मंगळवार, १० जून, २०२५

विश्व संवाद केंद्राचे 'देवर्षी नारद' पुरस्कार जाहीर

विश्व संवाद केंद्राचे 'देवर्षी नारद' पुरस्कार जाहीर - समीर कर्वे,संदीप रामदासी,अश्विनी मयेकर आणि अन्य मानकरी मुंबई, दि. १० जून विश्व संवाद केंद्र- मुंबईतर्फे देण्यात येणार-या ’देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.प्रसारमाध्यम क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या पत्रकारांचा दरवर्षी या पुरस्काराने गौरविण्यात येते. उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने समीर कर्वे (मुद्रीत माध्यम),संदीप रामदासी(इलेक्ट्रॉनिक माध्यम),शैलेश गायकवाड (समाज माध्यम) यांना तसेच पत्रकारितेतील विशेष कामगिरीबद्दल साप्ताहिक विवेकच्या संपादक अश्विनी(कविता) मयेकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्काराचे यंदा २५ वे वर्ष आहे २०३ वर्षे जुन्या असलेल्या 'मुंबई समाचार'चा पत्रकारितेतील विशेष योगदानाबद्दल तसेच गेली ७७ वर्षे कार्यरत असलेल्या 'हिंदुस्थान समाचार' या बहुभाषिक वृत्त संस्थेलाही या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यूट्यूबसाठी जय गगन, फेसबुकसाठी मृगा वर्तक, इन्स्टाग्रामसाठी सुनीता पावसकर,अमोल जामदारे यांची निवड करण्यात आली आहे.पत्रकारितेतील उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून सूरज चौगुले याला गौरविण्यात आले आहे. पुरस्कार वितरण सोहळा येत्या १४ जून रोजी एनएसई बिल्डिंग, वांद्रा कुर्ला संकूल, वांद्रे (पू.) येथे होणार आहे. द इंडियन एक्सप्रेस समुहाचे कार्यकारी संचालक अनंत गोयंका हे प्रमुख पाहुणे तर टाइम्स नेटवर्कच्या समुह संपादक व टाइम्स नाऊ नवभारतच्या मुख्य संपादक नाविका कुमार विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम विभागाचे कार्यकारिणी सदस्य राजाभाऊ मुळे कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: