बुधवार, १८ जून, २०२५

ज्येष्ठ निसर्ग अभ्यासक, लेखक मारुती चितमपल्ली यांचे निधन

ज्येष्ठ निसर्ग अभ्यासक आणि लेखक मारुती चितमपल्ली यांचे निधन सोलापूर, दि. १८ जून ज्येष्ठ पक्षी तज्ज्ञ, निसर्ग अभ्यासक आणि लेखक मारुती चितमपल्ली यांचे बुधवारी संध्याकाळी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते.‌ अलिकडेच त्यांना 'पद्मश्री' पुरस्काराने गौरविण्यात आले होते.‌ वन्यजीव अभ्यासक म्हणूनही त्यांचे योगदान खूप मोठे आहे. चितमपल्ली यांनी वन विभागात अनेक महत्त्वाची पदे भूषवली. वन्यजीवनावर त्यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले. चितमपल्ली यांनी लिहिलेली 'पक्षी जाय दिगंतरा', 'चकवा चांदणं,' जंगलाचं देणं’, ‘रानवाटा’, ‘शब्दांचं धन’, ‘रातवा’, ‘मृगपक्षीशास्त्र’ (संस्कृत-मराठी अनुवाद), ‘घरट्यापलीकडे’, ‘पाखरमाया’, ‘निसर्गवाचन’, ‘सुवर्णगरुड’, ‘आपल्या भारतातील साप’ (इंग्रजी-मराठी अनुवाद) ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य, मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांच्या विकासात चितमपल्ली यांचा विशेष सहभाग होता. राज्य वन्यजीवन संरक्षण सल्लागार समिती, छत्रपती संभाजीनगरच्या मराठी अभ्यासक्रम मंडळावर सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले.‌ अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्येहही ते सहभागी झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: