निसर्ग भ्रमंती मुंबई, दि. ३१ मार्च निसर्गाच्या कुशीत भ्रमंती करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने निसर्ग उन्नत मार्ग उपलब्ध करून दिला आहे. कमला नेहरू उद्यान व फिरोजशहा मेहता उद्यान येथे घनदाट झाडांमधून मुंबईकरांना आता भ्रमंती करता येणार आहे. दररोज पहाटे ५ ते रात्री ९ या वेळेत हा उन्नत मार्ग सुरू राहणार असून भारतीय व परदेशी नागरिकांना यासाठी अनुक्रमे २५ आणि १०० रुपये शुल्क मोजावे लागणार आहे. बृहन्मुंबई महापालिका जल अभियंता विभागातर्फे हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.‌ येथे भेट देण्यासाठी https://naturetrail.mcgm.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन तिकीट काढता येणार आहे. या मार्गावर भ्रमंती करण्यासाठी एका वेळी फक्त २०० जणांना चार प्रवेश देण्यात येणार आहे. या उन्नत मार्गावर भ्रमंती करताना १०० हून अधिक झाडांसह वेगवेगळे पक्षीही पाहता येणार आहेत.
उन्नत मार्गावरील निसर्ग भ्रमंती

रविवार, ३० मार्च, २०२५

सामूहिक हनुमान चालीसा पठण

हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी देशभरात सामूहिक हनुमान चालीसा पठण - मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात एक हजारांहून अधिक हिंदूंचा सहभाग ठाणे, दि. ३० मार्च हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी सनातन संस्थेतर्फे शनिवारी संपूर्ण देशभरात सामूहिक श्री हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात होता. या निमित्ताने ठिकठिकाणच्या श्री हनुमान, श्रीराम मंदिरात झालेल्या कार्यक्रमात २० हजारांहून भाविक,साधक, हिंदुत्ववादी सहभागी झाले होते. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील कार्हयक्रमात एक हजारांहून अधिक हिंदू नागरिक सहभागी झाले.ठाणे येथील पितांबरी उद्योगसमूहातील कर्मचाऱ्यांनीईह सामूहिक हनुमानचालिसा पठण केले.